शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
5
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
6
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
7
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
8
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
9
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
10
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
11
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
12
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
13
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
14
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
15
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
16
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
17
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
18
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
19
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
20
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन

भामरागड चौथ्या दिवशीही पुराच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 23:53 IST

छत्तीसगडकडून इंद्रावती नदीचा प्रवाह वाढल्याने पर्लकोटाचे पाणी पुढे जाण्याऐवजी गावात शिरले. त्यामुळे सोमवारीही २५ ते ३० टक्के भामरागड पाण्यात होते. घरांसोबतच या भागातील नागरिकांच्या शेतातील पीकही खरडून गेले आहे. शेतात अडकलेल्या काही नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने रिस्क बोटने जाऊन सुरक्षितपणे बाहेर काढले. या भागातील पाऊस मंदावला असला तरी छत्तीसगडकडून येणारी इंद्रावती नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहात आहे.

ठळक मुद्देअनेक कुटुंबांची राहोटी घराबाहेर : प्रशासनाने केली गावकऱ्यांची सर्व सोय

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : गेल्या चार दिवसांपासून पर्लकोटा नदीचे पाणी भामरागडमध्ये शिरल्याने बेघर झालेल्या नागरिकांना प्रशासनाने आश्रय देत त्यांची राहण्याची व जेवणाची आणि पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था केली आहे. पुराचे पाणी अजूनही गावातून निघालेले नसल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.छत्तीसगडकडून इंद्रावती नदीचा प्रवाह वाढल्याने पर्लकोटाचे पाणी पुढे जाण्याऐवजी गावात शिरले. त्यामुळे सोमवारीही २५ ते ३० टक्के भामरागड पाण्यात होते. घरांसोबतच या भागातील नागरिकांच्या शेतातील पीकही खरडून गेले आहे. शेतात अडकलेल्या काही नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने रिस्क बोटने जाऊन सुरक्षितपणे बाहेर काढले. या भागातील पाऊस मंदावला असला तरी छत्तीसगडकडून येणारी इंद्रावती नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहात आहे. त्यामुळे भामरागडमधील परिस्थिती गेल्या चार दिवसांपासून ‘जैसे थे’ आहे.आतापर्यंत ६०० लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात महसूल व पोलीस विभागाला यश आले आहे. बºयाच कुटुंबांचे कपडे, घरातील सामान वाहून गेले. चार दिवसांपासून दूरध्वनी, भ्रमणध्वणी, वीज पुरवठा खंडित होता. तहसीलदार कैलास अंडिल यांनी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केल्याने दरम्यान सोमवारी भ्रमणध्वनी आणि वीज पुरवठा सुरू करण्यात यश आले.तहसीलदार अंडिल यांच्यासह एसडीपीओ डॉ.कुणाल सोनवाने यांनी स्वत: हजर राहून ज्या-ज्या ठिकाणी लोकांना आश्रय दिला त्या ठिकाणी जेवणाची, राहण्याची व्यवस्था पाहिली. तसेच प्रयास महिला स्वयंसेवी संस्थेच्या पदाधिकारी शीला येंपलवार, भारती इष्टम, प्रीती मडावी, सुनंदा आत्राम, गौरी उईके, तारा मडावी, कुटो मडावी, अर्पणा सडमेक, ठुगे मडावी, निर्मला सडमेक आदींनी देखील हातभार लावला.अजूनही ते लोक पूरग्रस्त नाही!भामरागडवासिय पुरामुळे अभूतपूर्व अशा बिकट परिस्थितीत असताना अद्याप लोकप्रतिनिधींनी तिथे जाऊन पूरग्रस्तांना दिलासा दिलेला नाही. यापूर्वीच्या पुरानंतर आ.अम्ब्रिशराव आत्राम यांनी भेट दिली होती, पण आताच्या भिषण परिस्थितीनंतर पालकमंत्र्यांनी येऊन पूरग्रस्तांना कायमस्वरूपी दिलासा द्यावा अशी अपेक्षा केली जात आहे. विशेष म्हणजे अजूनही हे पूरग्रस्त शासकीय रेकॉर्डमध्ये ‘पूरग्रस्त’ नाहीत. त्यामुळे ते निकषानुसार मिळणाºया मदतीपासून वंचित आहेत.

टॅग्स :floodपूर