शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

वन कार्यालये माओवाद्यांच्या रडारावर

By admin | Updated: September 20, 2015 01:58 IST

गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात पोलिसांशी असलेल्या लढाईत माओवादी बॅकपूटवर गेल्याचे चित्र निर्माण झाले ..

कोट्यवधींची हानी : दोन महिन्यांत चार कार्यालये जाळली; वन कर्मचाऱ्यांनाही नक्षलवाद्यांनी पत्रकातून दिली तंबीगडचिरोली : गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात पोलिसांशी असलेल्या लढाईत माओवादी बॅकपूटवर गेल्याचे चित्र निर्माण झाले असताना सध्या माओवाद्यांनी वन विभागाच्या कार्यालयांना टार्गेट करण्याचे काम सुरू केले आहे. गेल्या दोन महिन्यात वन विभागाची चार कार्यालये जाळली आहेत. याशिवाय काही ग्रामपंचायत कार्यालयांचीही नासधूस माओवाद्यांकडून करण्यात आली आहे. मागील दोन वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात पोलीस यंत्रणा माओवाद्यांवर वरचढ झाली आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेला सोडून आता माओवाद्यांनी वन विभागाला आपले लक्ष्य केले आहे. पोलीस यंत्रणेएवढेच दुर्गम भागात वन विभागाचे काम गडचिरोली जिल्ह्यात आहे. गेल्या तीन महिन्यात माओवाद्यांकडून वन विभागाच्या कार्यालयांची जाळपोळ केली जात आहे. कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा वन परिक्षेत्र कार्यालयाला १५ जुलै रोजी आग लागली होती. या आगीत लाखो रूपयांचे साहित्य जळून खाक झाले. त्याचबरोबर दस्तावेजही जळाले. अहेरी तालुक्यात पेरमिली व देचलीपेठा येथीलही वन विभागाच्या कार्यालयाला नक्षल्यांनी आग लावली. देचलीपेठा येथील आगीत १५ लाख रूपयांचे वन विभागाचे नुकसान झाले. सिरोंचा तालुक्यात झिंगानूर येथील वन परिक्षेत्र कार्यालयाला आग लावल्याने या कार्यालयाचे १२ लाख रूपयांचे नुकसान झाले. वन विभागाचे सुमो वाहनसुध्दा या आगीत जळून भस्म झाले. तर दुसरे एक चारचाकी वाहन क्षतिग्रस्त झाले आहेत. माओवाद्यांनी कधी नव्हे ते सलग वन कार्यालयांना लक्ष्य केल्यामुळे वन कर्मचाऱ्यांमध्ये दुर्गम भागात काम करताना दहशत पसरली आहे.याशिवाय धानोरा तालुक्यात दुर्गापूर येथील ग्रामपंचायतीची माओवाद्यांनी जाळपोळ केली आहे. वन विभागामार्फत दुर्गम भागात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली जातात. त्यामुळे या विभागावर आपली दहशत बसविण्याचा माओवाद्यांचा हा प्रयत्न आहे. माओवादी विकासाला कायम विरोध करण्यासाठी असे कृत्य करीत असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)