शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

कर्ज पुनर्गठन योजनेत फसवणूक

By admin | Updated: May 7, 2017 01:12 IST

महाराष्ट्र शासनाने २०१५-१६ या वर्षात पीक कर्जाचे पुनर्गठण योजना राबविली. या योजनेंतर्गत पहिल्या वर्षी व्याज शासन भरणार होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी : २०१५-१६ मधील कर्जाची व्याजासह वसुली लोकमत न्यूज नेटवर्क देसाईगंज : महाराष्ट्र शासनाने २०१५-१६ या वर्षात पीक कर्जाचे पुनर्गठण योजना राबविली. या योजनेंतर्गत पहिल्या वर्षी व्याज शासन भरणार होते. मात्र बँका शेतकऱ्यांकडून व्याजासह रक्कम वसूल करीत असल्याचा गंभीर प्रकार जिल्ह्यात सुरू झाला आहे. त्यामुळे सदर योजना शेतकऱ्यांच्या मूळावर उठली असल्याचे बोलले जात आहे. शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाचे पुनर्गठण करण्यात आल्यानंतर त्याचे पाच हप्त्यात परतफेड करण्याची सवलत देण्यात आली होती. यात प्रथम वर्षाचे संपूर्ण व्याज शासन भरणार होते. याबाबत शासनाने २९ जुलै २०१५ व १३ मे २०१६ या वर्षात दोन वेळा शासन निर्णय काढले आहे. बँकांनी मात्र या शासन निर्णयाला केराची टोपली दाखविली आहे. अनेक शेतकऱ्यांकडून व्याजासह रक्कम वसूल केली आहे. मात्र बँकांवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. शासनाकडून आणखी नव्याने परिपत्रक काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बँका मात्र आपली रक्कम वसूल करीत आहेत. उर्वरित चार वर्षांचे थकीत कर्ज सहा टक्के दराने देय आहे. निसर्गाची अवकृपा झाल्यास पीक कर्जाचे हप्ते शेतकरी भरू शकणार नाही. थकीत कर्जाचे हप्ते न भरल्यास शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत जाणार आहे. शेतकऱ्यांना बँका जुलै ते आॅगस्ट या महिन्यात पीक कर्जाचे वाटप करून ३१ मार्चपूर्वी कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून संपूर्ण वर्षाचे व्याज वसूल केला जात असल्याचे प्रकार अनेक बँकांमध्ये दिसून येत आहे. आधीच दुष्काळाशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांची बँका फसवणूक करीत आहेत. बँकांच्या या आडमुठ्या धोरणामुळे शेतकरी आणखीच अडचणीत आला आहे. या सर्व प्रकारांची चौकशी करण्याची मागणी होत आहे. जिल्हाभरात असे प्रकार उघडकीस आले आहेत. देशाच्या आर्थिक विकासात हातभार लागावा, यासाठी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. मात्र या बँकाच शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याचे प्रकार पुढे येत आहेत. जिल्ह्यातील सर्वच बँकांची चौकशी केली जाईल. ज्या बँकांनी पुनर्गठीत कर्जमाफीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले नाही. अशा बँकांवर कारवाई करण्यासंदर्भात सहकाय आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करणार आहे. जिल्हाभरातील बँकांकडून माहिती मागविली जाईल. -पी. बी. पाटील, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा सहकारी संस्था गडचिरोली