शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

१२ लाख शेतकरी साधणार मोफत संवाद

By admin | Updated: November 3, 2015 00:43 IST

बीएसएनएलने महाकृषी संचार योजनेंतर्गत शेतकरीवर्गासाठी तीन वेगवेगळे प्लॅन सादर केले होते. १ नोव्हेंबरपासून या तिन्ही प्लॅनचे एकत्रिकरण केले आहे.

कृषी प्लॅनचे एकत्रिकरण : नवीन योजनेचा शेतकऱ्यांना लाभगडचिरोली : बीएसएनएलने महाकृषी संचार योजनेंतर्गत शेतकरीवर्गासाठी तीन वेगवेगळे प्लॅन सादर केले होते. १ नोव्हेंबरपासून या तिन्ही प्लॅनचे एकत्रिकरण केले आहे. त्यामुळे राज्यभरातील १२ लाख शेतकरी एकमेकांसोबत मोफत संवाद साधू शकणार आहेत. शेतकऱ्यांना आपसात चर्चा करता यावी, त्याचबरोबर त्यांच्यावर मोबाईल बिलाचा अधिक भार पडू नये, या उद्देशाने बीएसएनएलने महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यात २००९ साली महाकृषी संचार योजना सुरू केली होती. या योजनेचे राज्यात एकूण १३ लाख ग्राहक आहेत. ही योजना तीन टप्प्यात राबविण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात १०९ रूपयात १ जीबी डाटा, ६ तास बीएसएनएलवरून बीएसएनएल व दीड तास बीएसएनएल ते अदर तसेच ५०० एसएमएस पाठविता येत होते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात १०८ चा प्लॅन सुरू करण्यात आला. या प्लॅनमध्ये बीएसएनएल ते बीएसएनएल ३ तास, इतर नेटवर्क २ तास, ४०० एसएमएस व २०० एमबी डाटा देण्यात येत होता. त्यानंतर २०१५ मध्ये १२८ चा प्लॅन आणला. सदर प्लॅनमध्येही ३ तास बीएसएनएल ते बीएसएनएल व १ तास इतर नेटवर्कवर बोलता येत होते. त्याचबरोबर ३०० एसएमएस व २०० एमबी डाटा दिला जात होता. या तिन्ही प्लॅनमध्ये पहिला १०९ रूपयांचा प्लॅन सर्वात लाभदायक होता. मात्र बीएसएनएलने १ नोव्हेंबरपासून या तिन्ही प्लॅनचे एकत्रिकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन प्लॅनमध्ये कृषी सीमच्या सर्व ग्राहकांना १४१ रूपयांचा इजी रिचार्ज मारावा लागणार आहे. यामध्ये ४५० मिनीटे बीएसएनएल ते बीएसएनएल व ५० मिनीटे इतर नेटवर्कवर बोलता येणार आहे. त्याचबरोबर ४०० एमबी डाटा व ५०० एसएमएस पाठविता येणार आहेत. यानंतर मात्र प्रती मिनीट ५० पैसे दर आकारला जाणार आहे. यापूर्वी एका कृषी प्लॅनमधील व्यक्तींना मोफत बोलता येत होते. मात्र दुसऱ्या कृषी प्लॅनमधील व्यक्तीला फोन करण्यासाठी मिनीटे कपात केली जात होती. यानंतर मात्र या तिन्ही कृषी प्लॅनमधील मोबाईलधारकांना १ नोव्हेंबरपासून मोफत बोलता येणार आहे. (प्रतिनिधी)