शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

पुरामुळे गडचिरोलीत २० हजारावर हेक्टर क्षेत्र बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 19:17 IST

गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्यामुळे २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत अर्ध्या गडचिरोली जिल्ह्यात महापूर आला होता. परिणामी सहा तालुक्यातील धान व इतर पिके पाण्याखाली आली.

ठळक मुद्दे २३ कोटींची मदत आवश्यकगोसेखुर्द धरणाच्या पाण्याने धान व इतर पिकांचे मोठे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्यामुळे २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत अर्ध्या गडचिरोली जिल्ह्यात महापूर आला होता. परिणामी सहा तालुक्यातील धान व इतर पिके पाण्याखाली आली. प्रशासनाच्या वतीने नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. पंचनाम्याच्या अहवालानुसार जिल्ह्यात एकूण २० हजार २३१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. शेती पिकाच्या नुकसान भरपाईसाठी २३ कोटी ७१ लाख रूपयांचा निधी आवश्यक आहे.संजय सरोवर व गोसेखुर्द धरणाचे पाणी २८ ऑगस्टपासून सोडण्यात आले. गोसेखुर्द धरणाचे सर्व दरवाजे उघडल्याने पाण्याचा मोठा विसर्ग होता. या पुराचा फटका देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली, अहेरी, सिरोंचा व चामोर्शी या सहा तालुक्याला बसला. या सहा तालुक्यातील खरीप हंगामातील धान व इतर पिके पाण्याखाली आली. काही घरांची पडझड झाली. तसेच पशुधन मृत्यूमुखी पडले. गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्याने आलेल्या या महापुरामुळे जिल्ह्यातील प्रमुख १० मार्ग चार दिवस बंद होते. परिणामी वाहतूक ठप्प पडली होती. शेतकरी, व्यावसायिक, पशुपालक या सर्वांना या पुराचा फटका बसला.प्रशासनाच्या पंचनामा अहवालानुसार ३३ टक्केपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झालेले एकूण बाधित क्षेत्र २० हजार २३१ इतके आहे. यामध्ये गडचिरोली तालुक्यात ६०६४.८६ हेक्टर क्षेत्र, चामोर्शी ४०६१.०८, मुलचेरा २७.८५, देसाईगंज २४८६.६७, आरमोरी ४८४९.०४, अहेरी १०५५.१७ व सिरोंचा तालुक्यात १६८६.५८ इतक्या हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. कोरडवाहू व आश्वासित सिंचनाखालील पिकांच्या या नुकसानीपोटी प्रती हेक्टर ६ हजार ८०० रूपये नुसार एकूण २२ हजार ६४८ शेतकऱ्यांना एकूण २३ कोटी ७१ लाख ३३ हजार ८२६ इतके अनुदान मदतीसाठी लागणार आहे. याशिवाय बहुवार्षिक पिकांचेही गोसेखुर्द पाण्याने नुकसान झाले आहे.

२ हजार ११३ कोंबड्यांचा बळीगोसेखुर्द धरणाच्या पाणी सोडून महापूर आल्याने चार दिवसात गडचिरोली, देसाईगंज व आरमोरी या तीन तालुक्यातील एकूण २ हजार ११३ कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील ३१०, मुलचेरा १ हजार २४५ व आरमोरी तालुक्यातील ५५८ कोंबड्यांचा समावेश आहे. याशिवाय पुराच्या पाण्यात सापडून सहा दुधाळ जनावरे दगावली. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील एक, देसाईगंज चार व आरमोरी तालुक्यातील एका जनावराचा समावेश आहे. या नुकसानीपोटी शासनाकडून लाखो रूपयांचे अनुदान लागणार आहे.

टॅग्स :floodपूर