शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आत्मसमर्पित नक्षल्यांच्या वस्तीत फडकला तिरंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 22:13 IST

अहेरी तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या आत्मसमर्पित नक्षल्यांची वस्ती शांतीनिकेतनमध्ये पहिल्यांदाच तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला वस्तीतील सर्व आत्मसमर्पित नक्षली उपस्थित होते.

ठळक मुद्दे २० वर्षानंतर पहिल्यांदाच ध्वजारोहण : कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता आनंद

लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : अहेरी तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या आत्मसमर्पित नक्षल्यांची वस्ती शांतीनिकेतनमध्ये पहिल्यांदाच तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला वस्तीतील सर्व आत्मसमर्पित नक्षली उपस्थित होते.एकेकाळी हातात बंदूका घेऊन नक्षल चळवळीतील हे सदस्य लोकांचे मुडदे पाडत होते. लोकशाहीवर विश्वास नसल्याने प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी दुर्गम भागातील शाळा, महाविद्यालयांमध्ये काळा ध्वज जबरदस्तीने फडकावित होते. मात्र याच नक्षल्यांचे आता मनपरिवर्तन झाले असून लोकशाहीवरील त्यांचा विश्वास वाढायला लागला आहे.प्राणहिता पोलीस मुख्यालयाजवळ आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांचे सुमारे २५ कुटुंब वास्तव्यास आहेत. त्यांच्या वस्तीला शांतीनिकेतन हे नाव देण्यात आले आहे. उडाण फाऊंडेशनच्या मदतीने २६ जानेवारी रोजी या ठिकाणी ध्वजारोहण करण्याचे नियोजन करण्यात आले. ध्वजारोहणाबाबतची माहिती आत्मसमर्पितांना देण्यात आली. ते एका शब्दावर तयार झाले. महिलांनी भल्या पहाटे उठून घरासमोर सडासारवण करून अंगणात रांगोळी टाकली. आपल्या लहान मुलांना नवीन कपडे घालून तिरंगा फडकविण्याच्या ठिकाणी जमल्या होत्या. दिवाळी उत्सव असावा, याप्रमाणे येथील वातावरण आनंदमय झाले होते. माजी नक्षल रैनू पुंगाटी याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. रैनू पुंगाटी हा नक्षल चळवळीत असताना ‘जनता सरकार’ या नक्षल संघटनेचा अध्यक्ष होता. या कार्यक्रमाला आत्मसमर्पित २५ जोडपे व अंगणवाडीतील २२ चिमुकले उपस्थित होते. सदर उपक्रम उडाण फाऊंडेशनचे संतोष मंथनवार, रोमित तोंबर्लावार, डॉ. सलुजा, गुड्डू कुलकर्णी यांच्या पुढाकारातून पार पडला.२० वर्षांपासून सोयीसुविधांची प्रतीक्षाआत्मसमर्पित नक्षल्यांचे वास्तव्य असलेली शांतीनिकेतन (प्रभू सदन) वस्ती २० वर्षांपूर्वी अस्तित्त्वात आली. मात्र २० वर्षानंतरही या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधा प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या नाहीत. या वस्तीत पाण्याची सुविधा नाही. पक्के रस्ते नाहीत. शिक्षणाची सोय नाही. लोकशाही व प्रशासनावर विश्वास ठेवत या नक्षल्यांनी नक्षल चळवळीला रामराम ठोकला. वस्ती स्थापन करतेवेळी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्वासन पोलीस विभाग व इतर विभागांनी दिले होते. मात्र २० वर्षांच्या कालावधीतही या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यात याव्या, यासाठी आत्मसमर्पित नक्षल्यांनी अनेकवेळा पोलीस विभाग व इतर विभागांकडे पाठपुरावा केला. मात्र याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. ही खंत येथील नागरिकांनी बोलून दाखविली.