शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

२०० आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात

By admin | Updated: September 17, 2014 23:48 IST

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी अंतर्गत मुलचेरा तालुक्यातील मल्लेर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील लोहारा येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा आदिवासी विकास विभागाने बंद केली आहे.

अहेरी : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी अंतर्गत मुलचेरा तालुक्यातील मल्लेर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील लोहारा येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा आदिवासी विकास विभागाने बंद केली आहे. यामुळे या आश्रमशाळेत शिकणाऱ्या २०० च्यावर आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात असल्याचे दिसून येत आहे. सदर आश्रमशाळा पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी आदिवासी विकास प्रधान सचिवांकडे निवेदनाद्वारे केली आहे. लोहारा येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या शिक्षणाची सोय असून या आश्रमशाळेत लोहारा परिसरातील १० ते १५ गावातील २०० च्यावर आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत होते. आदिवासी विकास विभागाच्या अहेरी प्रकल्प कार्यालयातर्फे या आश्रमशाळेची तपासणी करण्यात आली. या आश्रमशाळेतील इयत्ता पहिली ते चवथीपर्यंतच्या वर्गाची पटसंख्या कमी आढळल्यामुळे या आश्रमशाळेतील १ ते ४ वर्ग बंद करण्यात आले. त्यानंतर या आश्रमशाळेतील इयत्ता १ ली ते १० वीपर्यंतचे सर्व वर्ग बंद करण्याचा प्रस्ताव अहेरीच्या प्रकल्प कार्यालयाने शासनाकडे पाठविला. त्यानंतर शासनाच्या मंजुरीनंतर आदिवासी विकास विभागाने लोहाराची आश्रमशाळा पूर्णपणे बंद केली. विशेष म्हणजे इयत्ता ५ वी ते १० वीपर्यंतची विद्यार्थी संख्या पुरेशी असतांना सर्वच वर्ग बंद करण्याचा चुकीचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आल्याचा आरोप पालकांनी निवेदनातून केला आहे. लोहारानजीकच्या १० ते १५ गावांपैकी एकाही गावात इयत्ता १ ली ते १० वीपर्यंतच्या शिक्षणाची सोय नाही, त्यामुळे या परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याच्या मार्गावर आहे. लोहारा येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील दाखल विद्यार्थ्यांचे अन्य शाळेत समायोजन करण्यात येऊ नये, लोहाराची आश्रमशाळा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व पालकांनी राज्याचे मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीचा ठरावही ग्रामसभेत घेण्यात आला आहे. अहेरीच्या प्रकल्प कार्यालयाने लोहाराची आश्रमशाळा पूर्ववत सुरू करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. मात्र लोहाराची आश्रमशाळा अद्यापही सुरू झाली नाही. अर्धे अधिक शैक्षणिक सत्र संपत आले आहे. आश्रमशाळा सुरू झाली नाही. त्यामुळे या शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मागणीचे निवेदन प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत पाठविण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)