शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
3
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
4
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
5
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
6
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
7
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
8
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
9
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
10
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
11
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
12
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
13
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
14
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
15
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
16
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
17
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
18
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
19
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
20
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?

‘त्या’ आरोपींना एकदा माफ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 06:00 IST

गेल्या १ मे रोजी कुरखेडा उपविभागांतर्गत येणाऱ्या जांभुळखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरूंग स्फोट घडविला होता. त्यात १५ पोलीस जवानांना शहीद व्हावे लागले. या प्रकरणात नक्षलवाद्यांना सहकार्य केल्याप्रकरणी लवारी गावातील ६ युवकांना पोलिसांनी अटक केली. तेव्हापासून ते युवक न्यायालयीन कोठडीत आहेत.

ठळक मुद्देलवारीवासीयांची गळ : जांभुळखेडा भूसुरूंग प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चार महिन्यांपूर्वीच्या जांभुळखेडा भूसुरूंग स्फोट प्रकरणात अटकेत असलेल्या लवारी गावातील ६ आरोपींनी नक्षलवाद्यांना साथ देणे ही त्यांची चूक होती. भूलथापांना बळी पडून गावातील हे लोक त्यांच्या आहारी गेले. पण यापुढे आम्ही गावात नक्षलवाद्यांना पायही ठेवू देणार नाही. मात्र एकदा गावातील त्या युवकांना माफ करा, अशी विनंती लवारीतील ४९ गावकऱ्यांनी शुक्रवारी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे निवेदनातून केली.गेल्या १ मे रोजी कुरखेडा उपविभागांतर्गत येणाऱ्या जांभुळखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरूंग स्फोट घडविला होता. त्यात १५ पोलीस जवानांना शहीद व्हावे लागले. या प्रकरणात नक्षलवाद्यांना सहकार्य केल्याप्रकरणी लवारी गावातील ६ युवकांना पोलिसांनी अटक केली. तेव्हापासून ते युवक न्यायालयीन कोठडीत आहेत.अटकेत असलेल्या युवकांमुळे त्यांच्या कुटुंबियांवर मोठे संकट कोसळले आहे. एका युवकाचे शिक्षण अर्धवट राहिले आहे, अशी अनेक कारणे सांगत लवारीतील गावकरी आणि आरोपींच्या कुटुंबियांनी त्यांना एकदा माफी देण्याची गळ घातली. यावेळी त्यांनी नक्षलवाद्यांमुळे लवारी गावातील आदिवासी समाजातील तरुण पिढी बर्बाद होत असल्याचे आणि ते लोक स्वत:च्या फायद्यासाठी आमच्या मुलांचा वापर करत असल्याचे पोलीस अधीक्षकांना सांगितले. मात्र यापुढे असे होऊ देणार नाही, असा शब्द त्यांनी दिला.यावेळी पोलीस अधीक्षकांनीही त्यांना नक्षलवाद्यांच्या भूलथापांना बळी पडणाऱ्यांचे किती हाल होतात हे गावकऱ्यांना समजावून सांगितले.कायदेशिर मार्गाने शक्य ती मदत करणारआमची लढाई गावकऱ्यांशी नाहीच, पण त्यांनी नक्षलवाद्यांना साथ देऊन आपले जीवन व्यर्थ न घालवता विधायक आणि विकासात्मक काम करणाऱ्यांना साथ द्यावी ही आमची अपेक्षा आहे. त्या भूसुरूंग स्फोटात १५ पोलीस जवानांना शहीद व्हावे लागले. त्यामुळे त्या गंभीर गुन्ह्यासाठी त्यांना कायदेशिर बाबींना तोंड द्यावेच लागेल. पण गावकरी जर आता बोलत असल्याप्रमाणे आपल्या वागणुकीत बदल करून नक्षलवाद्यांना संपूर्ण गावबंदी करणार असतील, पोलिसांना त्यांच्या कामात सहकार्य करणार असतील तर आम्हीही त्यांना कायदेशिर मार्गाने शक्य तेवढी मदत करू, असे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.ग्रामसभेत घेणार नक्षल गावबंदीचा ठरावनक्षलवाद्यांमुळे गावावर आलेले संकट यापुढे येऊ नये म्हणून गावकरी स्वयंस्फूर्तीने पुढे आले आहेत. लवकरच ग्रामसभा घेऊन नक्षलवाद्यांना आमच्या गावात आम्ही पाय ठेवू देणार नाही. तसेच ‘नक्षल गावबंदीचा’ ठराव ग्रामसभेत घेणार असल्याची माहिती गावकऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना दिली. गावाच्या विकासासाठी पोलीस दलाने जनजागरण मेळाव्याचे आयोजन करावे, असे पत्र पुराडा पोलीस स्टेशनला दिले असल्याचेही गावकºयांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी