शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
6
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
7
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
8
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
9
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
10
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
11
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
12
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
13
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
14
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
15
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
16
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
17
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
18
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
19
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
20
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला

पूर ओसरला, जनजीवन पूर्वपदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:19 IST

सोमवारी व मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे लहान मोठ्या नदी व नाल्यांना पूर आला होता.

गुरूवारी पावसाने घेतली उसंत : अनेक मार्ग मोकळे; महसूल प्रशासनातर्फे नुकसानीचे पंचनामे सुरूलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सोमवारी व मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे लहान मोठ्या नदी व नाल्यांना पूर आला होता. पुराचे पाणी गावात शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र बुधवारी दुपारनंतर पावसाने उसंत घेतली. गुरूवारीही अपवाद वगळता पाऊस झाला नाही. त्यामुळे गुरूवारी जनजीवन पूर्वपदावर आले. मात्र या मूसळधार पावसाने २९२ घरांची पडझड झाली असल्याचे प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व्हेत दिसून आले आहे. पावसाअभावी धान रोवणीची कामे खोळंबली होती. संपूर्ण जिल्ह्यात दोन दिवस दमदार पाऊस झाल्याने एकाच वेळी रोवणीच्या कामाला शेतकऱ्यांनी सुरूवात केली. जुलै महिना लागला तरी मामा तलाव कोरडेच होते. दोन दिवसाच्या पावसामुळे मात्र तलावांमध्ये जलसाठा निर्माण झाला आहे. वैरागड-मानापूर मार्गावरील वैलोचना नदी पूल मागील आठ दिवसात दोनवेळा बुडला होता. पावसाने उसंत घेतल्याने या मार्गावरची वाहतूक बुधवारी पूर्ववत सुरू झाली. धानोरा तालुक्यातील रांगी-निमगाव दरम्यानच्या नाल्यावरील पुलावर पाण साचले होते. त्यामुळे रांगी-गडचिरोली दरम्यानची वाहतूक ठप्प झाली होती. सदर मार्ग पूर्ववत सुरू झाला. सिरोंचा महामार्गावरील मोसम व नंदीगावदरम्यान झिमेला नाल्याच्या पुलाजवळ झाड कोसळले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. गावातील नागरिकांनी झाड बाजुला केले. एटापल्ली तालुका मुख्यालयापासून एक किमी अंतरावर असलेल्या डुम्मी नाल्याला पूर आल्याने या ठिकाणचीही वाहतूक ठप्प पडली होती. गुरूवारी डुम्मी नाल्यावरचाही पूर ओसरला.पूरग्रस्त भामरागड झाले चिखलमय, घरात-दुकानातही चिखलअतिवृष्टीचा सर्वाधिक फटका भामरागड शहराला बसला. भामरागड शहर अगदी पर्लकोटा नदीच्या काठावर वसले आहे. पर्लकोटा नदीचे पाणी बुधवारच्या रात्री भामरागड शहरात शिरले. त्यामुळे येथील दुकानदार, नागरिकांना इमारतीमधून कोणतेच सामान काढता आले नाही. पुराचे पाणी शिरताच नागरिकांनी जीव वाचविण्यासाठी सुरक्षित जागेचा शोध घेतला. यामुळे मनुष्यहानी झाली नसली तरी प्रचंड प्रमाणात वित्तहानी झाली आहे. पुराचे पाणी जवळपास २४ तास दुकानांमध्ये शिरून होते. दुकानदारांनी व्यक्त केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार सुमारे २४ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. पूर ओसरला मात्र गावात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. घरातही चिखल पसरला आहे. शेतीची कामे सोडून आता घराची डागडुजी व साफसफाई करण्याचे काम भामरागडवासीयांना करावे लागत आहे.