शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

१ लाख ६८ हजार कुटुंबांना अन्न सुरक्षेचे कवच

By admin | Updated: May 15, 2014 23:34 IST

केंद्र शासनाने सुरू केलेल्या अन्नसुरक्षा योजनेची जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली असून जिल्ह्यातील १ लाख ६७ हजार ९१८ कुटुंबांना या योजनेचा

गडचिरोली : केंद्र शासनाने सुरू केलेल्या अन्नसुरक्षा योजनेची जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली असून जिल्ह्यातील १ लाख ६७ हजार ९१८ कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे. एपीएलमधील ३७ हजार ८१५ कुटुंबांना प्राधान्य कुटुंब म्हणून अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे.

देशातील एकही गरीब उपाशी राहू नये यासाठी शासनाने देशभरात अन्नसुरक्षा योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत देशातील ८0 कोटी जनतेला अत्यंत कमी किंमतीत अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. ग्रामीण भागातील ७५ टक्क्याहून अधिक व शहरी भागातील ५0 टक्क्याहून अधिक कुटुंबाचा अन्नसुरक्षा योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत महिन्याला प्रतिव्यक्ती ५ किलो अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येते. सदर अन्नधान्य ३ रूपये किलो तांदूळ, २ रूपये किलो गहू व १ रूपये किलो भरड धान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. दिवसेंदिवस अन्नधान्याच्या किंमती गगणाला भिडलेल्या असल्याने दिवसभराच्या मजुरीतून दोन वेळच्या जेवणापुरतेही अन्न खरेदी करणेही शक्य होत नाही. अशा परिस्थितीत अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अत्यंत कमी किंमतीमध्ये राशन उपलब्ध करून दिल्या जात आहे. त्यामुळे आजपर्यंत अर्धपोटी उपाशी राहणारी कुटुंबांना फार मोठा आधार झाला आहे.

गडचिरोली जिल्ह्यात एकूण २ लाख ११ हजार ५१७ राशन कार्डधारक आहेत. यामध्ये एपीएलधारक ३९ हजार ३६१, अंत्योदय योजनेचे ९0 हजार ७४२, प्राधान्य कुटुंबातील ३७ हजार ८१५, केशरी ३६ हजार १७८ व पांढर्‍या रंगाचे ७ हजार ४२१ कार्ड आहेत. यापैकी बीपीएल, प्राधान्य कुटुंब व अंत्योदय कार्डधारकांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. प्राधान्य कुटुंब हे एपीएलधारक कुटुंब आहेत. त्यामुळे या नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ दिला जात नाही. मात्र या कुटुंबांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ दिल्या जातो. गडचिरोली जिल्ह्यातील आजपर्यंंत ३७ हजार ८१५ एपीएल कुटुंबांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ दिला जात आहे. भविष्यात हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गडचिरोली जिल्ह्याचा बहुतांश भाग दुर्गम आहे. या भागामध्ये रोजगाराचे साधन नाही. तेंदूपत्त्यातून मिळणारे तुटपुंजे उत्पन्न व शेतीच्या भरवशावर वर्षाभराच्या खर्चाचे नियोजन करावे लागते. या नागरिकांसाठी सदर योजना अत्यंत चांगली असली तरी या योजनेची माहितीच बहुतांश नागरिकांना नाही. त्यामुळे या योजनेच्या लाभापासून सदर नागरिक वंचित राहत असल्याचे दिसून येते. प्रशासनातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी या योजनेची अजूनपर्यंत दुर्गम भागातील नागरिकांना माहिती दिली नाही. शहरी भागातील नागरिक मात्र या योजनेमध्ये स्वत:चा समावेश व्हावा, यासाठी धडपड करीत आहे. वेळप्रसंगी तलाठय़ाकडून कमी उत्पन्नाचा दाखला घेऊन अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अन्नधान्याचा लाभ मिळावा, यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र ग्रामीण भागातील नागरिकापेक्षा शहरी भागातील नागरिकांची उत्पन्नाची र्मयादा जास्त असल्याने योजनेत समावेश होण्यास अडचन येत आहे.

गहू केवळ २ रूपये किलो प्रमाणे प्राप्त होतो. मात्र गहू दळण्यासाठी ५ रूपयाचा खर्च येत आहे. त्यामुळे सदर गहू नागरिकांना ७ रूपये किलो प्रमाणे पडत आहे. तांदळाची किंमत ३ रूपये किलो असली तरी त्यानंतर तांदळावर खर्च होत नाही. त्यामुळे गव्हापेक्षा तांदूळ खरेदीला पसंती दिसून येते. (नगर प्रतिनिधी)