शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

पाच लाखांचा बोनस रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 05:00 IST

२०१९ च्या उन्हाळ्यात कचलेर गावातील ५२ नागरिकांनी तेंदूपत्ता संकलाचे काम केले. या नागरिकांना तेंदूपत्त्याची मजुरी देण्यात आली. परंतु बोनसचे ५ लाख १० हजार ३२३ रूपये अद्यापही मिळाले नाही. विशेष म्हणजे, बोनसची रक्कम संबंधित कंत्राटदाराकडून मागील वर्षीच देण्यात आली. परंतु तत्कालीन ग्रामसेवक व पेसा समितीने संपूर्ण रक्कम बँकेत जमा केली नाही.

ठळक मुद्देचौकशीची मागणी : कचलेर गावातील मजुरांची बीडीओंकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : तालुक्यातील हालेवारा ग्राम पंचायत अंतर्गत कचलेर गावातील मजुरांनी २०१९ च्या उन्हाळ्यात तेंदूपत्ता संकलन केले. काही दिवसानंतर मजुरांना तेंदूपत्याची मजुरी देण्यात आली. परंतु बोनसची रक्कम अद्यापही मिळाली नाही. जवळपास दीड वर्षाचा कालावधी उलटूनही मजूर तेंदू बोनसपासून वंचित आहेत. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करावी, अशी तक्रार कचलेरवासीयांनी बीडीओंकडे केली आहे.२०१९ च्या उन्हाळ्यात कचलेर गावातील ५२ नागरिकांनी तेंदूपत्ता संकलाचे काम केले. या नागरिकांना तेंदूपत्त्याची मजुरी देण्यात आली. परंतु बोनसचे ५ लाख १० हजार ३२३ रूपये अद्यापही मिळाले नाही. विशेष म्हणजे, बोनसची रक्कम संबंधित कंत्राटदाराकडून मागील वर्षीच देण्यात आली. परंतु तत्कालीन ग्रामसेवक व पेसा समितीने संपूर्ण रक्कम बँकेत जमा केली नाही. परिणामी तेंदूपत्ता संकलन करणारे मजूर बोनसच्या रकमेपासून वंचित राहिले. उन्हाळ्यात हमखास रोजगार देणारा हंगाम म्हणून तेंदू हंगामाची ओळख आहे. त्यामुळे दुुर्गम भागातील संपूर्ण कुटुंब तेंदूपत्ता संकलनाचे काम करतात. जवळपास १५ ते २० दिवस हा हंगाम चालतो तर काही गावांमध्ये ८ ते १० दिवस हा हंगाम चालत असतो. या माध्यमातून दुर्गम भागातील नागरिकांना रोजगार मिळतो. या रोजगाराच्या भरवशावर नागरिक खरीप हंगामातील शेतीचे नियोजन करतात. तेंदू हंगाम आटोपल्यानंतर ८ ते १० दिवसांत मजुरीची रक्कम दिली जाते. त्यानंतर तीन ते चार महिन्यातच बोनसही संबंधित मंजुरांच्या बँक खात्यात जमा केला जातो. परंतु जवळपास दीड वर्षांचा कालावधी उलटूनही अद्यापही कचलेर गावातील मजुरांना बोनस मिळाला नसल्याने नागरिकांमध्ये शंका निर्माण झाली आहे.८१ हजार रूपये गेले कुठे?दीड वर्षापासून कसनसूर येथील ५२ मजुरांना तेंदू बोनस मिळाला नाही. त्यामुळे येथील नागरिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत जाऊन चौकशी करीत आहेत. दोन ते तीन वेळा बँकेत जाऊन चौकशी केली असता, बँक व्यवस्थापकांनी ८१ हजार रूपयांची रक्कम कमी असल्याचे सांगितले. ही रक्कम मिळाल्याशिवाय बोनसची रक्कम बँक खात्यात जमा करता येणार नाही, असे सांगितले. ८१ हजार रूपये गेले कुठे, अशी विचारणा केली असता, पेसा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही. सर्व प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी बीडीओंकडे केली.