शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

पुरामुळे गडचिरोलीत २० हजारावर हेक्टर क्षेत्र बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 19:17 IST

गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्यामुळे २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत अर्ध्या गडचिरोली जिल्ह्यात महापूर आला होता. परिणामी सहा तालुक्यातील धान व इतर पिके पाण्याखाली आली.

ठळक मुद्दे २३ कोटींची मदत आवश्यकगोसेखुर्द धरणाच्या पाण्याने धान व इतर पिकांचे मोठे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्यामुळे २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत अर्ध्या गडचिरोली जिल्ह्यात महापूर आला होता. परिणामी सहा तालुक्यातील धान व इतर पिके पाण्याखाली आली. प्रशासनाच्या वतीने नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. पंचनाम्याच्या अहवालानुसार जिल्ह्यात एकूण २० हजार २३१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. शेती पिकाच्या नुकसान भरपाईसाठी २३ कोटी ७१ लाख रूपयांचा निधी आवश्यक आहे.संजय सरोवर व गोसेखुर्द धरणाचे पाणी २८ ऑगस्टपासून सोडण्यात आले. गोसेखुर्द धरणाचे सर्व दरवाजे उघडल्याने पाण्याचा मोठा विसर्ग होता. या पुराचा फटका देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली, अहेरी, सिरोंचा व चामोर्शी या सहा तालुक्याला बसला. या सहा तालुक्यातील खरीप हंगामातील धान व इतर पिके पाण्याखाली आली. काही घरांची पडझड झाली. तसेच पशुधन मृत्यूमुखी पडले. गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्याने आलेल्या या महापुरामुळे जिल्ह्यातील प्रमुख १० मार्ग चार दिवस बंद होते. परिणामी वाहतूक ठप्प पडली होती. शेतकरी, व्यावसायिक, पशुपालक या सर्वांना या पुराचा फटका बसला.प्रशासनाच्या पंचनामा अहवालानुसार ३३ टक्केपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झालेले एकूण बाधित क्षेत्र २० हजार २३१ इतके आहे. यामध्ये गडचिरोली तालुक्यात ६०६४.८६ हेक्टर क्षेत्र, चामोर्शी ४०६१.०८, मुलचेरा २७.८५, देसाईगंज २४८६.६७, आरमोरी ४८४९.०४, अहेरी १०५५.१७ व सिरोंचा तालुक्यात १६८६.५८ इतक्या हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. कोरडवाहू व आश्वासित सिंचनाखालील पिकांच्या या नुकसानीपोटी प्रती हेक्टर ६ हजार ८०० रूपये नुसार एकूण २२ हजार ६४८ शेतकऱ्यांना एकूण २३ कोटी ७१ लाख ३३ हजार ८२६ इतके अनुदान मदतीसाठी लागणार आहे. याशिवाय बहुवार्षिक पिकांचेही गोसेखुर्द पाण्याने नुकसान झाले आहे.

२ हजार ११३ कोंबड्यांचा बळीगोसेखुर्द धरणाच्या पाणी सोडून महापूर आल्याने चार दिवसात गडचिरोली, देसाईगंज व आरमोरी या तीन तालुक्यातील एकूण २ हजार ११३ कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील ३१०, मुलचेरा १ हजार २४५ व आरमोरी तालुक्यातील ५५८ कोंबड्यांचा समावेश आहे. याशिवाय पुराच्या पाण्यात सापडून सहा दुधाळ जनावरे दगावली. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील एक, देसाईगंज चार व आरमोरी तालुक्यातील एका जनावराचा समावेश आहे. या नुकसानीपोटी शासनाकडून लाखो रूपयांचे अनुदान लागणार आहे.

टॅग्स :floodपूर