शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवडीसाठी वनविभाग सज्ज

By admin | Updated: May 6, 2016 01:15 IST

संपूर्ण महाराष्ट्रात १ ते ७ जुलै दरम्यान वनमहोत्सव कार्यक्रम राबविला जाणार आहे. या कालावधीत सहा लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार असून यासाठी वन विभाग सज्ज आहे,

मुख्य वनसंरक्षकांची माहिती : सहा लाख वृक्षांची होणार लागवडगडचिरोली : संपूर्ण महाराष्ट्रात १ ते ७ जुलै दरम्यान वनमहोत्सव कार्यक्रम राबविला जाणार आहे. या कालावधीत सहा लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार असून यासाठी वन विभाग सज्ज आहे, अशी माहिती मुख्य वनसंरक्षक पी. कल्याणकुमार यांनी दिली आहे. जागतिक तापमानात होत असलेली वाढ, वातावरणातील बदल, बदलले निसर्ग व ऋतू चक्र, अनियमित पर्जन्यमान हे पर्यावरणाचे संतुलन बिघडल्याची जाणीव करून देत आहे. पर्यावरण संवर्धनात वृक्षांचे विशेष महत्त्व आहे. वाढते औद्योगिकरण, शहरीकरण, वाढती लोकसंख्या यामुळे वनांवर होणाऱ्या अनिष्ठ परिणामाची व पर्यायाने पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेऊन शासनाने वनमहोत्सवाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यभरात २ कोटी वृक्ष लागवड केली जाणार आहे. गडचिरोली वन विभाग स्वत: ५ लाख वृक्ष लागवड करणार आहे. एक लाख वृक्षांच्या लागवडीबाबत जिल्हा नियोजन समितीने नियोजन केले आहे. १ जुलै या एकाच दिवशी जिल्हाभरात किमान ६ लाख वृक्षांची लागवड केली जाणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था, संयुक्त वनव्यवस्थापन समिती, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, लोकप्रतिनिधी यांचा लोकसहभाग घेण्यात येणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जास्तीत नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यावर्षीही वृक्ष लागवडीला प्रचंड प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (नगर प्रतिनिधी)