शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
4
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
5
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
6
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
7
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
8
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
9
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
10
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
11
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
12
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
13
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
14
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
15
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
16
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
17
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
18
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
19
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
20
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
Daily Top 2Weekly Top 5

वादळानंतर डोक्यावर मरण घेऊन राहताहेत वन कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 22:55 IST

आलापल्ली येथे झालेल्या वादळामुळे वन विभागाच्या अनेक निवासस्थानांवरील छप्पर व टिन उडून गेले. मात्र या घटनेला सहा दिवसांचा कालावधी उलटूनही वन विभागाने निवासस्थाने दुरूस्तीच्या कामाला सुरूवात केली नाही. निवासस्थानांवर ताडपत्री झाकून आश्रय घेतला आहे.

ठळक मुद्देआलापल्ली येथील स्थिती : निवासस्थानांना ताडपत्र्यांचा आधार

लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : आलापल्ली येथे झालेल्या वादळामुळे वन विभागाच्या अनेक निवासस्थानांवरील छप्पर व टिन उडून गेले. मात्र या घटनेला सहा दिवसांचा कालावधी उलटूनही वन विभागाने निवासस्थाने दुरूस्तीच्या कामाला सुरूवात केली नाही. निवासस्थानांवर ताडपत्री झाकून आश्रय घेतला आहे.आलापल्लीसह परिसराला १६ मे रोजी वादळाचा जोरदार तडाखा बसला होता. या वादळामुळे अनेकांच्या घरावरील छत उडून गेले. या वादळाचा सर्वाधिक फटका वन विभागाच्या वसाहतीला बसला. वन विभागाच्या वसाहतीतील बहुतांश घरे टिनाची आहेत. १६ मे रोजी झालेल्या वादळात जवळपास २० निवासस्थानांवरील छतासह टिन उडून गेले. त्यामुळे घर पूर्णपणे उघडे पडले. दुसऱ्याच दिवशी मुख्य वनसंरक्षक येटबॉन, आलापल्ली वन विभागाचे उपवनसंरक्षक सी. आर. तांबे, उपविभागीय वनाधिकारी रवी अग्रवाल, सहायक उपवनसंरक्षक एच. जी. मडावी, आलापल्लीचे वन परिक्षेत्राधिकारी किरण पाटील यांनी वसाहतीला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. मुख्य वनसंरक्षकांनी निवासस्थाने तत्काळ दुरूस्त करण्याचे निर्देश दिले. मात्र आता सहा दिवसांचा कालावधी उलटूनही घरांच्या दुरूस्तीला सुरूवात झाली नाही. ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी काही वन कर्मचाºयांनी तात्पुरती ताडपत्री झाकली आहे. मात्र दिवसा प्रचंड उन्हाचा त्रास वनकर्मचाºयांच्या कुटुंबियांना सहन करावा लागत आहे. पावसाळ्याचे दिवस जवळ आले आहेत. त्यामुळे वादळी वाºयासह पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाऊस झाल्यास झोपण्याचा व राहण्याचा प्रश्न कुटुंबासमोर निर्माण झाला आहे. त्याचबरोबर घरातील संपूर्ण साहित्य भिजण्याची शक्यता आहे.दिवसभराच्या उन्हामुळे वनकर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची प्रकृती बिघडत आहे. त्यांना उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वादळ झाल्यास सदर ताडपत्री कधीही उडून जाऊ शकते. पाऊस झाल्यास मोठे नुकसान होणार असल्याने वन कर्मचाºयांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्य वनसंरक्षकांनी या गंभीर बाबीकडे स्वत: लक्ष घालून निवासस्थानांची दुरूस्ती करून द्यावी, अशी मागणी होत आहे.