शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

भामरागड चौथ्या दिवशीही पुराच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 23:53 IST

छत्तीसगडकडून इंद्रावती नदीचा प्रवाह वाढल्याने पर्लकोटाचे पाणी पुढे जाण्याऐवजी गावात शिरले. त्यामुळे सोमवारीही २५ ते ३० टक्के भामरागड पाण्यात होते. घरांसोबतच या भागातील नागरिकांच्या शेतातील पीकही खरडून गेले आहे. शेतात अडकलेल्या काही नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने रिस्क बोटने जाऊन सुरक्षितपणे बाहेर काढले. या भागातील पाऊस मंदावला असला तरी छत्तीसगडकडून येणारी इंद्रावती नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहात आहे.

ठळक मुद्देअनेक कुटुंबांची राहोटी घराबाहेर : प्रशासनाने केली गावकऱ्यांची सर्व सोय

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : गेल्या चार दिवसांपासून पर्लकोटा नदीचे पाणी भामरागडमध्ये शिरल्याने बेघर झालेल्या नागरिकांना प्रशासनाने आश्रय देत त्यांची राहण्याची व जेवणाची आणि पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था केली आहे. पुराचे पाणी अजूनही गावातून निघालेले नसल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.छत्तीसगडकडून इंद्रावती नदीचा प्रवाह वाढल्याने पर्लकोटाचे पाणी पुढे जाण्याऐवजी गावात शिरले. त्यामुळे सोमवारीही २५ ते ३० टक्के भामरागड पाण्यात होते. घरांसोबतच या भागातील नागरिकांच्या शेतातील पीकही खरडून गेले आहे. शेतात अडकलेल्या काही नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने रिस्क बोटने जाऊन सुरक्षितपणे बाहेर काढले. या भागातील पाऊस मंदावला असला तरी छत्तीसगडकडून येणारी इंद्रावती नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहात आहे. त्यामुळे भामरागडमधील परिस्थिती गेल्या चार दिवसांपासून ‘जैसे थे’ आहे.आतापर्यंत ६०० लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात महसूल व पोलीस विभागाला यश आले आहे. बºयाच कुटुंबांचे कपडे, घरातील सामान वाहून गेले. चार दिवसांपासून दूरध्वनी, भ्रमणध्वणी, वीज पुरवठा खंडित होता. तहसीलदार कैलास अंडिल यांनी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केल्याने दरम्यान सोमवारी भ्रमणध्वनी आणि वीज पुरवठा सुरू करण्यात यश आले.तहसीलदार अंडिल यांच्यासह एसडीपीओ डॉ.कुणाल सोनवाने यांनी स्वत: हजर राहून ज्या-ज्या ठिकाणी लोकांना आश्रय दिला त्या ठिकाणी जेवणाची, राहण्याची व्यवस्था पाहिली. तसेच प्रयास महिला स्वयंसेवी संस्थेच्या पदाधिकारी शीला येंपलवार, भारती इष्टम, प्रीती मडावी, सुनंदा आत्राम, गौरी उईके, तारा मडावी, कुटो मडावी, अर्पणा सडमेक, ठुगे मडावी, निर्मला सडमेक आदींनी देखील हातभार लावला.अजूनही ते लोक पूरग्रस्त नाही!भामरागडवासिय पुरामुळे अभूतपूर्व अशा बिकट परिस्थितीत असताना अद्याप लोकप्रतिनिधींनी तिथे जाऊन पूरग्रस्तांना दिलासा दिलेला नाही. यापूर्वीच्या पुरानंतर आ.अम्ब्रिशराव आत्राम यांनी भेट दिली होती, पण आताच्या भिषण परिस्थितीनंतर पालकमंत्र्यांनी येऊन पूरग्रस्तांना कायमस्वरूपी दिलासा द्यावा अशी अपेक्षा केली जात आहे. विशेष म्हणजे अजूनही हे पूरग्रस्त शासकीय रेकॉर्डमध्ये ‘पूरग्रस्त’ नाहीत. त्यामुळे ते निकषानुसार मिळणाºया मदतीपासून वंचित आहेत.

टॅग्स :floodपूर