शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
4
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
5
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
6
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
7
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
8
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
9
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
10
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
11
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
13
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
14
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
15
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
16
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
17
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
18
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
19
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

पालकमंत्र्यांच्या निष्क्रियतेमुळे निधी परत गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 01:13 IST

जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या निष्क्रियतेमुळे जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाकडून प्राप्त झालेला निधी खर्चाअभावी शासनाकडे परत गेला.

फौजदारी गुन्हा दाखल करा : धर्मरावबाबा आत्राम यांचा आरोपसिरोंचा : जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या निष्क्रियतेमुळे जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाकडून प्राप्त झालेला निधी खर्चाअभावी शासनाकडे परत गेला. परिणामी आदिवासी नागरिक विकासापासून वंचित राहिले. सुरजागड लोहप्रकल्प व मेडिगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पाच्या विषयावर पालकमंत्र्यांनी जनतेची प्रचंड दिशाभूल केली, असा आरोप राकाँचे ज्येष्ठ नेते तथा माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी रविवारी सिरोंचा येथे विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.धर्मरावबाबा आत्राम यांनी रविवारी सिरोंचा तालुक्याचा दौरा केला. पोचमपल्ली येथे जाऊन मेडिगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पस्थळाची पाहणी केली. त्यानंतर गावकऱ्यांशी चर्चा करताना या प्रकल्पाच्या विरोधात लवकरच सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येईल, असे धर्मरावबाबांनी सांगितले. या मोर्चासाठी राकाँचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.सुरजागड लोहपहाडी परिसरात सर्वोच्च न्यायालयाचे निकष डावलून तसेच पेसा कायद्याचे उल्लंघन करून येथे लोहखनिजाचे उत्खनन सुरू आहे. या ठिकाणी वनकायदा पायदळी तुडवून रस्ता तयार करण्यात आला आहे. सुरजागड लोह प्रकल्पाच्या मुद्यावर पालकमंत्री जनतेचे हित लक्षात न घेता कंपनीच्या समर्थनार्थ बोलत आहेत, असा आरोपही माजी राज्यमंत्री आत्राम यांनी पत्रकार परिषदेत केला. पालकमंत्र्यांच्या निष्क्रीयतेमुळे जिल्हा विकासाचा निधी परत गेल्यामुळे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आपण राज्यपालांकडे करणार आहोत, असेही धर्मरावबाबांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला राकाँचे सिरोंचा तालुकाध्यक्ष आकुला मल्लिकार्जुन, रायुकाँचे तालुकाध्यक्ष सतीश भोगे, अ‍ॅड. फिरोज खान, रूद्रशेट्टी कोंडय्या, रवी रालबंडीवार, सुरेंद्र अलोणे, रमजान खान, चिनन्ना दुर्गम आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)