शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

गडचिरोली शहरात रेतीचे भाव मनमानी वाढले

By admin | Updated: March 31, 2017 01:08 IST

शहरालगत वैनगंगा, कठाणी, पोटफोडी या नद्या वाहात आहे. या नद्यांवर रेतीघाट सरकारने कंत्राटदारांना विकले आहे.

दोन हजारांवर पोहोचली ट्रॉली : सर्वसामान्य नागरिकांना घर बांधकामात फटका गडचिरोली : शहरालगत वैनगंगा, कठाणी, पोटफोडी या नद्या वाहात आहे. या नद्यांवर रेतीघाट सरकारने कंत्राटदारांना विकले आहे. या कंत्राटदारांनी मनमानी कारभार चालविला असून गडचिरोली शहरात दोन हजार रूपयांवर एका ट्रॉलीचा दर पोहोचलेला आहे. खनिकर्म विभाग व महसूल प्रशासनाचे या चढत्या भावावर कुठलेही नियंत्रण नसल्याचे गडचिरोली शहरात दिसून येत आहे. गडचिरोलीत मोठ्या प्रमाणावर प्लॉट विकत घेऊन खासगी नागरिकांचे बांधकाम सुरू आहे. गडचिरोली शहराला लागून वैनगंगा, कठाणी नदीचा घाट असून या घाटावरून रेतीचा मोठ्या प्रमाणावर उपसा केला जात आहे. हे घाट कंत्राटदारांना देण्यात आले आहे; मात्र रेती गावाशेजारी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असूनही रेतीचे भाव कंत्राटदारांनी कमालीचे वाढविले आहे. गेल्या वर्षी ९०० रूपयांवर असलेला भाव यंदा दोन हजार रूपयांच्या आसपास गेला आहे. या रेतीमागचे अर्थकारण मोठे असल्याने कंत्राटदारांची मनमानी सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याबाबत महसूल प्रशासनाकडे तसेच खनिकर्म विभागाकडे तक्रारीही तोंडी व लेखी स्वरूपात करण्यात आल्या. मात्र शासकीय यंत्रणा या तक्रारींची दखलच घेत नसल्याचा आरोप होत आहे. गेल्यावर्षी आमदारांनी रेती घाटाला भेट देऊन पाहणी केली होती. मात्र त्यांच्यावरच गुन्हा दाखल झाला. त्यामुळे लोकप्रतिनिधींनीही या प्रकरणाकडे कानाडोळा केल्याचे दिसते. (जिल्हा प्रतिनिधी)का वाढले रेतीचे भावरेती घाटाच्या लिलावाची प्रक्रिया आॅनलाईन आहे. त्यामुळे या प्रक्रियेत विविध कंत्राटदार सहभागी होतात. अधिक दरात रेतीघाट विकत घेतला जातो. या रेतीघाटावर मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक कंत्राटदार करीत आहे. त्यामुळे येथे काम करणारे मजूर, ट्रॅक्टरचा खर्च, शासनाच्या रॉयल्टीसाठी येणारा खर्च, याची गोळा बेरीज करून एका ट्रॉलीमागे ३०० ते ४०० रूपये नफा असा सरळसरळ व्यवहार आहे. त्यामुळे रेतीचे भाव वाढलेले आहे.महसूल प्रशासनाने रेती तस्करीबाबत कठोर पावले उचलले आहेत. विना रॉयल्टी रेतीची वाहतूक होऊ नये, यासाठी पथक नेमले आहेत. त्यामुळे रॉयल्टी काढल्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे विना रॉयल्टी रेती वाहतूक होत नाही. त्यामुळे याचाही फटका भाव वाढण्याला कारणीभूत ठरला आहे. महसूल प्रशासनाने शिथीलता केल्यास रेतीचे भाव हजाराच्या आतही येऊ शकतात व सर्वसामान्य रेती खरेदीदाराला दिलासा मिळू शकतो. मात्र महसूल प्रशासन टाईट असल्याने हा प्रकार होऊ शकत नाही, असे गडचिरोलीचे तहसीलदार संतोष खांडरे लोकमतशी बोलताना म्हणाले.