शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

कर्ज पुनर्गठन योजनेत फसवणूक

By admin | Updated: May 7, 2017 01:12 IST

महाराष्ट्र शासनाने २०१५-१६ या वर्षात पीक कर्जाचे पुनर्गठण योजना राबविली. या योजनेंतर्गत पहिल्या वर्षी व्याज शासन भरणार होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी : २०१५-१६ मधील कर्जाची व्याजासह वसुली लोकमत न्यूज नेटवर्क देसाईगंज : महाराष्ट्र शासनाने २०१५-१६ या वर्षात पीक कर्जाचे पुनर्गठण योजना राबविली. या योजनेंतर्गत पहिल्या वर्षी व्याज शासन भरणार होते. मात्र बँका शेतकऱ्यांकडून व्याजासह रक्कम वसूल करीत असल्याचा गंभीर प्रकार जिल्ह्यात सुरू झाला आहे. त्यामुळे सदर योजना शेतकऱ्यांच्या मूळावर उठली असल्याचे बोलले जात आहे. शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाचे पुनर्गठण करण्यात आल्यानंतर त्याचे पाच हप्त्यात परतफेड करण्याची सवलत देण्यात आली होती. यात प्रथम वर्षाचे संपूर्ण व्याज शासन भरणार होते. याबाबत शासनाने २९ जुलै २०१५ व १३ मे २०१६ या वर्षात दोन वेळा शासन निर्णय काढले आहे. बँकांनी मात्र या शासन निर्णयाला केराची टोपली दाखविली आहे. अनेक शेतकऱ्यांकडून व्याजासह रक्कम वसूल केली आहे. मात्र बँकांवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. शासनाकडून आणखी नव्याने परिपत्रक काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बँका मात्र आपली रक्कम वसूल करीत आहेत. उर्वरित चार वर्षांचे थकीत कर्ज सहा टक्के दराने देय आहे. निसर्गाची अवकृपा झाल्यास पीक कर्जाचे हप्ते शेतकरी भरू शकणार नाही. थकीत कर्जाचे हप्ते न भरल्यास शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत जाणार आहे. शेतकऱ्यांना बँका जुलै ते आॅगस्ट या महिन्यात पीक कर्जाचे वाटप करून ३१ मार्चपूर्वी कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून संपूर्ण वर्षाचे व्याज वसूल केला जात असल्याचे प्रकार अनेक बँकांमध्ये दिसून येत आहे. आधीच दुष्काळाशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांची बँका फसवणूक करीत आहेत. बँकांच्या या आडमुठ्या धोरणामुळे शेतकरी आणखीच अडचणीत आला आहे. या सर्व प्रकारांची चौकशी करण्याची मागणी होत आहे. जिल्हाभरात असे प्रकार उघडकीस आले आहेत. देशाच्या आर्थिक विकासात हातभार लागावा, यासाठी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. मात्र या बँकाच शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याचे प्रकार पुढे येत आहेत. जिल्ह्यातील सर्वच बँकांची चौकशी केली जाईल. ज्या बँकांनी पुनर्गठीत कर्जमाफीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले नाही. अशा बँकांवर कारवाई करण्यासंदर्भात सहकाय आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करणार आहे. जिल्हाभरातील बँकांकडून माहिती मागविली जाईल. -पी. बी. पाटील, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा सहकारी संस्था गडचिरोली