शहरं
Join us  
Trending Stories
1
डोंबिवलीत मनसेला धक्का, शहराध्यक्षाने अचानक अर्ज घेतला मागे; भाजपा उमेदवार बिनविरोध विजयी
2
Thane Municipal Corporation Election 2026 : ठाण्यात एकनाथ शिंदेंचा मोठा धमाका! शिवसेनेचा तिसरा नगरसेवक बिनविरोध विजयी
3
'तुम्ही दहशत पसरवली, तर भारत गप्प बसणार नाही', जयशंकर यांचा पाकिस्तानवर निशाणा
4
इराणमध्ये सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न, १०० बंदुका जप्त; खामेनींच्या सैन्याने सादर केले पुरावे
5
दशकभराच्या प्रवासाचा अखेर! टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार; चाहत्यांना मोठा धक्का
6
तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात जाणार; मनसे स्थापनेनंतर पहिल्यांदाच 'असं' घडणार
7
Gold Silver Price Today: २०२६ मध्येही सोन्या-चांदीची चमक कायम; चांदी ५६५६ रुपयांनी महागली, सोन्यातही जोरदार तेजी
8
'पाकिस्तानला उखडून टाका, आम्ही भारताबरोबर'; 'पाक'मधून कोणत्या नेत्याने लिहिले परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना ओपन लेटर?
9
Health Tips: तरुणांमध्ये कॅन्सर वाढण्याची ५ धक्कादायक कारणे; डॉक्टरांनी सांगितले तातडीचे उपाय
10
"ज्यांच्यामुळे श्वास गुदमरत होता, ते आता च्यवनप्राश देताहेत का?" आशिष शेलारांचा राज ठाकरेंना सवाल
11
भाजपा नगरसेवकाच्या मुलाची गुंडगिरी; पोलिसाला मारली कानाखाली, संतप्त जमावाने दिला चोप
12
पक्षासाठी उतरलो रस्त्यावरी, तरीही बसविले घरी, आयातानाच दिली उमेदवारी
13
जय श्रीराम! अयोध्येत महासागर, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ४ लाख भाविकांनी घेतले रामलला दर्शन
14
वंचित, एमआयएमने काँग्रेसची वाट केली 'बिकट'! महापालिका निवडणुकीत आमदाराचा लागणार 'कस'
15
व्होडाफोन-आयडियाला मोठा झटका! नोव्हेंबरमध्ये १० लाखांहून अधिक ग्राहकांनी सोडली साथ...
16
काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे खिंडार; अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला, शिवसेना शिंदे गटात प्रवेश
17
कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेचा कधीही न पाहिलेला बोल्ड लूक, दिसतेय इतकी हॉट की फोटोंवरुन नजरच हटणार नाही
18
“आता मोदींचा फोन आला तरी माघार नाही, अपक्ष लढणारच”; तिकीट नाकारताच भाजपा नेत्याचा एल्गार
19
Virat Kohli जगातील सर्वात हँडसम क्रिकेटर, त्याचा लूक...; युवा Vaishnavi Sharma किंगवर फिदा
20
समुद्राची गाज आणि पक्ष्यांचा किलबिलाट! नवीन वर्षात भारताच्या 'या' ५ हिडन समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या
Daily Top 2Weekly Top 5

वादळानंतर डोक्यावर मरण घेऊन राहताहेत वन कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 22:55 IST

आलापल्ली येथे झालेल्या वादळामुळे वन विभागाच्या अनेक निवासस्थानांवरील छप्पर व टिन उडून गेले. मात्र या घटनेला सहा दिवसांचा कालावधी उलटूनही वन विभागाने निवासस्थाने दुरूस्तीच्या कामाला सुरूवात केली नाही. निवासस्थानांवर ताडपत्री झाकून आश्रय घेतला आहे.

ठळक मुद्देआलापल्ली येथील स्थिती : निवासस्थानांना ताडपत्र्यांचा आधार

लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : आलापल्ली येथे झालेल्या वादळामुळे वन विभागाच्या अनेक निवासस्थानांवरील छप्पर व टिन उडून गेले. मात्र या घटनेला सहा दिवसांचा कालावधी उलटूनही वन विभागाने निवासस्थाने दुरूस्तीच्या कामाला सुरूवात केली नाही. निवासस्थानांवर ताडपत्री झाकून आश्रय घेतला आहे.आलापल्लीसह परिसराला १६ मे रोजी वादळाचा जोरदार तडाखा बसला होता. या वादळामुळे अनेकांच्या घरावरील छत उडून गेले. या वादळाचा सर्वाधिक फटका वन विभागाच्या वसाहतीला बसला. वन विभागाच्या वसाहतीतील बहुतांश घरे टिनाची आहेत. १६ मे रोजी झालेल्या वादळात जवळपास २० निवासस्थानांवरील छतासह टिन उडून गेले. त्यामुळे घर पूर्णपणे उघडे पडले. दुसऱ्याच दिवशी मुख्य वनसंरक्षक येटबॉन, आलापल्ली वन विभागाचे उपवनसंरक्षक सी. आर. तांबे, उपविभागीय वनाधिकारी रवी अग्रवाल, सहायक उपवनसंरक्षक एच. जी. मडावी, आलापल्लीचे वन परिक्षेत्राधिकारी किरण पाटील यांनी वसाहतीला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. मुख्य वनसंरक्षकांनी निवासस्थाने तत्काळ दुरूस्त करण्याचे निर्देश दिले. मात्र आता सहा दिवसांचा कालावधी उलटूनही घरांच्या दुरूस्तीला सुरूवात झाली नाही. ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी काही वन कर्मचाºयांनी तात्पुरती ताडपत्री झाकली आहे. मात्र दिवसा प्रचंड उन्हाचा त्रास वनकर्मचाºयांच्या कुटुंबियांना सहन करावा लागत आहे. पावसाळ्याचे दिवस जवळ आले आहेत. त्यामुळे वादळी वाºयासह पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाऊस झाल्यास झोपण्याचा व राहण्याचा प्रश्न कुटुंबासमोर निर्माण झाला आहे. त्याचबरोबर घरातील संपूर्ण साहित्य भिजण्याची शक्यता आहे.दिवसभराच्या उन्हामुळे वनकर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची प्रकृती बिघडत आहे. त्यांना उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वादळ झाल्यास सदर ताडपत्री कधीही उडून जाऊ शकते. पाऊस झाल्यास मोठे नुकसान होणार असल्याने वन कर्मचाºयांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्य वनसंरक्षकांनी या गंभीर बाबीकडे स्वत: लक्ष घालून निवासस्थानांची दुरूस्ती करून द्यावी, अशी मागणी होत आहे.