शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
4
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
5
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
6
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
7
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
8
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
9
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
10
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
11
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
12
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
13
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
14
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
15
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
16
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
17
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
18
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
19
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
20
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू

पालकमंत्र्यांच्या निष्क्रियतेमुळे निधी परत गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 01:13 IST

जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या निष्क्रियतेमुळे जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाकडून प्राप्त झालेला निधी खर्चाअभावी शासनाकडे परत गेला.

फौजदारी गुन्हा दाखल करा : धर्मरावबाबा आत्राम यांचा आरोपसिरोंचा : जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या निष्क्रियतेमुळे जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाकडून प्राप्त झालेला निधी खर्चाअभावी शासनाकडे परत गेला. परिणामी आदिवासी नागरिक विकासापासून वंचित राहिले. सुरजागड लोहप्रकल्प व मेडिगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पाच्या विषयावर पालकमंत्र्यांनी जनतेची प्रचंड दिशाभूल केली, असा आरोप राकाँचे ज्येष्ठ नेते तथा माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी रविवारी सिरोंचा येथे विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.धर्मरावबाबा आत्राम यांनी रविवारी सिरोंचा तालुक्याचा दौरा केला. पोचमपल्ली येथे जाऊन मेडिगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पस्थळाची पाहणी केली. त्यानंतर गावकऱ्यांशी चर्चा करताना या प्रकल्पाच्या विरोधात लवकरच सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येईल, असे धर्मरावबाबांनी सांगितले. या मोर्चासाठी राकाँचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.सुरजागड लोहपहाडी परिसरात सर्वोच्च न्यायालयाचे निकष डावलून तसेच पेसा कायद्याचे उल्लंघन करून येथे लोहखनिजाचे उत्खनन सुरू आहे. या ठिकाणी वनकायदा पायदळी तुडवून रस्ता तयार करण्यात आला आहे. सुरजागड लोह प्रकल्पाच्या मुद्यावर पालकमंत्री जनतेचे हित लक्षात न घेता कंपनीच्या समर्थनार्थ बोलत आहेत, असा आरोपही माजी राज्यमंत्री आत्राम यांनी पत्रकार परिषदेत केला. पालकमंत्र्यांच्या निष्क्रीयतेमुळे जिल्हा विकासाचा निधी परत गेल्यामुळे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आपण राज्यपालांकडे करणार आहोत, असेही धर्मरावबाबांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला राकाँचे सिरोंचा तालुकाध्यक्ष आकुला मल्लिकार्जुन, रायुकाँचे तालुकाध्यक्ष सतीश भोगे, अ‍ॅड. फिरोज खान, रूद्रशेट्टी कोंडय्या, रवी रालबंडीवार, सुरेंद्र अलोणे, रमजान खान, चिनन्ना दुर्गम आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)