शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

पालकमंत्र्यांच्या निष्क्रियतेमुळे निधी परत गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 01:13 IST

जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या निष्क्रियतेमुळे जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाकडून प्राप्त झालेला निधी खर्चाअभावी शासनाकडे परत गेला.

फौजदारी गुन्हा दाखल करा : धर्मरावबाबा आत्राम यांचा आरोपसिरोंचा : जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या निष्क्रियतेमुळे जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाकडून प्राप्त झालेला निधी खर्चाअभावी शासनाकडे परत गेला. परिणामी आदिवासी नागरिक विकासापासून वंचित राहिले. सुरजागड लोहप्रकल्प व मेडिगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पाच्या विषयावर पालकमंत्र्यांनी जनतेची प्रचंड दिशाभूल केली, असा आरोप राकाँचे ज्येष्ठ नेते तथा माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी रविवारी सिरोंचा येथे विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.धर्मरावबाबा आत्राम यांनी रविवारी सिरोंचा तालुक्याचा दौरा केला. पोचमपल्ली येथे जाऊन मेडिगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पस्थळाची पाहणी केली. त्यानंतर गावकऱ्यांशी चर्चा करताना या प्रकल्पाच्या विरोधात लवकरच सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येईल, असे धर्मरावबाबांनी सांगितले. या मोर्चासाठी राकाँचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.सुरजागड लोहपहाडी परिसरात सर्वोच्च न्यायालयाचे निकष डावलून तसेच पेसा कायद्याचे उल्लंघन करून येथे लोहखनिजाचे उत्खनन सुरू आहे. या ठिकाणी वनकायदा पायदळी तुडवून रस्ता तयार करण्यात आला आहे. सुरजागड लोह प्रकल्पाच्या मुद्यावर पालकमंत्री जनतेचे हित लक्षात न घेता कंपनीच्या समर्थनार्थ बोलत आहेत, असा आरोपही माजी राज्यमंत्री आत्राम यांनी पत्रकार परिषदेत केला. पालकमंत्र्यांच्या निष्क्रीयतेमुळे जिल्हा विकासाचा निधी परत गेल्यामुळे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आपण राज्यपालांकडे करणार आहोत, असेही धर्मरावबाबांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला राकाँचे सिरोंचा तालुकाध्यक्ष आकुला मल्लिकार्जुन, रायुकाँचे तालुकाध्यक्ष सतीश भोगे, अ‍ॅड. फिरोज खान, रूद्रशेट्टी कोंडय्या, रवी रालबंडीवार, सुरेंद्र अलोणे, रमजान खान, चिनन्ना दुर्गम आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)