शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

साडेचार हजार कुटुंबांना १०० दिवसांचा रोजगार मिळाला

By admin | Updated: February 7, 2017 00:43 IST

२०१६-१७ या आर्थिक वर्षात जानेवारी महिन्यापर्यंत जिल्हाभरातील सुमारे ४ हजार ५८२ कुटुंबांना १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध झाला आहे.

रोहयो काम : धानाचा हंगाम संपल्याने मागणी वाढलीगडचिरोली : २०१६-१७ या आर्थिक वर्षात जानेवारी महिन्यापर्यंत जिल्हाभरातील सुमारे ४ हजार ५८२ कुटुंबांना १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध झाला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना केंद्र शासनाची अत्यंत महत्त्वपूर्ण व महत्त्वकांक्षी योजना आहे. ज्या कालावधीत ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध राहत नाही. अशा कालावधीत नागरिकांच्या मागणीनुसार रोजगार हमी योजनेची कामे सुरू केली जातात. नागरिकांची मागणी होताच रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी काही कामे आधीच मंजूर करून त्यांना तांत्रिक मान्यताही प्रधान केली जाते. गडचिरोली जिल्ह्यात विशेष करून जून ते नोव्हेंबर या कालावधीत धान पिकाच्या हंगामात रोजगार उपलब्ध होतो. त्यानंतर मात्र रोजगारासाठी भटकंतीच करावी लागते. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात रोहयोचे विशेष महत्त्व आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला किमान १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देण्याचे बंधन आहे. रोजगार उपलब्ध न झाल्यास बेरोजगारी भत्ता द्यावा लागतो. धानाचा हंगाम संपताच रोहयो कामांची मागणी सुरू होते. गडचिरोली जिल्ह्यात एप्रिल २०१६ ते जानेवारी २०१७ या कालावधीत सुमारे ४ हजार ५८२ कुटुंबांना १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध झाला आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देण्यात गडचिरोली जिल्हा पिछाडीवर असल्याचे दिसून येते. अनेक जिल्ह्यांनी पाच हजारांपेक्षा अधिक कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.दुर्गम भागातील अनेक नागरिकांना रोजगार हमी योजनेच्या कामाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांच्याकडून कामाची मागणी पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. ग्रामसेवकही स्वत:हून काम देण्यास तयार होत नाही. या सर्व गोंधळात रोहयोसाठी निधी उपलब्ध असूनही कामे सुरू केली जात नाही. जिल्ह्याच्या रोहयोचा बजेट जवळपास ५०० कोटी रूपयांचा आहे. मात्र यातील अर्धे अधिक पैसे दरवर्षी परत जातात. (नगर प्रतिनिधी)बेरोजगारी भत्त्याबाबत मजूर अनभिज्ञरोहयो कामाची मागणी करूनही रोजगार उपलब्ध न झाल्यास संबंधित मजुराला बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद रोजगार हमी कायद्यात करण्यात आली आहे. मात्र या नियमाबाबत बहुतांश मजूर अनभिज्ञ असल्याचे दिसून येते. कामाची मागणी करूनही बहुतांश ग्रामपंचायती व विभाग रोजगार उपलब्ध करून देत नाही. त्याचबरोबर नियमानुसार बेरोजगारी भत्ताही देत नाही. मात्र याबाबतची वरिष्ठस्तरावर तक्रार मजुरांकडून केली जात नाही. बेरोजगारी भत्ता मिळण्याबाबतची व्यापक जनजागृती करण्याची गरज आहे.