शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

गडचिरोली शहरात रेतीचे भाव मनमानी वाढले

By admin | Updated: March 31, 2017 01:08 IST

शहरालगत वैनगंगा, कठाणी, पोटफोडी या नद्या वाहात आहे. या नद्यांवर रेतीघाट सरकारने कंत्राटदारांना विकले आहे.

दोन हजारांवर पोहोचली ट्रॉली : सर्वसामान्य नागरिकांना घर बांधकामात फटका गडचिरोली : शहरालगत वैनगंगा, कठाणी, पोटफोडी या नद्या वाहात आहे. या नद्यांवर रेतीघाट सरकारने कंत्राटदारांना विकले आहे. या कंत्राटदारांनी मनमानी कारभार चालविला असून गडचिरोली शहरात दोन हजार रूपयांवर एका ट्रॉलीचा दर पोहोचलेला आहे. खनिकर्म विभाग व महसूल प्रशासनाचे या चढत्या भावावर कुठलेही नियंत्रण नसल्याचे गडचिरोली शहरात दिसून येत आहे. गडचिरोलीत मोठ्या प्रमाणावर प्लॉट विकत घेऊन खासगी नागरिकांचे बांधकाम सुरू आहे. गडचिरोली शहराला लागून वैनगंगा, कठाणी नदीचा घाट असून या घाटावरून रेतीचा मोठ्या प्रमाणावर उपसा केला जात आहे. हे घाट कंत्राटदारांना देण्यात आले आहे; मात्र रेती गावाशेजारी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असूनही रेतीचे भाव कंत्राटदारांनी कमालीचे वाढविले आहे. गेल्या वर्षी ९०० रूपयांवर असलेला भाव यंदा दोन हजार रूपयांच्या आसपास गेला आहे. या रेतीमागचे अर्थकारण मोठे असल्याने कंत्राटदारांची मनमानी सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याबाबत महसूल प्रशासनाकडे तसेच खनिकर्म विभागाकडे तक्रारीही तोंडी व लेखी स्वरूपात करण्यात आल्या. मात्र शासकीय यंत्रणा या तक्रारींची दखलच घेत नसल्याचा आरोप होत आहे. गेल्यावर्षी आमदारांनी रेती घाटाला भेट देऊन पाहणी केली होती. मात्र त्यांच्यावरच गुन्हा दाखल झाला. त्यामुळे लोकप्रतिनिधींनीही या प्रकरणाकडे कानाडोळा केल्याचे दिसते. (जिल्हा प्रतिनिधी)का वाढले रेतीचे भावरेती घाटाच्या लिलावाची प्रक्रिया आॅनलाईन आहे. त्यामुळे या प्रक्रियेत विविध कंत्राटदार सहभागी होतात. अधिक दरात रेतीघाट विकत घेतला जातो. या रेतीघाटावर मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक कंत्राटदार करीत आहे. त्यामुळे येथे काम करणारे मजूर, ट्रॅक्टरचा खर्च, शासनाच्या रॉयल्टीसाठी येणारा खर्च, याची गोळा बेरीज करून एका ट्रॉलीमागे ३०० ते ४०० रूपये नफा असा सरळसरळ व्यवहार आहे. त्यामुळे रेतीचे भाव वाढलेले आहे.महसूल प्रशासनाने रेती तस्करीबाबत कठोर पावले उचलले आहेत. विना रॉयल्टी रेतीची वाहतूक होऊ नये, यासाठी पथक नेमले आहेत. त्यामुळे रॉयल्टी काढल्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे विना रॉयल्टी रेती वाहतूक होत नाही. त्यामुळे याचाही फटका भाव वाढण्याला कारणीभूत ठरला आहे. महसूल प्रशासनाने शिथीलता केल्यास रेतीचे भाव हजाराच्या आतही येऊ शकतात व सर्वसामान्य रेती खरेदीदाराला दिलासा मिळू शकतो. मात्र महसूल प्रशासन टाईट असल्याने हा प्रकार होऊ शकत नाही, असे गडचिरोलीचे तहसीलदार संतोष खांडरे लोकमतशी बोलताना म्हणाले.