शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

‘त्या’ आरोपींना एकदा माफ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 06:00 IST

गेल्या १ मे रोजी कुरखेडा उपविभागांतर्गत येणाऱ्या जांभुळखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरूंग स्फोट घडविला होता. त्यात १५ पोलीस जवानांना शहीद व्हावे लागले. या प्रकरणात नक्षलवाद्यांना सहकार्य केल्याप्रकरणी लवारी गावातील ६ युवकांना पोलिसांनी अटक केली. तेव्हापासून ते युवक न्यायालयीन कोठडीत आहेत.

ठळक मुद्देलवारीवासीयांची गळ : जांभुळखेडा भूसुरूंग प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चार महिन्यांपूर्वीच्या जांभुळखेडा भूसुरूंग स्फोट प्रकरणात अटकेत असलेल्या लवारी गावातील ६ आरोपींनी नक्षलवाद्यांना साथ देणे ही त्यांची चूक होती. भूलथापांना बळी पडून गावातील हे लोक त्यांच्या आहारी गेले. पण यापुढे आम्ही गावात नक्षलवाद्यांना पायही ठेवू देणार नाही. मात्र एकदा गावातील त्या युवकांना माफ करा, अशी विनंती लवारीतील ४९ गावकऱ्यांनी शुक्रवारी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे निवेदनातून केली.गेल्या १ मे रोजी कुरखेडा उपविभागांतर्गत येणाऱ्या जांभुळखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरूंग स्फोट घडविला होता. त्यात १५ पोलीस जवानांना शहीद व्हावे लागले. या प्रकरणात नक्षलवाद्यांना सहकार्य केल्याप्रकरणी लवारी गावातील ६ युवकांना पोलिसांनी अटक केली. तेव्हापासून ते युवक न्यायालयीन कोठडीत आहेत.अटकेत असलेल्या युवकांमुळे त्यांच्या कुटुंबियांवर मोठे संकट कोसळले आहे. एका युवकाचे शिक्षण अर्धवट राहिले आहे, अशी अनेक कारणे सांगत लवारीतील गावकरी आणि आरोपींच्या कुटुंबियांनी त्यांना एकदा माफी देण्याची गळ घातली. यावेळी त्यांनी नक्षलवाद्यांमुळे लवारी गावातील आदिवासी समाजातील तरुण पिढी बर्बाद होत असल्याचे आणि ते लोक स्वत:च्या फायद्यासाठी आमच्या मुलांचा वापर करत असल्याचे पोलीस अधीक्षकांना सांगितले. मात्र यापुढे असे होऊ देणार नाही, असा शब्द त्यांनी दिला.यावेळी पोलीस अधीक्षकांनीही त्यांना नक्षलवाद्यांच्या भूलथापांना बळी पडणाऱ्यांचे किती हाल होतात हे गावकऱ्यांना समजावून सांगितले.कायदेशिर मार्गाने शक्य ती मदत करणारआमची लढाई गावकऱ्यांशी नाहीच, पण त्यांनी नक्षलवाद्यांना साथ देऊन आपले जीवन व्यर्थ न घालवता विधायक आणि विकासात्मक काम करणाऱ्यांना साथ द्यावी ही आमची अपेक्षा आहे. त्या भूसुरूंग स्फोटात १५ पोलीस जवानांना शहीद व्हावे लागले. त्यामुळे त्या गंभीर गुन्ह्यासाठी त्यांना कायदेशिर बाबींना तोंड द्यावेच लागेल. पण गावकरी जर आता बोलत असल्याप्रमाणे आपल्या वागणुकीत बदल करून नक्षलवाद्यांना संपूर्ण गावबंदी करणार असतील, पोलिसांना त्यांच्या कामात सहकार्य करणार असतील तर आम्हीही त्यांना कायदेशिर मार्गाने शक्य तेवढी मदत करू, असे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.ग्रामसभेत घेणार नक्षल गावबंदीचा ठरावनक्षलवाद्यांमुळे गावावर आलेले संकट यापुढे येऊ नये म्हणून गावकरी स्वयंस्फूर्तीने पुढे आले आहेत. लवकरच ग्रामसभा घेऊन नक्षलवाद्यांना आमच्या गावात आम्ही पाय ठेवू देणार नाही. तसेच ‘नक्षल गावबंदीचा’ ठराव ग्रामसभेत घेणार असल्याची माहिती गावकऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना दिली. गावाच्या विकासासाठी पोलीस दलाने जनजागरण मेळाव्याचे आयोजन करावे, असे पत्र पुराडा पोलीस स्टेशनला दिले असल्याचेही गावकºयांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी