शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

गडचिरोली शहर सापडले खड्ड्यात

By admin | Updated: July 6, 2016 01:48 IST

गडचिरोली शहरातून जाणाऱ्या चामोर्शी, मूल, धानोरा व आरमोरी या चारही प्रमुख मार्गावर जागोजागी खड्डे निर्माण झाले आहेत.

प्रमुख चारही मार्गांवर अनेक ठिकाणी खड्डे : वाहनधारकांना त्रास; वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवरगडचिरोली : गडचिरोली शहरातून जाणाऱ्या चामोर्शी, मूल, धानोरा व आरमोरी या चारही प्रमुख मार्गावर जागोजागी खड्डे निर्माण झाले आहेत. गेल्या चार-पाच वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या प्रमुख मार्गाची पक्की दुरूस्ती करण्यात न आल्याने दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडतात. खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला असून वाहनधारक प्रचंड त्रस्त झाले आहेत.चामोर्शी, आरमोरी, धानोरा, मूल या प्रमुख मार्गावर दिवसा व रात्री वाहनांची मोठी वर्दळ असते. गडचिरोली शहरातून इतरत्र शहराबाहेर जाण्यासाठी येथील इंदिरा गांधी चौकातून याच मार्गाने जावे लागते. शहरात बायपास मार्गाची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे या चार प्रमुख मार्गावर ओव्हरलोड वाहतुकीचाही भार आहे. गडचिरोली शहरातून राजनांदगाव, अहेरी व चंद्रपूरकडे दररोज ओव्हरलोड वाहतूक याच मार्गावरून होत असते. क्षमतेपेक्षा अधिक माल मोठ्या वाहनाद्वारे वाहून नेला जातो. त्यामुळे शहरातील चारही प्रमुख मार्गाची दुरवस्था झाली आहे.मूल मार्गावर इंदिरा गांधी चौकापासून कॉम्प्लेक्स भागातील जिल्हा सामान्य रुग्णालयापर्यंत डांबरीकरण उखडले आहे. झटके खात या मार्गाने वाहनातून प्रवास करावा लागतो. रात्री या मार्गावर अंधार राहत असल्याने वाहनधारकांना खड्डे चुकविता येत नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. डांबरीकरणाला सिमेंट काँक्रिटची जोड धानोरा, चामोर्शी, मूल व आरमोरी हे चारही प्रमुख डांबरी मार्ग आहेत. पावसाळ्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी पक्के डांबरीकरण करणे आवश्यक होते. मात्र आद्रा नक्षत्राच्या दमदार पावसामुळे चामोर्शी, मूल व आरमोरी मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे निर्माण झाले. लोकांची ओरड लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाच्या दुरूस्तीस प्रारंभ केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या डांबरी मार्गावरील खड्डे सिमेंट काँक्रिटने बुजविल्या जात आहेत. शाळकरी विद्यार्थीही हैराणमूल, चामोर्शी, धानोरा मार्गावर अनेक शाळा, महाविद्यालये आहेत. शहरातील मुल-मुली सायकलने याच मार्गावरून शाळा, महाविद्यालयात ये-जा करीत असतात. मात्र प्रमुख डांबरी मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या सायकली व दुचाकीला अपघात घडत आहे. मार्गावरील खड्ड्यांमुळे विद्यार्थीही कमालीचे त्रस्त झाले आहेत.