शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
4
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
5
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
6
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
7
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
8
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
9
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
10
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
11
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
12
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
13
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
14
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
15
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
16
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
17
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
18
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
19
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
20
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...

गडचिरोली जिल्हा निर्मितीचा उद्गाता हरपला

By admin | Updated: December 2, 2014 23:05 IST

तत्कालीन चंद्रपूर जिल्हा विस्ताराने मोठा होता. त्यामुळे गडचिरोली विभागातील नागरिकांची होणारी वाताहत लक्षात घेऊन अनेक पुढाऱ्यांनी गडचिरोली जिल्हा निर्मितीच्या संघर्षाचा विडा उचलला होता.

गडचिरोली : तत्कालीन चंद्रपूर जिल्हा विस्ताराने मोठा होता. त्यामुळे गडचिरोली विभागातील नागरिकांची होणारी वाताहत लक्षात घेऊन अनेक पुढाऱ्यांनी गडचिरोली जिल्हा निर्मितीच्या संघर्षाचा विडा उचलला होता. मात्र गडचिरोली जिल्हा निर्मितीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी पुढाकार घेऊन १९८१ मध्ये चंद्रपूरमधील एका कार्यक्रमात गडचिरोली जिल्हा निर्मितीची घोषणा केली. त्यामुळेच बॅ. ए. आर. अंतुले हे खरे गडचिरोली जिल्हा निर्मितीचे उद्गाता होते. आज मंगळवारी बॅ. अंतुले यांनी शेवटचा श्वास घेऊन जगाला निरोप दिला. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. तत्कालीन चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर बॅ. ए. आर. अंतुले आले असता, त्यांनी गडचिरोली जिल्हा निर्मितीची घोषणा केली. या जिल्ह्याच्या विकासाचा अ‍ॅक्शनप्लॅनही त्यांनी तयार केला. दुर्गम भागातील विकास साधण्यासाठी रस्ते इतर सोयीसुविधा पुरविण्यावर भर दिला. मात्र गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांच्या कार्यकाळात करण्यात आली. बॅ. ए. आर. अंतुले हे उत्तम प्रशासक होते. त्यांच्या कार्यकाळातच जिथे पंचायत समिती तिथे तालुका ही संकल्पना पूर्णत्वास आणली होती. त्यामुळेच सत्तेचे विकेंद्रीकरण होण्यास मदत झाली. लोकाभिमूख निर्णय घेण्यात त्यांचा हातखंडा होता. अल्पसंख्यांक समाजाचे ते मोठे नेते होते, अशी प्रतिक्रिया त्यांच्या कार्यकाळात गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार राहिलेले मारोतराव कोवासे, काँग्रेसचे प्रदेश सदस्य रविंद्र दरेकर यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)