शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
2
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
3
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
4
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
5
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
6
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
7
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
8
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार
9
"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण
10
Hulk Hogan Death: 'बालपणीचा सुपरहिरो' प्रसिद्ध WWE स्टार हल्क होगनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
मग मृतांना निवडणुकीत मतदान करायला द्यायचं का? राहुल-तेजस्वींना निवडणूक आयोगाचा सवाल
12
VIDEO: ती आली अन् थेट त्याला बिलगली... चहल-महावशची एकमेकांना घट्ट मिठी, क्लिप व्हायरल
13
चक्क दारूच्या ट्रकवर राज्यामंत्र्याचे नाव, ४० लाखांची विदेशी दारू, सात आराेपींना घेतले ताब्यात
14
'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, 'मविआ'ला थेट फोटोच दाखवले
15
दिल्लीतील JNU मधील देवेंद्र फणडवीसांच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचं आंदोलन, महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी गुप्तचर संस्थेत नोकरी; मुंबई, नागपूरसाठी 'इतक्या' जागा राखीव!
17
Rishabh Pant Fifty : भारताच्या 'जखमी वाघा'ची डरकाळी! लढवय्या पंतनं ठोकली सॉलिड फिफ्टी
18
₹1600 वर पोहोचू शकतो इलेक्ट्रिक बस बनवणाऱ्या कंपनीचा शेअर, खरेदीसाठी उडालीय लोकांची झुंबड; करतोय मालामाल!
19
स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांना नाशिकच्या कोर्टात जामीन
20
वाघाच्या काळजाचा! जखमी असूनही इंग्लंडशी भिडला, मँचेस्टरमध्ये पंतची विक्रमी खेळी

१२ लाख शेतकरी साधणार मोफत संवाद

By admin | Updated: November 3, 2015 00:43 IST

बीएसएनएलने महाकृषी संचार योजनेंतर्गत शेतकरीवर्गासाठी तीन वेगवेगळे प्लॅन सादर केले होते. १ नोव्हेंबरपासून या तिन्ही प्लॅनचे एकत्रिकरण केले आहे.

कृषी प्लॅनचे एकत्रिकरण : नवीन योजनेचा शेतकऱ्यांना लाभगडचिरोली : बीएसएनएलने महाकृषी संचार योजनेंतर्गत शेतकरीवर्गासाठी तीन वेगवेगळे प्लॅन सादर केले होते. १ नोव्हेंबरपासून या तिन्ही प्लॅनचे एकत्रिकरण केले आहे. त्यामुळे राज्यभरातील १२ लाख शेतकरी एकमेकांसोबत मोफत संवाद साधू शकणार आहेत. शेतकऱ्यांना आपसात चर्चा करता यावी, त्याचबरोबर त्यांच्यावर मोबाईल बिलाचा अधिक भार पडू नये, या उद्देशाने बीएसएनएलने महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यात २००९ साली महाकृषी संचार योजना सुरू केली होती. या योजनेचे राज्यात एकूण १३ लाख ग्राहक आहेत. ही योजना तीन टप्प्यात राबविण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात १०९ रूपयात १ जीबी डाटा, ६ तास बीएसएनएलवरून बीएसएनएल व दीड तास बीएसएनएल ते अदर तसेच ५०० एसएमएस पाठविता येत होते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात १०८ चा प्लॅन सुरू करण्यात आला. या प्लॅनमध्ये बीएसएनएल ते बीएसएनएल ३ तास, इतर नेटवर्क २ तास, ४०० एसएमएस व २०० एमबी डाटा देण्यात येत होता. त्यानंतर २०१५ मध्ये १२८ चा प्लॅन आणला. सदर प्लॅनमध्येही ३ तास बीएसएनएल ते बीएसएनएल व १ तास इतर नेटवर्कवर बोलता येत होते. त्याचबरोबर ३०० एसएमएस व २०० एमबी डाटा दिला जात होता. या तिन्ही प्लॅनमध्ये पहिला १०९ रूपयांचा प्लॅन सर्वात लाभदायक होता. मात्र बीएसएनएलने १ नोव्हेंबरपासून या तिन्ही प्लॅनचे एकत्रिकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन प्लॅनमध्ये कृषी सीमच्या सर्व ग्राहकांना १४१ रूपयांचा इजी रिचार्ज मारावा लागणार आहे. यामध्ये ४५० मिनीटे बीएसएनएल ते बीएसएनएल व ५० मिनीटे इतर नेटवर्कवर बोलता येणार आहे. त्याचबरोबर ४०० एमबी डाटा व ५०० एसएमएस पाठविता येणार आहेत. यानंतर मात्र प्रती मिनीट ५० पैसे दर आकारला जाणार आहे. यापूर्वी एका कृषी प्लॅनमधील व्यक्तींना मोफत बोलता येत होते. मात्र दुसऱ्या कृषी प्लॅनमधील व्यक्तीला फोन करण्यासाठी मिनीटे कपात केली जात होती. यानंतर मात्र या तिन्ही कृषी प्लॅनमधील मोबाईलधारकांना १ नोव्हेंबरपासून मोफत बोलता येणार आहे. (प्रतिनिधी)