शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादीचे देशव्यापी पुनरावलोकन का गरजेचे? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
3
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
5
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
6
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
7
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
8
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
9
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
10
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
11
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
12
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
13
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
14
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
15
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
16
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
17
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
18
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
19
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
20
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर

पाच लाखांचा बोनस रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 05:00 IST

२०१९ च्या उन्हाळ्यात कचलेर गावातील ५२ नागरिकांनी तेंदूपत्ता संकलाचे काम केले. या नागरिकांना तेंदूपत्त्याची मजुरी देण्यात आली. परंतु बोनसचे ५ लाख १० हजार ३२३ रूपये अद्यापही मिळाले नाही. विशेष म्हणजे, बोनसची रक्कम संबंधित कंत्राटदाराकडून मागील वर्षीच देण्यात आली. परंतु तत्कालीन ग्रामसेवक व पेसा समितीने संपूर्ण रक्कम बँकेत जमा केली नाही.

ठळक मुद्देचौकशीची मागणी : कचलेर गावातील मजुरांची बीडीओंकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : तालुक्यातील हालेवारा ग्राम पंचायत अंतर्गत कचलेर गावातील मजुरांनी २०१९ च्या उन्हाळ्यात तेंदूपत्ता संकलन केले. काही दिवसानंतर मजुरांना तेंदूपत्याची मजुरी देण्यात आली. परंतु बोनसची रक्कम अद्यापही मिळाली नाही. जवळपास दीड वर्षाचा कालावधी उलटूनही मजूर तेंदू बोनसपासून वंचित आहेत. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करावी, अशी तक्रार कचलेरवासीयांनी बीडीओंकडे केली आहे.२०१९ च्या उन्हाळ्यात कचलेर गावातील ५२ नागरिकांनी तेंदूपत्ता संकलाचे काम केले. या नागरिकांना तेंदूपत्त्याची मजुरी देण्यात आली. परंतु बोनसचे ५ लाख १० हजार ३२३ रूपये अद्यापही मिळाले नाही. विशेष म्हणजे, बोनसची रक्कम संबंधित कंत्राटदाराकडून मागील वर्षीच देण्यात आली. परंतु तत्कालीन ग्रामसेवक व पेसा समितीने संपूर्ण रक्कम बँकेत जमा केली नाही. परिणामी तेंदूपत्ता संकलन करणारे मजूर बोनसच्या रकमेपासून वंचित राहिले. उन्हाळ्यात हमखास रोजगार देणारा हंगाम म्हणून तेंदू हंगामाची ओळख आहे. त्यामुळे दुुर्गम भागातील संपूर्ण कुटुंब तेंदूपत्ता संकलनाचे काम करतात. जवळपास १५ ते २० दिवस हा हंगाम चालतो तर काही गावांमध्ये ८ ते १० दिवस हा हंगाम चालत असतो. या माध्यमातून दुर्गम भागातील नागरिकांना रोजगार मिळतो. या रोजगाराच्या भरवशावर नागरिक खरीप हंगामातील शेतीचे नियोजन करतात. तेंदू हंगाम आटोपल्यानंतर ८ ते १० दिवसांत मजुरीची रक्कम दिली जाते. त्यानंतर तीन ते चार महिन्यातच बोनसही संबंधित मंजुरांच्या बँक खात्यात जमा केला जातो. परंतु जवळपास दीड वर्षांचा कालावधी उलटूनही अद्यापही कचलेर गावातील मजुरांना बोनस मिळाला नसल्याने नागरिकांमध्ये शंका निर्माण झाली आहे.८१ हजार रूपये गेले कुठे?दीड वर्षापासून कसनसूर येथील ५२ मजुरांना तेंदू बोनस मिळाला नाही. त्यामुळे येथील नागरिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत जाऊन चौकशी करीत आहेत. दोन ते तीन वेळा बँकेत जाऊन चौकशी केली असता, बँक व्यवस्थापकांनी ८१ हजार रूपयांची रक्कम कमी असल्याचे सांगितले. ही रक्कम मिळाल्याशिवाय बोनसची रक्कम बँक खात्यात जमा करता येणार नाही, असे सांगितले. ८१ हजार रूपये गेले कुठे, अशी विचारणा केली असता, पेसा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही. सर्व प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी बीडीओंकडे केली.