शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
3
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ पण मित्रांंसाठी खर्च कराल...
4
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
5
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
6
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
7
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
8
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
9
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
10
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
11
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
12
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
13
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
14
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
15
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
16
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
17
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
18
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
19
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
20
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून

आचारसंहितेचे काटेकोर पालन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:09 IST

जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतींसाठी १४ आॅक्टोबर रोजी मतदान घेतले जाणार आहे. निवडणुकीची आचारसंहिता १ सप्टेंबरपासून लागू करण्यात आली आहे

ठळक मुद्देनिवासी उपजिल्हाधिकाºयांचे आवाहन : पत्रकार परिषदेत दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतींसाठी १४ आॅक्टोबर रोजी मतदान घेतले जाणार आहे. निवडणुकीची आचारसंहिता १ सप्टेंबरपासून लागू करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी नागरिक व राजकीय पक्षांनी निवडणूक आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाने यांनी केले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी निवडणुकीसंदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावर्षी पहिल्यांदाच सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार आहे. नामनिर्देशन भरण्याची प्रक्रिया संगणकीकृत पध्दतीने राबविली जाणार आहे. सरपंच पदाच्या जागेची पहिली मतपत्रिका राहणार असून मतपत्रिकेचा फिका निळा रंग राहणार आहे. तसेच मतपत्रिकेवर नोटाचा पर्याय राहणार आहे. सरपंच व सदस्य पदाच्या निवडणुकीकरिता उमेदवाराने करावयाच्या खर्चाची मर्यादा वाढविण्यात आली आहे. सात ते नऊ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत सदस्याला प्रचारासाठी २५ हजार रूपये व सरपंचाला ५० हजार रूपये खर्च करता येणार आहे. ११ ते १३ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीत सदस्याला ३५ हजार रूपये तर सरपंचाला एक लाख रूपये मर्यादा देण्यात आली आहे. १५ ते १७ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीत सदस्याला ५० हजार रूपये तर सरपंच पदासाठी उभा असलेल्या व्यक्तीला १ लाख ७५ हजार रूपये एवढी खर्चाची मर्यादा देण्यात आली आहे.गडचिरोली जिल्ह्याचा भाग अतिशय दुर्गम व नक्षलग्रस्त असल्याने १४ आॅक्टोबर रोजी सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान राहणार आहे. १६ आॅक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाने यांनी दिले आहे.पत्रकार परिषदेला नायब तहसीलदार एस. के. चडगुलवार, लिपिक राऊत यांच्यासह राकाँचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, काँग्रेसचे प्रभाकर वासेकर, भाजपाचे विलास भांडेकर, राकाँचे हरिदास गेडाम उपस्थित होते.