शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचपदाचा तिढा न सुटल्याने भावी सरपंच संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:10 IST

देसाईगंज : तालुक्यातील देसाईगंज पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतींची १५ जानेवारी रोजी पार पडलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी जोरदार ...

देसाईगंज : तालुक्यातील देसाईगंज पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतींची १५ जानेवारी रोजी पार पडलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारत जवळपास १७ ही ग्रामपंचायतींत सत्ता स्थापण्याजोगे स्पष्ट बहुमत मिळविल्याचे दिसून येते. असे असले तरी सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत पुढे ढकलण्यात आली असल्याने सरपंचपदाचा दावेदार म्हणून पुढे येण्यासाठी आपसातच जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.

नेमकी माळ कुणाच्या गळ्यात हे सरपंचपदाच्या सोडतीनंतरच स्पष्ट होणार असल्याने या सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, सरपंच होण्याची स्वप्न रंगवणाऱ्यांची चांगलीच गोची झाली असून गुडघ्याला बाशिंग बांधून असलेले मात्र, यामुळे संभ्रमात सापडले आहेत. देसाईगंज पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या १७ ग्रामपंचायतींच्या एकूण ५९ प्रभागांतील १६१ उमेदवारांसाठी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत २६ उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले होते. यात तब्बल २१ महिला तर ५ पुरुष उमेदवारांचा समावेश होता. दरम्यान, १३५ उमेदवारांसाठी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतलेल्या तब्बल ३१४ उमेदवारांपैकी रथी महारथींना जबर धक्का देत अनेक नवखे उमेदवार निवडून आले आहेत. अशातच राजकीय पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी गावविकासाच्या दृष्टिकोनातून सरपंचपदी योग्य उमेदवाराची निवड होण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली. असे असले तरी सरपंचपदाच्या सोडतीशिवाय ठोस निर्णय घेणे शक्यच नसल्याने पदावर शिक्कामोर्तब करणे अद्यापतरी शक्य होऊ शकले नाही. देसाईगंज तालुक्याच्या अनेक गावांत अनुभवी व नवखे उमेदवारांना निवडून देण्यात आले असले तरी काहींची पार्श्वभूमी पाहता जबाबदारीचे पद सोपविताना या पदावर चुकीच्या व्यक्तीची निवड होऊ नये, यासाठीही वरिष्ठांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

बाॅक्स...

महिला उमेदवारांनाही मिळणार संधी

अनेक गावांत चुकीच्या व्यक्तीच्या हातात पद जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे तब्बल ८६ महिला उमेदवार व ७५ पुरुष उमेदवारांची १७ सरपंचपदी निवड होणेच असल्याने व सद्य:स्थितीत महाविकास आघाडी समर्पित ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांचीच भाऊगर्दी झाली असल्याने आरक्षणानुसार सरपंच निवडताना तो गावासाठी कलंक तर ठरणार नाही ना? याचीही खबरदारी घ्यावीच लागणार आहे.

तथापि, पदाच्या सोडतीचा चेंडू सध्यातरी सोडतीच्या कोर्टात असल्याने लागलेल्या निकालावरून १७ ही ग्रामपंचायती महाविकास आघाडीच्या ताब्यात जाणार हे जवळपास स्पष्ट असले तरी दरम्यान घोडेबाजारही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.