शहरं
Join us  
Trending Stories
1
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
2
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
3
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
4
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
5
विकली जाणार ५४ वर्ष जुनी 'ही' कंपनी, तुम्ही नक्कीच नाव ऐकलं असणार; ४५ देशांत आहे ६,४८२ कोटींचा व्यवसाय 
6
सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल
7
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
8
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली 'प्रोजेक्ट' धर्मांतर सुरू होते, काम करणाऱ्या मुलींना पैसे दिले जात होते
9
डाएटिंग, व्यायाम... सर्व करुन दमलात पण वजन कमीच होईना; रोजच्या 'या' ६ सवयी जबाबदार
10
Ritual: स्त्रियांनी साष्टांग नमस्कार घालू नये असे म्हणतात; पण का? जाणून घ्या शास्त्रार्थ!
11
जुन्या घरात सापडला सांगाडा, नोकियाच्या फोनने असं उघड केलं १० वर्षांपूर्वी झालेल्या मृत्यूचं गुपित, पोलिसही अवाक्
12
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१५,११४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
13
Manglagauri 2025: यंदा मंगळागौर कधी? ही घ्या तारखांची यादी, 'अशी' करा सुंदर तयारी लवकर..
14
५० व्या वर्षी निवृत्त व्हायचंय? 'या' स्मार्ट प्लॅनने मिळवा दरमहा १ लाख रुपये पगार! मासिक ५००० गुंतवणूक
15
ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? संभ्रम वाढला; मनसे नेते म्हणतात, “एकटे लढू, तयारी आहे”
16
भाजप प्रवेशाचा मार्ग झाला मोकळा; ठाकरेंच्या शिवसेनेचे बागुल, राजवाडे प्रकरणात नवा 'द्विस्ट'
17
बापरे! रुग्णालयाचं बिल भरण्यासाठी दागिने विकले, गहाण ठेवली शेती; ICUमध्ये मृत मुलावर उपचार
18
भारत-रशिया-चीन त्रिकुट..; पुतिन यांचे स्वप्न अमेरिका अन् डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणार
19
मोठी बातमी : केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला होणारी फाशी टळली, भारताच्या मुत्सद्देगिरीला यश, पडद्यामागे घडल्या अशा घडामोडी 
20
चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किंमतीतही झाला बदल; १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार

गडचिरोली, अहेरीत काँग्रेसचे धरणे

By admin | Updated: December 1, 2014 22:53 IST

जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प, शेतकऱ्यांच्या धानाला भाव, देसाईगंज-गडचिरोली हा रेल्वे मार्ग रोजगार आदी मुद्यांवर जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोली व तालुका काँग्रेस कमिटी अहेरीच्यावतीने

लढा कायम ठेवणार : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शासनावर प्रखर टीकागडचिरोली/अहेरी : जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प, शेतकऱ्यांच्या धानाला भाव, देसाईगंज-गडचिरोली हा रेल्वे मार्ग रोजगार आदी मुद्यांवर जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोली व तालुका काँग्रेस कमिटी अहेरीच्यावतीने आज सोमवारला गडचिरोली व अहेरी येथे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या प्रश्नांवर केंद्र व राज्य शासनावर प्रखर टिका केली.जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावावे, शेतकऱ्यांच्या धानाला ३५०० व ५०० रूपये बोनस देण्यात यावा, जिल्हा विकास प्राधिकरण कार्यान्वित करण्यात यावे, देसाईगंज-गडचिरोल रेल्वे मार्ग निर्माण करण्यात यावे, खनिज संपत्तीवर आधारित उद्योगधंदे सुरू करण्यात यावे, जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्यात यावे आदी मागण्यांना घेऊन आज सोमवारला गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा काँगे्रस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. राम मेश्राम, जिल्हा काँग्रेसचे महासचिव प्रभाकर वासेकर, प्रदेश सदस्य पंकज गुड्डेवार, लोकनेते नामदेवराव गडपल्ल्लीवार, गडचिरोली विधानसभा प्रमुख अतुल मल्लेलवार, जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र भरडकर, नगरसेवक नंदू वाईलकर, महेंद्र ब्राम्हणवाडे, मनोहर पोरेटी, सतिश विधाते, अमिता मडावी, विनोद दशमुखे, सोनटक्के, काशिनाथ भडके, दिवाकर निसार, तुळशीराम भोयर, लक्ष्मण कोवे, बाबुराव कुंभारे, पी.टी. मसराम, दर्शना मेश्राम, दर्शना लोणारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.अहेरी येथील धरणे आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे अहेरी तालुकाध्यक्ष मेहबूब अली यांनी केले. यावेळी शिला चौधरी, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष व्यंकटेश चिलनकर, युवक काँगे्रसचे अहेरी विधानसभा उपाध्यक्ष बालाजी गेडाम, सुरेश मडावी, मधुकर तुंगावार, अशोक आलाम, बब्बू शेख, सलिम शेख, अर्जुन कांबळे, राबीया शेख, इमरान खान, सदाशिव गरगम, सदाशिव दुर्गे, साई पुगलम, मधुकर गोंगले, साई कुकुडकर, निवृत्ती दुर्गे, मुत्यालू कांबळे, शंकरी काटेल, मिना मेश्राम, सुनिता चौधरी, जक्कू कोंडावार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी राज्याला दुष्काळग्रस्त घोषीत करून दर हेक्टरी २५ हजार रूपयाची आर्थिक मदत द्यावी व सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी मेहबूब अली यांनी भाषणातून केली. जिल्ह्याच्या अन्य तालुक्यांमध्येही काँग्रेसच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. (प्रतिनिधी)