शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

आर्थिक उन्नतीसाठी कामगारांना चार कोटींची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 05:00 IST

देशाच्या विकासात बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांचे विशेष योगदान आहे. मात्र यातील बहुतांश कामगार असंघटीत असल्याने त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे काम संपल्यानंतर अत्यंत हलाखीचे जीवन या कामगारांच्या कुटुंबाला जगावे लागते. बांधकाम क्षेत्रातील कामगार शेतकऱ्याप्रमाणेच गरीब व कर्जबाजारी असल्याने शासनाने या वर्गाच्या विकासासाठी विविध योजना सुरू केल्या.

ठळक मुद्देसन्मान योजना : असंघटित क्षेत्रातील मजुरांना अर्थसहाय्य

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : असंघटित क्षेत्रात कामगारांसाठी करणाऱ्या कामगार मंडळामार्फत विविध योजना राबविल्या जातात. २०१९-२० या आर्थिक वर्षात ७ हजार ३४ कामगारांना सुमारे ३ कोटी ८३ लाख ५८ हजार रुपयांची विविध स्वरूपात मदत देणात आली आहे.देशाच्या विकासात बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांचे विशेष योगदान आहे. मात्र यातील बहुतांश कामगार असंघटीत असल्याने त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे काम संपल्यानंतर अत्यंत हलाखीचे जीवन या कामगारांच्या कुटुंबाला जगावे लागते. बांधकाम क्षेत्रातील कामगार शेतकऱ्याप्रमाणेच गरीब व कर्जबाजारी असल्याने शासनाने या वर्गाच्या विकासासाठी विविध योजना सुरू केल्या.केंद्र शासनाने अटल विश्वकर्मा सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत दगडकाम, फरशी, रंगकाम, सूतार काम, नाली बांधणी, प्लम्बिंग, ईलेक्ट्रीशीयन, विद्युतकाम, वातानुकुलीत यंत्रणेचे काम, सुरक्षा उपकरणांचे काम, विटांचे काम, सौरउर्जेशी निगडीत काम आदी ठिकाणी कामे करणाºया मजुरांना लाभ दिला जातो.महाराष्टÑ इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या वतीने जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयामार्फत योजनांचा लाभ दिला जाते. आठ महिन्यांच्या कालावधीत ७ हजार ३४ लाभार्थ्यांना ३ कोटी ८३ लाख रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे.सात हजार कामगारांना प्रत्येकी पाच हजाराचे अर्थसहाय्यकामगार कार्यालयात नोंदणी झाल्यानंतर अवजारे व साहित्य खरेदीसाठी पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य कामगार कार्यालयामार्फत दिले जाते. ६ हजार ८०० लाभार्थ्यांना ३४ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. नगदी पैसे मिळत असल्याने कामगारांमध्ये या योजनेबाबत विशेष आकर्षण आहे.पहिल्या विवाहासाठी २२ कामगारांना अर्थसहाय्यअटल विश्वकर्मा योजनेंतर्गत नोंदणी असलेल्या कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी ३० हजार रुपये देण्याची तरतूद आहे. गडचिरोली जिल्ह्यातील २२ नवविवाहित कामगारांना प्रत्येकी ३० हजार रुपये असे एकूण ६ लाख ६० हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात आले आहे.नैसर्गिक प्रसुतीसाठी १५ हजार रुपये व शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी २० हजार रुपये देण्याची तरतूद आहे. ३६ महिला कामगारांना याचा लाभ देण्यात आला आहे. यावर ७ लाख ६५ हजार रुपये खर्च झाले आहेत.

टॅग्स :Labourकामगार