शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
2
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
3
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
4
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
5
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
6
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
7
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
8
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात
9
Operation Sindhu: इराण, इस्रायलमधून आणखी १,१०० भारतीय मायदेशात, विमान कंपन्यांची मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली
10
आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला
11
एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
12
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
13
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
14
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
15
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
16
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
17
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
18
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
19
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
20
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट

सरपंचपदाचा तिढा न सुटल्याने भावी सरपंच संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:10 IST

देसाईगंज : तालुक्यातील देसाईगंज पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतींची १५ जानेवारी रोजी पार पडलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी जोरदार ...

देसाईगंज : तालुक्यातील देसाईगंज पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतींची १५ जानेवारी रोजी पार पडलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारत जवळपास १७ ही ग्रामपंचायतींत सत्ता स्थापण्याजोगे स्पष्ट बहुमत मिळविल्याचे दिसून येते. असे असले तरी सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत पुढे ढकलण्यात आली असल्याने सरपंचपदाचा दावेदार म्हणून पुढे येण्यासाठी आपसातच जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.

नेमकी माळ कुणाच्या गळ्यात हे सरपंचपदाच्या सोडतीनंतरच स्पष्ट होणार असल्याने या सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, सरपंच होण्याची स्वप्न रंगवणाऱ्यांची चांगलीच गोची झाली असून गुडघ्याला बाशिंग बांधून असलेले मात्र, यामुळे संभ्रमात सापडले आहेत. देसाईगंज पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या १७ ग्रामपंचायतींच्या एकूण ५९ प्रभागांतील १६१ उमेदवारांसाठी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत २६ उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले होते. यात तब्बल २१ महिला तर ५ पुरुष उमेदवारांचा समावेश होता. दरम्यान, १३५ उमेदवारांसाठी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतलेल्या तब्बल ३१४ उमेदवारांपैकी रथी महारथींना जबर धक्का देत अनेक नवखे उमेदवार निवडून आले आहेत. अशातच राजकीय पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी गावविकासाच्या दृष्टिकोनातून सरपंचपदी योग्य उमेदवाराची निवड होण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली. असे असले तरी सरपंचपदाच्या सोडतीशिवाय ठोस निर्णय घेणे शक्यच नसल्याने पदावर शिक्कामोर्तब करणे अद्यापतरी शक्य होऊ शकले नाही. देसाईगंज तालुक्याच्या अनेक गावांत अनुभवी व नवखे उमेदवारांना निवडून देण्यात आले असले तरी काहींची पार्श्वभूमी पाहता जबाबदारीचे पद सोपविताना या पदावर चुकीच्या व्यक्तीची निवड होऊ नये, यासाठीही वरिष्ठांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

बाॅक्स...

महिला उमेदवारांनाही मिळणार संधी

अनेक गावांत चुकीच्या व्यक्तीच्या हातात पद जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे तब्बल ८६ महिला उमेदवार व ७५ पुरुष उमेदवारांची १७ सरपंचपदी निवड होणेच असल्याने व सद्य:स्थितीत महाविकास आघाडी समर्पित ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांचीच भाऊगर्दी झाली असल्याने आरक्षणानुसार सरपंच निवडताना तो गावासाठी कलंक तर ठरणार नाही ना? याचीही खबरदारी घ्यावीच लागणार आहे.

तथापि, पदाच्या सोडतीचा चेंडू सध्यातरी सोडतीच्या कोर्टात असल्याने लागलेल्या निकालावरून १७ ही ग्रामपंचायती महाविकास आघाडीच्या ताब्यात जाणार हे जवळपास स्पष्ट असले तरी दरम्यान घोडेबाजारही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.