शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

संरक्षणाबरोबरच सेवेवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 00:11 IST

दुर्गम भागातील नागरिकांचा विकास झाल्यास नक्षल चळवळ आपोआप संपुष्टात येईल या उद्देशाने शासन नागरिकांना संरक्षण देण्याबरोबरच सेवा व रोजगार उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देत आहे.

ठळक मुद्देगृह राज्यमंत्र्यांचे प्रतिपादन : नागरी कृती कार्यक्रमांतर्गत साहित्याचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दुर्गम भागातील नागरिकांचा विकास झाल्यास नक्षल चळवळ आपोआप संपुष्टात येईल या उद्देशाने शासन नागरिकांना संरक्षण देण्याबरोबरच सेवा व रोजगार उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देत आहे. याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.सीआरपीएफ व पोलीस विभाग यांच्या वतीने दुर्गम भागातील नागरिकांना रोजगाराचे प्रशिक्षण देण्यात आले. या युवकांना प्रमाणपत्र व साहित्याच्या वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हंसराज अहीर होते. यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय परिवहन, भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, खासदार अशोक नेते, जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार, नगराध्यक्ष योगीता पिपरे, अतिरिक्त पोलीस महासंचालक कनकरत्नम, सीआरपीएफचे पोलीस महानिरिक्षक राजकुमार, पोलीस उपमहानिरिक्षक टी.शेखर, पोलीस उपमहानिरिक्षक अंकुश शिंदे, प्रभारी पोलीस अधीक्षक राजा रामासामी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, सीआरपीएफ १९१ बटालियनचे कमांडंट प्रभाकर त्रिपाठी, सीआरपीएफ १९२ बटालियनचे कमांडंट मनोजकुमार आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना हंसराज अहीर म्हणाले, सीआरपीएफ व पोलीस जवान अतिशय हिमतीने नक्षल्यांचा सामना करीत आहेत. त्यामुळेच नक्षल चळवळीला अखेरची घरघर लागली आहे. महाराष्टÑात गडचिरोली वगळता नक्षल चळवळ संपली आहे. येत्या काही वर्षात गडचिरोली जिल्ह्यातून सुध्दा नक्षल चळवळ हद्दपार होईल. केंद्र व राज्य शासन सामान्य जनतेच्या विकासासाठी अनेक योजना राबवित आहे. मात्र या योजनांची अंमलबजावणी करताना नक्षल चळवळीमुळे अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षा उपलब्ध करून देण्याबरोबरच येथील पोलीस जवान प्रत्येक नागरिकांच्या दारापर्यंत शासकीय योजना पोहोचविण्याचेही काम करीत आहेत. जिल्ह्यात रस्ते व पुलांचे बांधकाम झाले आहे. याचा मोठा फटका नक्षल चळवळीला बसला आहे, असे प्रतिपादन केले.प्रास्ताविकात सीआरपीएफचे पोलीस महानिरिक्षक राजकुमार यांनी नागरी कृती कार्यक्रमांतर्गत राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. या उपक्रमासाठी शासनाकडून १ कोटी ३० लाख रूपये प्राप्त झाले. या निधीतून ३० कुटुंबांना बकऱ्यांचे वितरण, २५ कुटुंबांना मत्स्य बीज वितरण, १०० कुटुंबांना कोंबड्यांचे वितरण, २५० महिलांना टेलरींगचे प्रशिक्षण व २०० युवकांना एमएससीआयटीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. कार्यक्रमाप्रसंगी शिलाई मशीन, एमएससीआयटीचे प्रमाणपत्र, वाहन दुरूस्तीचे साहित्य मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाला दुर्गम भागातील नागरीक उपस्थित होते.दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी मदर डेअरीची स्थापना करणार-गडकरीविदर्भात हिरवा चारा उपलब्ध असल्याने दुग्ध व्यवसायासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात मदर डेरी स्थापन केली जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातही सदर डेअरी स्थापन केली जाईल. देशात बहुतांश कागद आयात केला जातो. गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात मोठ्या प्रमाणात बांबू उपलब्ध आहे. सदर बांबू ग्रामसभांनी पेपरमिलला पुरवठा केल्यास हजारो युवकांना रोजगार उपलब्ध होईल. मोहापासून डिझेल बनविण्यासाठीच्या प्रकल्पाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने सादर करावा. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. धानाच्या तणसीपासून इथेनॉल बनविता येते. हा सुध्दा उद्योग गडचिरोली जिल्ह्यात स्थापन करण्यासाठी वाव आहे. सध्या जिल्ह्यात १२ हजार कोटींची कामे सुरू आहेत. नक्षल्यांना गोळी बरोबरच रोजगारानेही उत्तर देण्याचा प्रयत्न शासन करीत आहे, असे प्रतिपादन नितीन गडकरी यांनी केले. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी