शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

पूर ओसरला, जनजीवन पूर्वपदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:19 IST

सोमवारी व मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे लहान मोठ्या नदी व नाल्यांना पूर आला होता.

गुरूवारी पावसाने घेतली उसंत : अनेक मार्ग मोकळे; महसूल प्रशासनातर्फे नुकसानीचे पंचनामे सुरूलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सोमवारी व मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे लहान मोठ्या नदी व नाल्यांना पूर आला होता. पुराचे पाणी गावात शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र बुधवारी दुपारनंतर पावसाने उसंत घेतली. गुरूवारीही अपवाद वगळता पाऊस झाला नाही. त्यामुळे गुरूवारी जनजीवन पूर्वपदावर आले. मात्र या मूसळधार पावसाने २९२ घरांची पडझड झाली असल्याचे प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व्हेत दिसून आले आहे. पावसाअभावी धान रोवणीची कामे खोळंबली होती. संपूर्ण जिल्ह्यात दोन दिवस दमदार पाऊस झाल्याने एकाच वेळी रोवणीच्या कामाला शेतकऱ्यांनी सुरूवात केली. जुलै महिना लागला तरी मामा तलाव कोरडेच होते. दोन दिवसाच्या पावसामुळे मात्र तलावांमध्ये जलसाठा निर्माण झाला आहे. वैरागड-मानापूर मार्गावरील वैलोचना नदी पूल मागील आठ दिवसात दोनवेळा बुडला होता. पावसाने उसंत घेतल्याने या मार्गावरची वाहतूक बुधवारी पूर्ववत सुरू झाली. धानोरा तालुक्यातील रांगी-निमगाव दरम्यानच्या नाल्यावरील पुलावर पाण साचले होते. त्यामुळे रांगी-गडचिरोली दरम्यानची वाहतूक ठप्प झाली होती. सदर मार्ग पूर्ववत सुरू झाला. सिरोंचा महामार्गावरील मोसम व नंदीगावदरम्यान झिमेला नाल्याच्या पुलाजवळ झाड कोसळले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. गावातील नागरिकांनी झाड बाजुला केले. एटापल्ली तालुका मुख्यालयापासून एक किमी अंतरावर असलेल्या डुम्मी नाल्याला पूर आल्याने या ठिकाणचीही वाहतूक ठप्प पडली होती. गुरूवारी डुम्मी नाल्यावरचाही पूर ओसरला.पूरग्रस्त भामरागड झाले चिखलमय, घरात-दुकानातही चिखलअतिवृष्टीचा सर्वाधिक फटका भामरागड शहराला बसला. भामरागड शहर अगदी पर्लकोटा नदीच्या काठावर वसले आहे. पर्लकोटा नदीचे पाणी बुधवारच्या रात्री भामरागड शहरात शिरले. त्यामुळे येथील दुकानदार, नागरिकांना इमारतीमधून कोणतेच सामान काढता आले नाही. पुराचे पाणी शिरताच नागरिकांनी जीव वाचविण्यासाठी सुरक्षित जागेचा शोध घेतला. यामुळे मनुष्यहानी झाली नसली तरी प्रचंड प्रमाणात वित्तहानी झाली आहे. पुराचे पाणी जवळपास २४ तास दुकानांमध्ये शिरून होते. दुकानदारांनी व्यक्त केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार सुमारे २४ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. पूर ओसरला मात्र गावात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. घरातही चिखल पसरला आहे. शेतीची कामे सोडून आता घराची डागडुजी व साफसफाई करण्याचे काम भामरागडवासीयांना करावे लागत आहे.