शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

वन विभागाने रोपांचे दर वाढविले

By admin | Updated: July 24, 2015 01:31 IST

राज्य शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागामार्फत राज्यभरात शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था,

वृक्षारोपण कार्यक्रमावर परिणाम होणार : अडीच रूपयाने झाली दरवाढगडचिरोली : राज्य शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागामार्फत राज्यभरात शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था यांना वृक्षारोपण करण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसात विविध प्रजातीचे रोप उपलब्ध करून दिल्या जातात. गतवर्षीपर्यंत ५० पैशात हे रोप सामाजिक वनीकरण विभाग विक्री करीत होता. यंदा तब्बल अडीच रूपयाने रोपांची किंमत वाढवून तीन रूपये दराने रोप विकल्या जाणार आहे. या भाव वाढीचा फटका वृक्षारोपण कार्यक्रमाला बसणार असून शाळा, महाविद्यालयांना महागडी वृक्ष खरेदी करण्यासाठी अडचण निर्माण होणार आहे. राज्य शासनाने २२ जुलै रोजी निर्णय घेऊन सन २०१५ मधील पावसाळ्यापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेताना वन/सामाजिक वनीकरणामार्फत तीन रूपये प्रती रोप दराने रोपांचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. गतवर्षीपर्यंत ५० पैसे किंमतीत हे रोप उपलब्ध केले जात होते. यावर्षी शासनाने यात बदल केला आहे. ज्या शाळा सामाजिक वनीकरणाच्या रोपवाटिकेतून स्वत: रोप आणणार आहेत. अशा शाळांना ५० पैसे दराने रोप उपलब्ध करून दिला जाणार आहे. मात्र विद्यार्थी व शिक्षकांना तांत्रिक मार्गदर्शन करणे, रोपांची शाळेपर्यंत वाहतूक करणे या कार्यक्रमासाठी आगाऊ अडीच रूपये घेतले जाणार आहेत. अशा शाळांना तीन रूपये प्रती रोप दराने रोप उपलब्ध करून दिली जाणार आहेत. आजपर्यंत प्रत्येक जिल्ह्यात लाखो रोपट्यांची लागवड करण्यात आली. त्यावर शासनाचे कोट्यवधी रूपये खर्च झाले आहेत. मात्र त्यापैकी ५ टक्केही वृक्ष जिवंत राहिलेली नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे या योजनेवर झालेला कोट्यवधींचा खर्च पाण्यात गेला असल्याची टीका होत आहे. हा आगाऊचा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने शासनाने रोपांच्या वाढीव किंमतीस मान्यता दिली असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे.गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यात तालुका मुख्यालय ते गावाचा अंतर ७० ते ८० किमीच्या फेऱ्यात येते. त्यामुळे अशा गावातील शाळा, महाविद्यालयांना आता वाहतूक खर्चासाठी महागडी रोप घेताना मोठी आर्थिक अडचण होणार आहे. त्यामुळे वृक्षारोपण कार्यक्रमावर थेट परिणाम होण्याची शक्यता शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)