शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
11
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
12
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
13
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
14
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
15
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
16
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
17
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
18
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
19
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
20
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."

१ एप्रिलपासून घर, गाव, जिल्हा दारूमुक्त करा

By admin | Updated: April 1, 2015 01:32 IST

राज्य शासनाच्या निर्णयानुसार १ एप्रिल २०१५ पासून लगतच्या गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदीची अंमलबजावणी सुरू होत आहे.

गडचिरोली : राज्य शासनाच्या निर्णयानुसार १ एप्रिल २०१५ पासून लगतच्या गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदीची अंमलबजावणी सुरू होत आहे. वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर असा तीन जिल्ह्याचा दारूमुक्त झोन अस्तित्वात येणार आहे. चंद्रपूर जिल्हा दारूबंदीचे आपण सर्वांनी स्वागत केले पाहिजे. १ एप्रिल पासून सर्व जनतेनी आपले घर, गाव, जिल्हा दारूमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांनी केले आहे. कायदा जनतेच्या पाठीशी आहे. त्यामुळे वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या तीन जिल्ह्यातील महिलांनी दारूमुक्तीसाठी प्रयत्न करावेत. दारूबंदीच्या काटेकोर अंमलबजावणीवरच दारूबंदीचा फायदा होणार आहे. त्यामुळे गावातील महिलांनी एकत्र येऊन घरातील पूरूष, तंटामुक्त समिती, सरपंच, पोलीस निरिक्षक, आमदार, जिल्हाधिकारी व मंत्री अशा चढत्या क्रमांने आग्रह धरून आपला न्याय व हक्क मिळवून घ्यावा, दारूमुक्तीशिवाय समाजात महिला निर्भय, सुरक्षित, सुखी व स्वतंत्र होऊ शकत नाही. केवळ दारूबंदी करून थांबण्याची चूक यापूर्वीच्या शासनाने केली. ती चूक विद्यमान राज्य सरकारने करू नये. दारूबंदीमुळे बुडणाऱ्या शासकीय करापेक्षा लोकांना मिळणारा फायदा अधिक व्हायचा असल्यास वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या तीन जिल्ह्यात दारूबंदीची यशस्वी व प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी दारूबंदीच्या अंमलबजावणीचा संपूर्ण आराखडा आखून तो तत्काळ जाहीर करावा. अंमलबजावणीची ब्ल्यूप्रिंट देवतळे समितीच्या रूपाने यापूर्वीच तयार झालेली आहे. शासनाने तसा संपूर्ण कार्यक्रम अमलात आणावा, तीन जिल्हे मिळून दरवर्षी दारूवर एक हजार कोटी रूपये खर्च होतात. दारूबंदीने जनतेला फायदा होईल, असेही डॉ. अभय बंग यांनी म्हटले आहे.