शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
4
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
5
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
6
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
7
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
8
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
9
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
10
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
11
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
12
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
13
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
14
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
15
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
17
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
18
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
19
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
20
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा

पुरामुळे गडचिरोलीत २० हजारावर हेक्टर क्षेत्र बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 19:17 IST

गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्यामुळे २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत अर्ध्या गडचिरोली जिल्ह्यात महापूर आला होता. परिणामी सहा तालुक्यातील धान व इतर पिके पाण्याखाली आली.

ठळक मुद्दे २३ कोटींची मदत आवश्यकगोसेखुर्द धरणाच्या पाण्याने धान व इतर पिकांचे मोठे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्यामुळे २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत अर्ध्या गडचिरोली जिल्ह्यात महापूर आला होता. परिणामी सहा तालुक्यातील धान व इतर पिके पाण्याखाली आली. प्रशासनाच्या वतीने नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. पंचनाम्याच्या अहवालानुसार जिल्ह्यात एकूण २० हजार २३१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. शेती पिकाच्या नुकसान भरपाईसाठी २३ कोटी ७१ लाख रूपयांचा निधी आवश्यक आहे.संजय सरोवर व गोसेखुर्द धरणाचे पाणी २८ ऑगस्टपासून सोडण्यात आले. गोसेखुर्द धरणाचे सर्व दरवाजे उघडल्याने पाण्याचा मोठा विसर्ग होता. या पुराचा फटका देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली, अहेरी, सिरोंचा व चामोर्शी या सहा तालुक्याला बसला. या सहा तालुक्यातील खरीप हंगामातील धान व इतर पिके पाण्याखाली आली. काही घरांची पडझड झाली. तसेच पशुधन मृत्यूमुखी पडले. गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्याने आलेल्या या महापुरामुळे जिल्ह्यातील प्रमुख १० मार्ग चार दिवस बंद होते. परिणामी वाहतूक ठप्प पडली होती. शेतकरी, व्यावसायिक, पशुपालक या सर्वांना या पुराचा फटका बसला.प्रशासनाच्या पंचनामा अहवालानुसार ३३ टक्केपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झालेले एकूण बाधित क्षेत्र २० हजार २३१ इतके आहे. यामध्ये गडचिरोली तालुक्यात ६०६४.८६ हेक्टर क्षेत्र, चामोर्शी ४०६१.०८, मुलचेरा २७.८५, देसाईगंज २४८६.६७, आरमोरी ४८४९.०४, अहेरी १०५५.१७ व सिरोंचा तालुक्यात १६८६.५८ इतक्या हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. कोरडवाहू व आश्वासित सिंचनाखालील पिकांच्या या नुकसानीपोटी प्रती हेक्टर ६ हजार ८०० रूपये नुसार एकूण २२ हजार ६४८ शेतकऱ्यांना एकूण २३ कोटी ७१ लाख ३३ हजार ८२६ इतके अनुदान मदतीसाठी लागणार आहे. याशिवाय बहुवार्षिक पिकांचेही गोसेखुर्द पाण्याने नुकसान झाले आहे.

२ हजार ११३ कोंबड्यांचा बळीगोसेखुर्द धरणाच्या पाणी सोडून महापूर आल्याने चार दिवसात गडचिरोली, देसाईगंज व आरमोरी या तीन तालुक्यातील एकूण २ हजार ११३ कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील ३१०, मुलचेरा १ हजार २४५ व आरमोरी तालुक्यातील ५५८ कोंबड्यांचा समावेश आहे. याशिवाय पुराच्या पाण्यात सापडून सहा दुधाळ जनावरे दगावली. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील एक, देसाईगंज चार व आरमोरी तालुक्यातील एका जनावराचा समावेश आहे. या नुकसानीपोटी शासनाकडून लाखो रूपयांचे अनुदान लागणार आहे.

टॅग्स :floodपूर