शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

पूर ओसरला, जनजीवन पूर्वपदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:19 IST

सोमवारी व मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे लहान मोठ्या नदी व नाल्यांना पूर आला होता.

गुरूवारी पावसाने घेतली उसंत : अनेक मार्ग मोकळे; महसूल प्रशासनातर्फे नुकसानीचे पंचनामे सुरूलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सोमवारी व मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे लहान मोठ्या नदी व नाल्यांना पूर आला होता. पुराचे पाणी गावात शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र बुधवारी दुपारनंतर पावसाने उसंत घेतली. गुरूवारीही अपवाद वगळता पाऊस झाला नाही. त्यामुळे गुरूवारी जनजीवन पूर्वपदावर आले. मात्र या मूसळधार पावसाने २९२ घरांची पडझड झाली असल्याचे प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व्हेत दिसून आले आहे. पावसाअभावी धान रोवणीची कामे खोळंबली होती. संपूर्ण जिल्ह्यात दोन दिवस दमदार पाऊस झाल्याने एकाच वेळी रोवणीच्या कामाला शेतकऱ्यांनी सुरूवात केली. जुलै महिना लागला तरी मामा तलाव कोरडेच होते. दोन दिवसाच्या पावसामुळे मात्र तलावांमध्ये जलसाठा निर्माण झाला आहे. वैरागड-मानापूर मार्गावरील वैलोचना नदी पूल मागील आठ दिवसात दोनवेळा बुडला होता. पावसाने उसंत घेतल्याने या मार्गावरची वाहतूक बुधवारी पूर्ववत सुरू झाली. धानोरा तालुक्यातील रांगी-निमगाव दरम्यानच्या नाल्यावरील पुलावर पाण साचले होते. त्यामुळे रांगी-गडचिरोली दरम्यानची वाहतूक ठप्प झाली होती. सदर मार्ग पूर्ववत सुरू झाला. सिरोंचा महामार्गावरील मोसम व नंदीगावदरम्यान झिमेला नाल्याच्या पुलाजवळ झाड कोसळले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. गावातील नागरिकांनी झाड बाजुला केले. एटापल्ली तालुका मुख्यालयापासून एक किमी अंतरावर असलेल्या डुम्मी नाल्याला पूर आल्याने या ठिकाणचीही वाहतूक ठप्प पडली होती. गुरूवारी डुम्मी नाल्यावरचाही पूर ओसरला.पूरग्रस्त भामरागड झाले चिखलमय, घरात-दुकानातही चिखलअतिवृष्टीचा सर्वाधिक फटका भामरागड शहराला बसला. भामरागड शहर अगदी पर्लकोटा नदीच्या काठावर वसले आहे. पर्लकोटा नदीचे पाणी बुधवारच्या रात्री भामरागड शहरात शिरले. त्यामुळे येथील दुकानदार, नागरिकांना इमारतीमधून कोणतेच सामान काढता आले नाही. पुराचे पाणी शिरताच नागरिकांनी जीव वाचविण्यासाठी सुरक्षित जागेचा शोध घेतला. यामुळे मनुष्यहानी झाली नसली तरी प्रचंड प्रमाणात वित्तहानी झाली आहे. पुराचे पाणी जवळपास २४ तास दुकानांमध्ये शिरून होते. दुकानदारांनी व्यक्त केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार सुमारे २४ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. पूर ओसरला मात्र गावात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. घरातही चिखल पसरला आहे. शेतीची कामे सोडून आता घराची डागडुजी व साफसफाई करण्याचे काम भामरागडवासीयांना करावे लागत आहे.