शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली, अहेरीत काँग्रेसचे धरणे

By admin | Updated: December 1, 2014 22:53 IST

जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प, शेतकऱ्यांच्या धानाला भाव, देसाईगंज-गडचिरोली हा रेल्वे मार्ग रोजगार आदी मुद्यांवर जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोली व तालुका काँग्रेस कमिटी अहेरीच्यावतीने

लढा कायम ठेवणार : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शासनावर प्रखर टीकागडचिरोली/अहेरी : जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प, शेतकऱ्यांच्या धानाला भाव, देसाईगंज-गडचिरोली हा रेल्वे मार्ग रोजगार आदी मुद्यांवर जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोली व तालुका काँग्रेस कमिटी अहेरीच्यावतीने आज सोमवारला गडचिरोली व अहेरी येथे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या प्रश्नांवर केंद्र व राज्य शासनावर प्रखर टिका केली.जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावावे, शेतकऱ्यांच्या धानाला ३५०० व ५०० रूपये बोनस देण्यात यावा, जिल्हा विकास प्राधिकरण कार्यान्वित करण्यात यावे, देसाईगंज-गडचिरोल रेल्वे मार्ग निर्माण करण्यात यावे, खनिज संपत्तीवर आधारित उद्योगधंदे सुरू करण्यात यावे, जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्यात यावे आदी मागण्यांना घेऊन आज सोमवारला गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा काँगे्रस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. राम मेश्राम, जिल्हा काँग्रेसचे महासचिव प्रभाकर वासेकर, प्रदेश सदस्य पंकज गुड्डेवार, लोकनेते नामदेवराव गडपल्ल्लीवार, गडचिरोली विधानसभा प्रमुख अतुल मल्लेलवार, जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र भरडकर, नगरसेवक नंदू वाईलकर, महेंद्र ब्राम्हणवाडे, मनोहर पोरेटी, सतिश विधाते, अमिता मडावी, विनोद दशमुखे, सोनटक्के, काशिनाथ भडके, दिवाकर निसार, तुळशीराम भोयर, लक्ष्मण कोवे, बाबुराव कुंभारे, पी.टी. मसराम, दर्शना मेश्राम, दर्शना लोणारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.अहेरी येथील धरणे आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे अहेरी तालुकाध्यक्ष मेहबूब अली यांनी केले. यावेळी शिला चौधरी, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष व्यंकटेश चिलनकर, युवक काँगे्रसचे अहेरी विधानसभा उपाध्यक्ष बालाजी गेडाम, सुरेश मडावी, मधुकर तुंगावार, अशोक आलाम, बब्बू शेख, सलिम शेख, अर्जुन कांबळे, राबीया शेख, इमरान खान, सदाशिव गरगम, सदाशिव दुर्गे, साई पुगलम, मधुकर गोंगले, साई कुकुडकर, निवृत्ती दुर्गे, मुत्यालू कांबळे, शंकरी काटेल, मिना मेश्राम, सुनिता चौधरी, जक्कू कोंडावार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी राज्याला दुष्काळग्रस्त घोषीत करून दर हेक्टरी २५ हजार रूपयाची आर्थिक मदत द्यावी व सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी मेहबूब अली यांनी भाषणातून केली. जिल्ह्याच्या अन्य तालुक्यांमध्येही काँग्रेसच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. (प्रतिनिधी)