शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

गडचिरोली जिल्हा निर्मितीचा उद्गाता हरपला

By admin | Updated: December 2, 2014 23:05 IST

तत्कालीन चंद्रपूर जिल्हा विस्ताराने मोठा होता. त्यामुळे गडचिरोली विभागातील नागरिकांची होणारी वाताहत लक्षात घेऊन अनेक पुढाऱ्यांनी गडचिरोली जिल्हा निर्मितीच्या संघर्षाचा विडा उचलला होता.

गडचिरोली : तत्कालीन चंद्रपूर जिल्हा विस्ताराने मोठा होता. त्यामुळे गडचिरोली विभागातील नागरिकांची होणारी वाताहत लक्षात घेऊन अनेक पुढाऱ्यांनी गडचिरोली जिल्हा निर्मितीच्या संघर्षाचा विडा उचलला होता. मात्र गडचिरोली जिल्हा निर्मितीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी पुढाकार घेऊन १९८१ मध्ये चंद्रपूरमधील एका कार्यक्रमात गडचिरोली जिल्हा निर्मितीची घोषणा केली. त्यामुळेच बॅ. ए. आर. अंतुले हे खरे गडचिरोली जिल्हा निर्मितीचे उद्गाता होते. आज मंगळवारी बॅ. अंतुले यांनी शेवटचा श्वास घेऊन जगाला निरोप दिला. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. तत्कालीन चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर बॅ. ए. आर. अंतुले आले असता, त्यांनी गडचिरोली जिल्हा निर्मितीची घोषणा केली. या जिल्ह्याच्या विकासाचा अ‍ॅक्शनप्लॅनही त्यांनी तयार केला. दुर्गम भागातील विकास साधण्यासाठी रस्ते इतर सोयीसुविधा पुरविण्यावर भर दिला. मात्र गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांच्या कार्यकाळात करण्यात आली. बॅ. ए. आर. अंतुले हे उत्तम प्रशासक होते. त्यांच्या कार्यकाळातच जिथे पंचायत समिती तिथे तालुका ही संकल्पना पूर्णत्वास आणली होती. त्यामुळेच सत्तेचे विकेंद्रीकरण होण्यास मदत झाली. लोकाभिमूख निर्णय घेण्यात त्यांचा हातखंडा होता. अल्पसंख्यांक समाजाचे ते मोठे नेते होते, अशी प्रतिक्रिया त्यांच्या कार्यकाळात गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार राहिलेले मारोतराव कोवासे, काँग्रेसचे प्रदेश सदस्य रविंद्र दरेकर यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)