शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

पूरपीडित शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:37 IST

मागील वर्षी गोंदिया जिल्ह्यातील गोसे खुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदीला सोडण्यात आल्याने महापुरामुळे नदीकाठावरील १७ हजार ३३ हेक्टरपेक्षा जास्त ...

मागील वर्षी गोंदिया जिल्ह्यातील गोसे खुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदीला सोडण्यात आल्याने महापुरामुळे नदीकाठावरील १७ हजार ३३ हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन पूरबाधित होऊन उभी पिके नेस्तनाबूत झाली. गोसे खुर्द प्रकल्पातील संबंधित अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे महापूर आला. याचा फटका नदीकाठावरील पिकांना बसला. शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई म्हणून १८ हजार ५०० रुपये देण्यात येणार असल्याचे सूतोवाच करण्यात आले होते.

दरम्यान, पंतप्रधान विमा योजनेंतर्गत पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना नुकसानापोटी ३९ हजार रुपये प्रति हेक्टर विमा कंपन्यांकडून प्राप्त होतील, अशी अपेक्षा होती; मात्र जाहीर करण्यात आलेल्या नुकसान भरपाईच्या तुलनेत शेतकऱ्यांना राज्य शासनाने हेक्टरी ६ हजार ८०० रुपये नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली. कोंढाळा येथील अनेक शेतकरी नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित आहेत. जिल्हा प्रशासनाने लक्ष घालून पूरपीडित शेतकऱ्यांना लवकर भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.