शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

वादळानंतर डोक्यावर मरण घेऊन राहताहेत वन कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 22:55 IST

आलापल्ली येथे झालेल्या वादळामुळे वन विभागाच्या अनेक निवासस्थानांवरील छप्पर व टिन उडून गेले. मात्र या घटनेला सहा दिवसांचा कालावधी उलटूनही वन विभागाने निवासस्थाने दुरूस्तीच्या कामाला सुरूवात केली नाही. निवासस्थानांवर ताडपत्री झाकून आश्रय घेतला आहे.

ठळक मुद्देआलापल्ली येथील स्थिती : निवासस्थानांना ताडपत्र्यांचा आधार

लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : आलापल्ली येथे झालेल्या वादळामुळे वन विभागाच्या अनेक निवासस्थानांवरील छप्पर व टिन उडून गेले. मात्र या घटनेला सहा दिवसांचा कालावधी उलटूनही वन विभागाने निवासस्थाने दुरूस्तीच्या कामाला सुरूवात केली नाही. निवासस्थानांवर ताडपत्री झाकून आश्रय घेतला आहे.आलापल्लीसह परिसराला १६ मे रोजी वादळाचा जोरदार तडाखा बसला होता. या वादळामुळे अनेकांच्या घरावरील छत उडून गेले. या वादळाचा सर्वाधिक फटका वन विभागाच्या वसाहतीला बसला. वन विभागाच्या वसाहतीतील बहुतांश घरे टिनाची आहेत. १६ मे रोजी झालेल्या वादळात जवळपास २० निवासस्थानांवरील छतासह टिन उडून गेले. त्यामुळे घर पूर्णपणे उघडे पडले. दुसऱ्याच दिवशी मुख्य वनसंरक्षक येटबॉन, आलापल्ली वन विभागाचे उपवनसंरक्षक सी. आर. तांबे, उपविभागीय वनाधिकारी रवी अग्रवाल, सहायक उपवनसंरक्षक एच. जी. मडावी, आलापल्लीचे वन परिक्षेत्राधिकारी किरण पाटील यांनी वसाहतीला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. मुख्य वनसंरक्षकांनी निवासस्थाने तत्काळ दुरूस्त करण्याचे निर्देश दिले. मात्र आता सहा दिवसांचा कालावधी उलटूनही घरांच्या दुरूस्तीला सुरूवात झाली नाही. ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी काही वन कर्मचाºयांनी तात्पुरती ताडपत्री झाकली आहे. मात्र दिवसा प्रचंड उन्हाचा त्रास वनकर्मचाºयांच्या कुटुंबियांना सहन करावा लागत आहे. पावसाळ्याचे दिवस जवळ आले आहेत. त्यामुळे वादळी वाºयासह पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाऊस झाल्यास झोपण्याचा व राहण्याचा प्रश्न कुटुंबासमोर निर्माण झाला आहे. त्याचबरोबर घरातील संपूर्ण साहित्य भिजण्याची शक्यता आहे.दिवसभराच्या उन्हामुळे वनकर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची प्रकृती बिघडत आहे. त्यांना उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वादळ झाल्यास सदर ताडपत्री कधीही उडून जाऊ शकते. पाऊस झाल्यास मोठे नुकसान होणार असल्याने वन कर्मचाºयांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्य वनसंरक्षकांनी या गंभीर बाबीकडे स्वत: लक्ष घालून निवासस्थानांची दुरूस्ती करून द्यावी, अशी मागणी होत आहे.