शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

वैनगंगा नदीवरील पुलाचे भवितव्य अंधांतरी

By admin | Updated: April 2, 2016 01:49 IST

चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याला जोडणारा आष्टी येथील वैनगंगा नदीवरील पूल हा ठेंगणा असल्याने पावसाळ्यात पुरामुळे कित्येकदा मार्ग बंद असतो.

आष्टी-गोंडपिंपरी मार्ग : जुन्या पुलाची मर्यादा संपलीआष्टी : चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याला जोडणारा आष्टी येथील वैनगंगा नदीवरील पूल हा ठेंगणा असल्याने पावसाळ्यात पुरामुळे कित्येकदा मार्ग बंद असतो. तसेच हा पूल बऱ्याच वर्षापूर्वीचा असल्याने या पुलाची मर्यादाही संपलेली आहे. या नदीवर नवीन पुलाची मागणी नागरिकांनी केली. परंतु अलीकडेच घाटकुळ-मुधोली-येनापूर रस्त्यावरील वैनगंगा नदीवर उंच पातळीच्या मोठ्या पुलाच्या बांधकामाला केंद्रीय मार्ग निधीतून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता आष्टी-गोंडपिपरी मार्गावरील वैनगंगा नदीवरील पुलाचे भवितव्य सध्यातरी अधांतरी असल्याचे दिसते.चंद्रपूरवरून येणारा राष्ट्रीय महामार्ग बामणीपर्यंत चारपदरी करण्यात आला आहे. पुढे तो आष्टीपर्यंत होणार असल्याची चर्चा आहे. परंतु अलीकडेच पोंभुर्णा-चामोर्शी तालुका जोडणारा मोठा पूल वैनगंगा नदीवर केंद्रीय निधीतून होणार असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे आता आष्टीजवळील पूल होण्याची आशा मावळली आहे. यामागे कारण म्हणजे १० किमी अंतरावर लगेच नवीन पुलाला मंजुरी मिळणार काय, तसेच सध्याचा पूल हा बुडीत पूल म्हणून नोंद आहे. त्यामुळे या पुलाच्या बांधकामाबद्दल अनेक शंका उपस्थित होत आहे. तेलंगणा सरकारतर्फे वैनगंगा नदीवर मोठे धरण बांधण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. त्यामुळे आष्टी येथील पूल पाण्याखाली राहण्याची शक्यता आहे. आष्टी शहरातून चंद्रपूर, सिरोंचा व साकोली-सिरोंचा हे दोन्ही महामार्ग जात असताना हा आडवाटेचा पूल बनवून गोंडपिपरी-आष्टी हा मार्ग बंद करण्याचा घाट दिसतो. जुन्या मार्गाला उलट खर्च कमी येऊ शकतो. जुन्या पुलाची उंची वाढवून सरळ असणारा मार्ग डावलून काय साध्य करायचे आहे हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. सिरोंचा-अहेरीपासून उपराजधानीला जोडणारा हा सरळ मार्ग आहे. दिवसातून महामंडळाच्या खासगी बसेसची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. वाहनाची संख्या वाढल्याने या मार्गावरील रहदारीही वाढलेली आहे. वैनगंगा नदीवरील पुलाची उंची वाढविण्याची मागणी जोर धरत आहे.