शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

एसडीओ कार्यालयावर मोर्चा

By admin | Updated: November 17, 2014 22:54 IST

अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील जवखेडा गावातील दलित कुटुंबाच्या तीन सदस्यांची समाज कंटकांनी निर्घृण हत्या केली. या घटनेला २० हून अधिक दिवसांचा कालावधी लोटत आहे.

अहेरी : अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील जवखेडा गावातील दलित कुटुंबाच्या तीन सदस्यांची समाज कंटकांनी निर्घृण हत्या केली. या घटनेला २० हून अधिक दिवसांचा कालावधी लोटत आहे. मात्र या हत्याकांडाच्या प्रमुख आरोपींना पोलिसांनी अद्यापही अटक केली नाही. पोलिसांच्या परिणामशून्य कारवाईमुळे आरोपी अद्यापही मोकाट फिरत आहेत. त्यामुळे दलित कुटुंबियांना संपविणाऱ्या नराधमांना त्वरित अटक करण्यात यावी, या मागणीसाठी अहेरी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर अनेक संघटनांनी शेकडोच्या संख्येने सोमवारी धडक मोर्चा काढला व आरोपींना त्वरित अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना एसटीओमार्फत दिलेल्या निवेदनातून केली. जवखेडा गावातील दलित कुटुंबाच्या तीन सदस्यांचा निर्घृण खून करून त्यांना अमानुषपणे विहिरीत फेकून देण्यात आले. मानवी जीवनाला काळिमा फासणारी सदर घटना आहे. या घटनेचा महाराष्ट्रातील अनेक संघटनांनी मार्चा, आंदोलन, करून निषेध नोंदविला व प्रकरणातील आरोपींना त्वरित अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. राज्यात सदर घटनेविषयी असंतोष वाढत असतांनाही पोलिसांना आरोपींना पकडण्यात अपयश आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करून आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जवखेडे गावाला भेट देऊन केवळ कुटुंबियांना आधार देण्याचा काम केला. मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याबाबत शासनाकडे कोणत्याही लोकप्रतिनिधींनी ठामपणे मागणी लावून धरली नाही. त्यामुळे आरोपींना त्वरित पकडून मृत्यूदंडाची शिक्षा करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून आंदोलनकर्त्यांनी केली आहे. निवेदन देतांना ज्ञान प्रसारक युवक मंडळ अहेरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आलापल्ली, प्रबुद्ध समाज संघ बुद्ध विहार नागेपल्ली, बहुउद्देशीय विकास संस्था आलापल्ली, रमाई महिला मंडळ आलापल्ली आदी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. उपविभागीय कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात तालुक्यातील अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)