शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भामरागड चौथ्या दिवशीही पुराच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 23:53 IST

छत्तीसगडकडून इंद्रावती नदीचा प्रवाह वाढल्याने पर्लकोटाचे पाणी पुढे जाण्याऐवजी गावात शिरले. त्यामुळे सोमवारीही २५ ते ३० टक्के भामरागड पाण्यात होते. घरांसोबतच या भागातील नागरिकांच्या शेतातील पीकही खरडून गेले आहे. शेतात अडकलेल्या काही नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने रिस्क बोटने जाऊन सुरक्षितपणे बाहेर काढले. या भागातील पाऊस मंदावला असला तरी छत्तीसगडकडून येणारी इंद्रावती नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहात आहे.

ठळक मुद्देअनेक कुटुंबांची राहोटी घराबाहेर : प्रशासनाने केली गावकऱ्यांची सर्व सोय

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : गेल्या चार दिवसांपासून पर्लकोटा नदीचे पाणी भामरागडमध्ये शिरल्याने बेघर झालेल्या नागरिकांना प्रशासनाने आश्रय देत त्यांची राहण्याची व जेवणाची आणि पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था केली आहे. पुराचे पाणी अजूनही गावातून निघालेले नसल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.छत्तीसगडकडून इंद्रावती नदीचा प्रवाह वाढल्याने पर्लकोटाचे पाणी पुढे जाण्याऐवजी गावात शिरले. त्यामुळे सोमवारीही २५ ते ३० टक्के भामरागड पाण्यात होते. घरांसोबतच या भागातील नागरिकांच्या शेतातील पीकही खरडून गेले आहे. शेतात अडकलेल्या काही नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने रिस्क बोटने जाऊन सुरक्षितपणे बाहेर काढले. या भागातील पाऊस मंदावला असला तरी छत्तीसगडकडून येणारी इंद्रावती नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहात आहे. त्यामुळे भामरागडमधील परिस्थिती गेल्या चार दिवसांपासून ‘जैसे थे’ आहे.आतापर्यंत ६०० लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात महसूल व पोलीस विभागाला यश आले आहे. बºयाच कुटुंबांचे कपडे, घरातील सामान वाहून गेले. चार दिवसांपासून दूरध्वनी, भ्रमणध्वणी, वीज पुरवठा खंडित होता. तहसीलदार कैलास अंडिल यांनी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केल्याने दरम्यान सोमवारी भ्रमणध्वनी आणि वीज पुरवठा सुरू करण्यात यश आले.तहसीलदार अंडिल यांच्यासह एसडीपीओ डॉ.कुणाल सोनवाने यांनी स्वत: हजर राहून ज्या-ज्या ठिकाणी लोकांना आश्रय दिला त्या ठिकाणी जेवणाची, राहण्याची व्यवस्था पाहिली. तसेच प्रयास महिला स्वयंसेवी संस्थेच्या पदाधिकारी शीला येंपलवार, भारती इष्टम, प्रीती मडावी, सुनंदा आत्राम, गौरी उईके, तारा मडावी, कुटो मडावी, अर्पणा सडमेक, ठुगे मडावी, निर्मला सडमेक आदींनी देखील हातभार लावला.अजूनही ते लोक पूरग्रस्त नाही!भामरागडवासिय पुरामुळे अभूतपूर्व अशा बिकट परिस्थितीत असताना अद्याप लोकप्रतिनिधींनी तिथे जाऊन पूरग्रस्तांना दिलासा दिलेला नाही. यापूर्वीच्या पुरानंतर आ.अम्ब्रिशराव आत्राम यांनी भेट दिली होती, पण आताच्या भिषण परिस्थितीनंतर पालकमंत्र्यांनी येऊन पूरग्रस्तांना कायमस्वरूपी दिलासा द्यावा अशी अपेक्षा केली जात आहे. विशेष म्हणजे अजूनही हे पूरग्रस्त शासकीय रेकॉर्डमध्ये ‘पूरग्रस्त’ नाहीत. त्यामुळे ते निकषानुसार मिळणाºया मदतीपासून वंचित आहेत.

टॅग्स :floodपूर