शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

एसडीओ कार्यालयावर मोर्चा

By admin | Updated: November 17, 2014 22:54 IST

अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील जवखेडा गावातील दलित कुटुंबाच्या तीन सदस्यांची समाज कंटकांनी निर्घृण हत्या केली. या घटनेला २० हून अधिक दिवसांचा कालावधी लोटत आहे.

अहेरी : अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील जवखेडा गावातील दलित कुटुंबाच्या तीन सदस्यांची समाज कंटकांनी निर्घृण हत्या केली. या घटनेला २० हून अधिक दिवसांचा कालावधी लोटत आहे. मात्र या हत्याकांडाच्या प्रमुख आरोपींना पोलिसांनी अद्यापही अटक केली नाही. पोलिसांच्या परिणामशून्य कारवाईमुळे आरोपी अद्यापही मोकाट फिरत आहेत. त्यामुळे दलित कुटुंबियांना संपविणाऱ्या नराधमांना त्वरित अटक करण्यात यावी, या मागणीसाठी अहेरी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर अनेक संघटनांनी शेकडोच्या संख्येने सोमवारी धडक मोर्चा काढला व आरोपींना त्वरित अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना एसटीओमार्फत दिलेल्या निवेदनातून केली. जवखेडा गावातील दलित कुटुंबाच्या तीन सदस्यांचा निर्घृण खून करून त्यांना अमानुषपणे विहिरीत फेकून देण्यात आले. मानवी जीवनाला काळिमा फासणारी सदर घटना आहे. या घटनेचा महाराष्ट्रातील अनेक संघटनांनी मार्चा, आंदोलन, करून निषेध नोंदविला व प्रकरणातील आरोपींना त्वरित अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. राज्यात सदर घटनेविषयी असंतोष वाढत असतांनाही पोलिसांना आरोपींना पकडण्यात अपयश आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करून आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जवखेडे गावाला भेट देऊन केवळ कुटुंबियांना आधार देण्याचा काम केला. मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याबाबत शासनाकडे कोणत्याही लोकप्रतिनिधींनी ठामपणे मागणी लावून धरली नाही. त्यामुळे आरोपींना त्वरित पकडून मृत्यूदंडाची शिक्षा करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून आंदोलनकर्त्यांनी केली आहे. निवेदन देतांना ज्ञान प्रसारक युवक मंडळ अहेरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आलापल्ली, प्रबुद्ध समाज संघ बुद्ध विहार नागेपल्ली, बहुउद्देशीय विकास संस्था आलापल्ली, रमाई महिला मंडळ आलापल्ली आदी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. उपविभागीय कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात तालुक्यातील अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)