शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बाल विकास प्रकल्प वाढले मात्र निधी घटला

By admin | Updated: October 18, 2015 01:41 IST

एकात्मिक बाल विकास योजना सुरू होऊन ४० वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाला. या कालावधीत बाल विकास प्रकल्पाच्या संख्येत कित्येकपटीने वाढ झाली आहे.

एटापल्लीत मेळावा : रमेशचंद्र दहिवडे यांचा आरोपएटापल्ली : एकात्मिक बाल विकास योजना सुरू होऊन ४० वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाला. या कालावधीत बाल विकास प्रकल्पाच्या संख्येत कित्येकपटीने वाढ झाली आहे. मात्र त्या तुलनेत निधीत वाढ झाली नसल्याचा आरोप अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी केला आहे. अंगणवाडी महिलांचा मेळावा एटापल्ली येथे शुक्रवारी आयोजित करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सुमन गावळे होत्या. मेळाव्या दरम्यान अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. पुढे मार्गदर्शन करताना रमेशचंद्र दहिवडे म्हणाले की, २ आॅक्टोबर १९७५ रोजी देशातील केवळ ३७ प्रकल्पात ही योजना सुरू झाली. सद्यस्थितीत राज्यात ५५३ प्रकल्प व देशात ७ हजार ६३ प्रकल्पात बाल विकास योजना सुरू असून १३ लाख ५० हजार अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत. या योजनेच्या खर्चामध्ये केंद्र शासनाने प्रचंड कपात केली आहे. २०१३-१४ च्या बजेटमध्ये २७ हजार करोड रूपयांची तरतूद केली होती. ती आता २०१५-१६ मध्ये ८ हजार रूपयांवर आणली आहे. याचाच अर्थ बाल विकास योजना गुंडाळण्याच्या दृष्टीने केंद्र शासन प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला. एटापल्ली प्रकल्पात अंगणवाडी मदतनिसांच्या ४२ जागा दोन वर्षांपासून रिक्त आहेत, असाही आरोप दहिवडे यांनी केला. मेळावा यशस्वी करण्यासाठी उमा मेडीवार, तारा वैरागडे, गुलशन शेख, अनुसया झाडे, कविता मुलमुले यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)