शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

२०० आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात

By admin | Updated: September 17, 2014 23:48 IST

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी अंतर्गत मुलचेरा तालुक्यातील मल्लेर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील लोहारा येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा आदिवासी विकास विभागाने बंद केली आहे.

अहेरी : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी अंतर्गत मुलचेरा तालुक्यातील मल्लेर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील लोहारा येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा आदिवासी विकास विभागाने बंद केली आहे. यामुळे या आश्रमशाळेत शिकणाऱ्या २०० च्यावर आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात असल्याचे दिसून येत आहे. सदर आश्रमशाळा पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी आदिवासी विकास प्रधान सचिवांकडे निवेदनाद्वारे केली आहे. लोहारा येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या शिक्षणाची सोय असून या आश्रमशाळेत लोहारा परिसरातील १० ते १५ गावातील २०० च्यावर आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत होते. आदिवासी विकास विभागाच्या अहेरी प्रकल्प कार्यालयातर्फे या आश्रमशाळेची तपासणी करण्यात आली. या आश्रमशाळेतील इयत्ता पहिली ते चवथीपर्यंतच्या वर्गाची पटसंख्या कमी आढळल्यामुळे या आश्रमशाळेतील १ ते ४ वर्ग बंद करण्यात आले. त्यानंतर या आश्रमशाळेतील इयत्ता १ ली ते १० वीपर्यंतचे सर्व वर्ग बंद करण्याचा प्रस्ताव अहेरीच्या प्रकल्प कार्यालयाने शासनाकडे पाठविला. त्यानंतर शासनाच्या मंजुरीनंतर आदिवासी विकास विभागाने लोहाराची आश्रमशाळा पूर्णपणे बंद केली. विशेष म्हणजे इयत्ता ५ वी ते १० वीपर्यंतची विद्यार्थी संख्या पुरेशी असतांना सर्वच वर्ग बंद करण्याचा चुकीचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आल्याचा आरोप पालकांनी निवेदनातून केला आहे. लोहारानजीकच्या १० ते १५ गावांपैकी एकाही गावात इयत्ता १ ली ते १० वीपर्यंतच्या शिक्षणाची सोय नाही, त्यामुळे या परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याच्या मार्गावर आहे. लोहारा येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील दाखल विद्यार्थ्यांचे अन्य शाळेत समायोजन करण्यात येऊ नये, लोहाराची आश्रमशाळा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व पालकांनी राज्याचे मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीचा ठरावही ग्रामसभेत घेण्यात आला आहे. अहेरीच्या प्रकल्प कार्यालयाने लोहाराची आश्रमशाळा पूर्ववत सुरू करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. मात्र लोहाराची आश्रमशाळा अद्यापही सुरू झाली नाही. अर्धे अधिक शैक्षणिक सत्र संपत आले आहे. आश्रमशाळा सुरू झाली नाही. त्यामुळे या शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मागणीचे निवेदन प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत पाठविण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)