शहरं
Join us  
Trending Stories
1
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
2
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
3
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
4
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
5
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
7
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
8
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
9
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
10
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता
11
"तुम मराठी लोग भंगार हो..." नाशिकमध्ये परप्रांतीयानं दाखवला माज; नेमकं काय घडली घटना?
12
सरप्राइज मिळालं अन् मनातली ती भीती दूर झाली! वादळी शतकी खेळीनंतर रिंकू सिंहनं शेअर केली खास गोष्ट
13
"ट्रम्प असे आहेत जे सकाळी मोदींशी हात मिळवतील, रात्री पाठीत खंजीर खुपसतील," कोणी केली इतकी मोठी टीका?
14
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
15
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
16
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
17
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
18
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
19
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
20
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण

पालिकेच्या तीन प्राथमिक शाळेत होणार पाचवा वर्ग

By admin | Updated: May 14, 2016 01:13 IST

इयत्ता चौथीपर्यंत असणाऱ्या नगर परिषद व जिल्हा परिषद शाळांना पाचवा वर्ग जोडण्याबाबतचे धोरण राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतले आहे.

विद्यार्थ्यांचे दाखले थांबविले : प्रशासनाकडून हालचाली वाढल्यागडचिरोली : इयत्ता चौथीपर्यंत असणाऱ्या नगर परिषद व जिल्हा परिषद शाळांना पाचवा वर्ग जोडण्याबाबतचे धोरण राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतले आहे. त्यानुसार गडचिरोली नगर पालिका प्रशासनाने तीन प्राथमिक शाळांना सन २०१६-१७ या शैक्षणिक सत्रापासून पाचवा वर्ग जोडण्यास मंजुरी दिली आहे. त्याअनुषंगाने या शाळांमध्ये इयत्ता चौथी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याबाबतचे प्रमाणपत्र थांबविण्याचे तोंडी निर्देश देण्यात आले आहेत. या अनुषंगाने पालिका प्रशासनाच्या हालचाली वाढल्या आहेत. पुढील शैक्षणिक सत्रापासून सावित्रीबाई फुले न.प. प्राथमिक शाळा गोकुलनगर, इंदिरा गांधी न.प. प्राथमिक शाळा व महात्मा गांधी न.प. प्राथमिक शाळा येथे पाचवा वर्ग जोडण्यात येणार आहे. गडचिरोली नगर पालिकेच्या शहरात एकूण १० शाळा आहेत. यापैकी दोन शाळांमध्ये आठवी, एका शाळेमध्ये सातवी व एका शाळेमध्ये इयत्ता पाचवीपर्यंतच्या शिक्षणाची सुविधा आहे. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शिक्षणाची सुविधा असणाऱ्या पालिकेच्या एकूण सहा शाळा आहेत. यापैकी तीन शाळांमध्ये पुढील शैक्षणिक सत्रापासून पाचवा वर्ग जोडण्यास न.प. प्रशासनाने मंजुरी दिली आहे. उर्वरित तीन शाळांपैकी एक ते दोन शाळांमध्ये पुन्हा पाचवा वर्ग जोडण्याचे नियोजनही पालिका प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. याशिवाय शहरातील सर्वच १० शाळा १०० टक्के डिजीटल करण्यासाठी पालिका प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)खासगी शाळांतील शिक्षकांची पंचाईतखासगी व्यवस्थापनांच्या अनुदानित व विनाअनुदानित उच्च प्राथमिक शाळा शहरात अनेक आहेत. या शाळेतील शिक्षक दरवर्षी इयत्ता चौथी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले पालिकेच्या शाळांमधून मिळवित होते. मात्र यंदा पालिका प्रशासनाने इयत्ता चौथीला पाचवा वर्ग जोडण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे इयत्ता चौथी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले देण्याची कार्यवाही तुर्तास थांबविण्यात आली आहे. परिणामी खासगी शाळांतील शिक्षकांची विद्यार्थ्यांसाठी प्रचंड पंचाईत झाली आहे. शाळांच्या दर्जानुसार प्रवेशीत विद्यार्थ्यांचे रेटशहरातील नामांकित व दर्जेदार शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संबंधित विद्यार्थी व पालकांना एक हजार रूपयाचे आमिष दाखविले जात आहे. त्या खालोखाल दर्जा असलेल्या शाळांकडून दोन ते तीन हजार रूपये तसेच यापेक्षाही दर्जा कमी असलेल्या शाळांच्या शिक्षकांकडून चार ते पाच हजार रूपयांचे आमिष विद्यार्थी व पालकांना दाखविले जात आहे. शाळांच्या दर्जानुसार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून इयत्ता पाचवीच्या प्रवेशासाठी आमिष दाखविले जात आहे.विद्यार्थी प्रवेशासाठी प्रलोभनखासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश करून घेण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार नोकरी टिकविण्यासाठी खासगी शाळांमधील शिक्षक शहरात विद्यार्थी प्रवेशासाठी फिरत आहेत. इयत्ता चौथी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी रोख रक्कम, गणेवश, सायकल, बूट व इतर वस्तुंचेही आमिष दाखविले जात आहे.