शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

आत्मसमर्पित नक्षल्यांच्या वस्तीत फडकला तिरंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 22:13 IST

अहेरी तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या आत्मसमर्पित नक्षल्यांची वस्ती शांतीनिकेतनमध्ये पहिल्यांदाच तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला वस्तीतील सर्व आत्मसमर्पित नक्षली उपस्थित होते.

ठळक मुद्दे २० वर्षानंतर पहिल्यांदाच ध्वजारोहण : कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता आनंद

लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : अहेरी तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या आत्मसमर्पित नक्षल्यांची वस्ती शांतीनिकेतनमध्ये पहिल्यांदाच तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला वस्तीतील सर्व आत्मसमर्पित नक्षली उपस्थित होते.एकेकाळी हातात बंदूका घेऊन नक्षल चळवळीतील हे सदस्य लोकांचे मुडदे पाडत होते. लोकशाहीवर विश्वास नसल्याने प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी दुर्गम भागातील शाळा, महाविद्यालयांमध्ये काळा ध्वज जबरदस्तीने फडकावित होते. मात्र याच नक्षल्यांचे आता मनपरिवर्तन झाले असून लोकशाहीवरील त्यांचा विश्वास वाढायला लागला आहे.प्राणहिता पोलीस मुख्यालयाजवळ आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांचे सुमारे २५ कुटुंब वास्तव्यास आहेत. त्यांच्या वस्तीला शांतीनिकेतन हे नाव देण्यात आले आहे. उडाण फाऊंडेशनच्या मदतीने २६ जानेवारी रोजी या ठिकाणी ध्वजारोहण करण्याचे नियोजन करण्यात आले. ध्वजारोहणाबाबतची माहिती आत्मसमर्पितांना देण्यात आली. ते एका शब्दावर तयार झाले. महिलांनी भल्या पहाटे उठून घरासमोर सडासारवण करून अंगणात रांगोळी टाकली. आपल्या लहान मुलांना नवीन कपडे घालून तिरंगा फडकविण्याच्या ठिकाणी जमल्या होत्या. दिवाळी उत्सव असावा, याप्रमाणे येथील वातावरण आनंदमय झाले होते. माजी नक्षल रैनू पुंगाटी याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. रैनू पुंगाटी हा नक्षल चळवळीत असताना ‘जनता सरकार’ या नक्षल संघटनेचा अध्यक्ष होता. या कार्यक्रमाला आत्मसमर्पित २५ जोडपे व अंगणवाडीतील २२ चिमुकले उपस्थित होते. सदर उपक्रम उडाण फाऊंडेशनचे संतोष मंथनवार, रोमित तोंबर्लावार, डॉ. सलुजा, गुड्डू कुलकर्णी यांच्या पुढाकारातून पार पडला.२० वर्षांपासून सोयीसुविधांची प्रतीक्षाआत्मसमर्पित नक्षल्यांचे वास्तव्य असलेली शांतीनिकेतन (प्रभू सदन) वस्ती २० वर्षांपूर्वी अस्तित्त्वात आली. मात्र २० वर्षानंतरही या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधा प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या नाहीत. या वस्तीत पाण्याची सुविधा नाही. पक्के रस्ते नाहीत. शिक्षणाची सोय नाही. लोकशाही व प्रशासनावर विश्वास ठेवत या नक्षल्यांनी नक्षल चळवळीला रामराम ठोकला. वस्ती स्थापन करतेवेळी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्वासन पोलीस विभाग व इतर विभागांनी दिले होते. मात्र २० वर्षांच्या कालावधीतही या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यात याव्या, यासाठी आत्मसमर्पित नक्षल्यांनी अनेकवेळा पोलीस विभाग व इतर विभागांकडे पाठपुरावा केला. मात्र याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. ही खंत येथील नागरिकांनी बोलून दाखविली.