शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

जंगल आगीस वनरक्षक, वनपालांना जबाबदार धरणार

By admin | Updated: February 4, 2016 01:29 IST

वनक्षेत्रात कोणत्याही इसमाकडून बेकायदेशीरीत्या वणवा लावणे, जंगलाची नासाडी रोखण्यासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समितीने प्रयत्न करावे,

पी. कल्याणकुमार यांचा इशारा : आलापल्लीत आढावा बैठकआलापल्ली : वनक्षेत्रात कोणत्याही इसमाकडून बेकायदेशीरीत्या वणवा लावणे, जंगलाची नासाडी रोखण्यासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समितीने प्रयत्न करावे, ज्या गावालगत जंगल क्षेत्रात आग लागल्यास त्या क्षेत्रात कार्यरत वनरक्षक, वनपाल व वनपरिक्षेत्राधिकारी यांना जबाबदार गृहीत धरून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणार, असा इशारा गडचिरोलीचे प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक पी. कल्याणकुमार यांनी दिला.आलापल्ली वन विभागाच्या सभागृहात सोमवारी घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला भामरागडचे उपवनसंरक्षक बाला, आलापल्लीचे उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीना तसेच आलापल्ली वन विभागातील वनपरिक्षेत्राधिकारी क्षेत्र सहाय्यक आदी उपस्थित होते. यावेळी पी. कल्याणकुमार यांनी रोजगार हमी योजनेंतर्गत वन विभागामार्फत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. ज्या क्षेत्रात नरेगाची कामे अपूर्ण आहेत, त्यांनी ३१ मार्च २०१६ पर्यंत काम पूर्ण करून विहीत वेळेत निधी खर्च करावा, अशी ताकीदही त्यांनी यावेळी दिली. वन विभागामार्फत सुरू असलेली विकास कामे व निधी खर्चात वनपरिक्षेत्राधिकारी व वन कर्मचाऱ्यांनी हयगय केल्यास आपण खपवून घेणार नाही, प्रसंगी कारवाई करणार, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. (प्रतिनिधी)निस्तार कुपातून रोजगार द्यावनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या निस्तार कुपाच्या बाबत स्थानिक नागरिकांमध्ये चुकीच्या गैरसमजुती निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्थानिक लोकांचे प्रबोधन करावे, निस्तार कुपाच्या माध्यमातून वन विभाग स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देऊ शकते, हे पटवून देण्याची गरज आहे. एक निस्तार कूप सरासरी ५ ते २० कोटी रूपयापर्यंतचा रोजगार स्थानिकांना देऊ शकते. एटापल्ली व भामरागड या दोन तालुक्याच्या विचार केल्यास वर्षाला १०० कोटी रूपयांचे वार्षिक उत्पन्न वन विभाग निर्माण करू शकते. यातून प्रत्येक कुटुंबाला ५ ते २० हजार रूपयांचे वार्षिक उत्पन्न उपलब्ध करणे शक्य होईल, असेही ते म्हणाले.