शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
2
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
3
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
4
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
5
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
6
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
7
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
8
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
9
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
10
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
11
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
12
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
13
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
14
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
15
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
16
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
17
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
18
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
19
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

आत्मसमर्पित नक्षल्यांच्या वस्तीत फडकला तिरंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 22:13 IST

अहेरी तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या आत्मसमर्पित नक्षल्यांची वस्ती शांतीनिकेतनमध्ये पहिल्यांदाच तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला वस्तीतील सर्व आत्मसमर्पित नक्षली उपस्थित होते.

ठळक मुद्दे २० वर्षानंतर पहिल्यांदाच ध्वजारोहण : कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता आनंद

लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : अहेरी तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या आत्मसमर्पित नक्षल्यांची वस्ती शांतीनिकेतनमध्ये पहिल्यांदाच तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला वस्तीतील सर्व आत्मसमर्पित नक्षली उपस्थित होते.एकेकाळी हातात बंदूका घेऊन नक्षल चळवळीतील हे सदस्य लोकांचे मुडदे पाडत होते. लोकशाहीवर विश्वास नसल्याने प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी दुर्गम भागातील शाळा, महाविद्यालयांमध्ये काळा ध्वज जबरदस्तीने फडकावित होते. मात्र याच नक्षल्यांचे आता मनपरिवर्तन झाले असून लोकशाहीवरील त्यांचा विश्वास वाढायला लागला आहे.प्राणहिता पोलीस मुख्यालयाजवळ आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांचे सुमारे २५ कुटुंब वास्तव्यास आहेत. त्यांच्या वस्तीला शांतीनिकेतन हे नाव देण्यात आले आहे. उडाण फाऊंडेशनच्या मदतीने २६ जानेवारी रोजी या ठिकाणी ध्वजारोहण करण्याचे नियोजन करण्यात आले. ध्वजारोहणाबाबतची माहिती आत्मसमर्पितांना देण्यात आली. ते एका शब्दावर तयार झाले. महिलांनी भल्या पहाटे उठून घरासमोर सडासारवण करून अंगणात रांगोळी टाकली. आपल्या लहान मुलांना नवीन कपडे घालून तिरंगा फडकविण्याच्या ठिकाणी जमल्या होत्या. दिवाळी उत्सव असावा, याप्रमाणे येथील वातावरण आनंदमय झाले होते. माजी नक्षल रैनू पुंगाटी याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. रैनू पुंगाटी हा नक्षल चळवळीत असताना ‘जनता सरकार’ या नक्षल संघटनेचा अध्यक्ष होता. या कार्यक्रमाला आत्मसमर्पित २५ जोडपे व अंगणवाडीतील २२ चिमुकले उपस्थित होते. सदर उपक्रम उडाण फाऊंडेशनचे संतोष मंथनवार, रोमित तोंबर्लावार, डॉ. सलुजा, गुड्डू कुलकर्णी यांच्या पुढाकारातून पार पडला.२० वर्षांपासून सोयीसुविधांची प्रतीक्षाआत्मसमर्पित नक्षल्यांचे वास्तव्य असलेली शांतीनिकेतन (प्रभू सदन) वस्ती २० वर्षांपूर्वी अस्तित्त्वात आली. मात्र २० वर्षानंतरही या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधा प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या नाहीत. या वस्तीत पाण्याची सुविधा नाही. पक्के रस्ते नाहीत. शिक्षणाची सोय नाही. लोकशाही व प्रशासनावर विश्वास ठेवत या नक्षल्यांनी नक्षल चळवळीला रामराम ठोकला. वस्ती स्थापन करतेवेळी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्वासन पोलीस विभाग व इतर विभागांनी दिले होते. मात्र २० वर्षांच्या कालावधीतही या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यात याव्या, यासाठी आत्मसमर्पित नक्षल्यांनी अनेकवेळा पोलीस विभाग व इतर विभागांकडे पाठपुरावा केला. मात्र याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. ही खंत येथील नागरिकांनी बोलून दाखविली.