शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

१ लाख ६८ हजार कुटुंबांना अन्न सुरक्षेचे कवच

By admin | Updated: May 15, 2014 23:34 IST

केंद्र शासनाने सुरू केलेल्या अन्नसुरक्षा योजनेची जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली असून जिल्ह्यातील १ लाख ६७ हजार ९१८ कुटुंबांना या योजनेचा

गडचिरोली : केंद्र शासनाने सुरू केलेल्या अन्नसुरक्षा योजनेची जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली असून जिल्ह्यातील १ लाख ६७ हजार ९१८ कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे. एपीएलमधील ३७ हजार ८१५ कुटुंबांना प्राधान्य कुटुंब म्हणून अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे.

देशातील एकही गरीब उपाशी राहू नये यासाठी शासनाने देशभरात अन्नसुरक्षा योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत देशातील ८0 कोटी जनतेला अत्यंत कमी किंमतीत अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. ग्रामीण भागातील ७५ टक्क्याहून अधिक व शहरी भागातील ५0 टक्क्याहून अधिक कुटुंबाचा अन्नसुरक्षा योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत महिन्याला प्रतिव्यक्ती ५ किलो अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येते. सदर अन्नधान्य ३ रूपये किलो तांदूळ, २ रूपये किलो गहू व १ रूपये किलो भरड धान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. दिवसेंदिवस अन्नधान्याच्या किंमती गगणाला भिडलेल्या असल्याने दिवसभराच्या मजुरीतून दोन वेळच्या जेवणापुरतेही अन्न खरेदी करणेही शक्य होत नाही. अशा परिस्थितीत अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अत्यंत कमी किंमतीमध्ये राशन उपलब्ध करून दिल्या जात आहे. त्यामुळे आजपर्यंत अर्धपोटी उपाशी राहणारी कुटुंबांना फार मोठा आधार झाला आहे.

गडचिरोली जिल्ह्यात एकूण २ लाख ११ हजार ५१७ राशन कार्डधारक आहेत. यामध्ये एपीएलधारक ३९ हजार ३६१, अंत्योदय योजनेचे ९0 हजार ७४२, प्राधान्य कुटुंबातील ३७ हजार ८१५, केशरी ३६ हजार १७८ व पांढर्‍या रंगाचे ७ हजार ४२१ कार्ड आहेत. यापैकी बीपीएल, प्राधान्य कुटुंब व अंत्योदय कार्डधारकांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. प्राधान्य कुटुंब हे एपीएलधारक कुटुंब आहेत. त्यामुळे या नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ दिला जात नाही. मात्र या कुटुंबांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ दिल्या जातो. गडचिरोली जिल्ह्यातील आजपर्यंंत ३७ हजार ८१५ एपीएल कुटुंबांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ दिला जात आहे. भविष्यात हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गडचिरोली जिल्ह्याचा बहुतांश भाग दुर्गम आहे. या भागामध्ये रोजगाराचे साधन नाही. तेंदूपत्त्यातून मिळणारे तुटपुंजे उत्पन्न व शेतीच्या भरवशावर वर्षाभराच्या खर्चाचे नियोजन करावे लागते. या नागरिकांसाठी सदर योजना अत्यंत चांगली असली तरी या योजनेची माहितीच बहुतांश नागरिकांना नाही. त्यामुळे या योजनेच्या लाभापासून सदर नागरिक वंचित राहत असल्याचे दिसून येते. प्रशासनातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी या योजनेची अजूनपर्यंत दुर्गम भागातील नागरिकांना माहिती दिली नाही. शहरी भागातील नागरिक मात्र या योजनेमध्ये स्वत:चा समावेश व्हावा, यासाठी धडपड करीत आहे. वेळप्रसंगी तलाठय़ाकडून कमी उत्पन्नाचा दाखला घेऊन अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अन्नधान्याचा लाभ मिळावा, यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र ग्रामीण भागातील नागरिकापेक्षा शहरी भागातील नागरिकांची उत्पन्नाची र्मयादा जास्त असल्याने योजनेत समावेश होण्यास अडचन येत आहे.

गहू केवळ २ रूपये किलो प्रमाणे प्राप्त होतो. मात्र गहू दळण्यासाठी ५ रूपयाचा खर्च येत आहे. त्यामुळे सदर गहू नागरिकांना ७ रूपये किलो प्रमाणे पडत आहे. तांदळाची किंमत ३ रूपये किलो असली तरी त्यानंतर तांदळावर खर्च होत नाही. त्यामुळे गव्हापेक्षा तांदूळ खरेदीला पसंती दिसून येते. (नगर प्रतिनिधी)