शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
5
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
6
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
7
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
8
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
9
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
12
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
13
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
14
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
15
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
16
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
17
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
18
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
19
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
20
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...

आर्थिक उन्नतीसाठी कामगारांना चार कोटींची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 05:00 IST

देशाच्या विकासात बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांचे विशेष योगदान आहे. मात्र यातील बहुतांश कामगार असंघटीत असल्याने त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे काम संपल्यानंतर अत्यंत हलाखीचे जीवन या कामगारांच्या कुटुंबाला जगावे लागते. बांधकाम क्षेत्रातील कामगार शेतकऱ्याप्रमाणेच गरीब व कर्जबाजारी असल्याने शासनाने या वर्गाच्या विकासासाठी विविध योजना सुरू केल्या.

ठळक मुद्देसन्मान योजना : असंघटित क्षेत्रातील मजुरांना अर्थसहाय्य

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : असंघटित क्षेत्रात कामगारांसाठी करणाऱ्या कामगार मंडळामार्फत विविध योजना राबविल्या जातात. २०१९-२० या आर्थिक वर्षात ७ हजार ३४ कामगारांना सुमारे ३ कोटी ८३ लाख ५८ हजार रुपयांची विविध स्वरूपात मदत देणात आली आहे.देशाच्या विकासात बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांचे विशेष योगदान आहे. मात्र यातील बहुतांश कामगार असंघटीत असल्याने त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे काम संपल्यानंतर अत्यंत हलाखीचे जीवन या कामगारांच्या कुटुंबाला जगावे लागते. बांधकाम क्षेत्रातील कामगार शेतकऱ्याप्रमाणेच गरीब व कर्जबाजारी असल्याने शासनाने या वर्गाच्या विकासासाठी विविध योजना सुरू केल्या.केंद्र शासनाने अटल विश्वकर्मा सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत दगडकाम, फरशी, रंगकाम, सूतार काम, नाली बांधणी, प्लम्बिंग, ईलेक्ट्रीशीयन, विद्युतकाम, वातानुकुलीत यंत्रणेचे काम, सुरक्षा उपकरणांचे काम, विटांचे काम, सौरउर्जेशी निगडीत काम आदी ठिकाणी कामे करणाºया मजुरांना लाभ दिला जातो.महाराष्टÑ इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या वतीने जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयामार्फत योजनांचा लाभ दिला जाते. आठ महिन्यांच्या कालावधीत ७ हजार ३४ लाभार्थ्यांना ३ कोटी ८३ लाख रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे.सात हजार कामगारांना प्रत्येकी पाच हजाराचे अर्थसहाय्यकामगार कार्यालयात नोंदणी झाल्यानंतर अवजारे व साहित्य खरेदीसाठी पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य कामगार कार्यालयामार्फत दिले जाते. ६ हजार ८०० लाभार्थ्यांना ३४ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. नगदी पैसे मिळत असल्याने कामगारांमध्ये या योजनेबाबत विशेष आकर्षण आहे.पहिल्या विवाहासाठी २२ कामगारांना अर्थसहाय्यअटल विश्वकर्मा योजनेंतर्गत नोंदणी असलेल्या कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी ३० हजार रुपये देण्याची तरतूद आहे. गडचिरोली जिल्ह्यातील २२ नवविवाहित कामगारांना प्रत्येकी ३० हजार रुपये असे एकूण ६ लाख ६० हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात आले आहे.नैसर्गिक प्रसुतीसाठी १५ हजार रुपये व शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी २० हजार रुपये देण्याची तरतूद आहे. ३६ महिला कामगारांना याचा लाभ देण्यात आला आहे. यावर ७ लाख ६५ हजार रुपये खर्च झाले आहेत.

टॅग्स :Labourकामगार