शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

पालिकेच्या तीन प्राथमिक शाळेत होणार पाचवा वर्ग

By admin | Updated: May 14, 2016 01:13 IST

इयत्ता चौथीपर्यंत असणाऱ्या नगर परिषद व जिल्हा परिषद शाळांना पाचवा वर्ग जोडण्याबाबतचे धोरण राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतले आहे.

विद्यार्थ्यांचे दाखले थांबविले : प्रशासनाकडून हालचाली वाढल्यागडचिरोली : इयत्ता चौथीपर्यंत असणाऱ्या नगर परिषद व जिल्हा परिषद शाळांना पाचवा वर्ग जोडण्याबाबतचे धोरण राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतले आहे. त्यानुसार गडचिरोली नगर पालिका प्रशासनाने तीन प्राथमिक शाळांना सन २०१६-१७ या शैक्षणिक सत्रापासून पाचवा वर्ग जोडण्यास मंजुरी दिली आहे. त्याअनुषंगाने या शाळांमध्ये इयत्ता चौथी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याबाबतचे प्रमाणपत्र थांबविण्याचे तोंडी निर्देश देण्यात आले आहेत. या अनुषंगाने पालिका प्रशासनाच्या हालचाली वाढल्या आहेत. पुढील शैक्षणिक सत्रापासून सावित्रीबाई फुले न.प. प्राथमिक शाळा गोकुलनगर, इंदिरा गांधी न.प. प्राथमिक शाळा व महात्मा गांधी न.प. प्राथमिक शाळा येथे पाचवा वर्ग जोडण्यात येणार आहे. गडचिरोली नगर पालिकेच्या शहरात एकूण १० शाळा आहेत. यापैकी दोन शाळांमध्ये आठवी, एका शाळेमध्ये सातवी व एका शाळेमध्ये इयत्ता पाचवीपर्यंतच्या शिक्षणाची सुविधा आहे. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शिक्षणाची सुविधा असणाऱ्या पालिकेच्या एकूण सहा शाळा आहेत. यापैकी तीन शाळांमध्ये पुढील शैक्षणिक सत्रापासून पाचवा वर्ग जोडण्यास न.प. प्रशासनाने मंजुरी दिली आहे. उर्वरित तीन शाळांपैकी एक ते दोन शाळांमध्ये पुन्हा पाचवा वर्ग जोडण्याचे नियोजनही पालिका प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. याशिवाय शहरातील सर्वच १० शाळा १०० टक्के डिजीटल करण्यासाठी पालिका प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)खासगी शाळांतील शिक्षकांची पंचाईतखासगी व्यवस्थापनांच्या अनुदानित व विनाअनुदानित उच्च प्राथमिक शाळा शहरात अनेक आहेत. या शाळेतील शिक्षक दरवर्षी इयत्ता चौथी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले पालिकेच्या शाळांमधून मिळवित होते. मात्र यंदा पालिका प्रशासनाने इयत्ता चौथीला पाचवा वर्ग जोडण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे इयत्ता चौथी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले देण्याची कार्यवाही तुर्तास थांबविण्यात आली आहे. परिणामी खासगी शाळांतील शिक्षकांची विद्यार्थ्यांसाठी प्रचंड पंचाईत झाली आहे. शाळांच्या दर्जानुसार प्रवेशीत विद्यार्थ्यांचे रेटशहरातील नामांकित व दर्जेदार शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संबंधित विद्यार्थी व पालकांना एक हजार रूपयाचे आमिष दाखविले जात आहे. त्या खालोखाल दर्जा असलेल्या शाळांकडून दोन ते तीन हजार रूपये तसेच यापेक्षाही दर्जा कमी असलेल्या शाळांच्या शिक्षकांकडून चार ते पाच हजार रूपयांचे आमिष विद्यार्थी व पालकांना दाखविले जात आहे. शाळांच्या दर्जानुसार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून इयत्ता पाचवीच्या प्रवेशासाठी आमिष दाखविले जात आहे.विद्यार्थी प्रवेशासाठी प्रलोभनखासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश करून घेण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार नोकरी टिकविण्यासाठी खासगी शाळांमधील शिक्षक शहरात विद्यार्थी प्रवेशासाठी फिरत आहेत. इयत्ता चौथी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी रोख रक्कम, गणेवश, सायकल, बूट व इतर वस्तुंचेही आमिष दाखविले जात आहे.