शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
3
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
4
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
5
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
6
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
7
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
8
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
9
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
10
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
11
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
12
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
13
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
14
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
15
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
16
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
17
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
18
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
19
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
20
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...

पाच लाखांचा बोनस रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 05:00 IST

२०१९ च्या उन्हाळ्यात कचलेर गावातील ५२ नागरिकांनी तेंदूपत्ता संकलाचे काम केले. या नागरिकांना तेंदूपत्त्याची मजुरी देण्यात आली. परंतु बोनसचे ५ लाख १० हजार ३२३ रूपये अद्यापही मिळाले नाही. विशेष म्हणजे, बोनसची रक्कम संबंधित कंत्राटदाराकडून मागील वर्षीच देण्यात आली. परंतु तत्कालीन ग्रामसेवक व पेसा समितीने संपूर्ण रक्कम बँकेत जमा केली नाही.

ठळक मुद्देचौकशीची मागणी : कचलेर गावातील मजुरांची बीडीओंकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : तालुक्यातील हालेवारा ग्राम पंचायत अंतर्गत कचलेर गावातील मजुरांनी २०१९ च्या उन्हाळ्यात तेंदूपत्ता संकलन केले. काही दिवसानंतर मजुरांना तेंदूपत्याची मजुरी देण्यात आली. परंतु बोनसची रक्कम अद्यापही मिळाली नाही. जवळपास दीड वर्षाचा कालावधी उलटूनही मजूर तेंदू बोनसपासून वंचित आहेत. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करावी, अशी तक्रार कचलेरवासीयांनी बीडीओंकडे केली आहे.२०१९ च्या उन्हाळ्यात कचलेर गावातील ५२ नागरिकांनी तेंदूपत्ता संकलाचे काम केले. या नागरिकांना तेंदूपत्त्याची मजुरी देण्यात आली. परंतु बोनसचे ५ लाख १० हजार ३२३ रूपये अद्यापही मिळाले नाही. विशेष म्हणजे, बोनसची रक्कम संबंधित कंत्राटदाराकडून मागील वर्षीच देण्यात आली. परंतु तत्कालीन ग्रामसेवक व पेसा समितीने संपूर्ण रक्कम बँकेत जमा केली नाही. परिणामी तेंदूपत्ता संकलन करणारे मजूर बोनसच्या रकमेपासून वंचित राहिले. उन्हाळ्यात हमखास रोजगार देणारा हंगाम म्हणून तेंदू हंगामाची ओळख आहे. त्यामुळे दुुर्गम भागातील संपूर्ण कुटुंब तेंदूपत्ता संकलनाचे काम करतात. जवळपास १५ ते २० दिवस हा हंगाम चालतो तर काही गावांमध्ये ८ ते १० दिवस हा हंगाम चालत असतो. या माध्यमातून दुर्गम भागातील नागरिकांना रोजगार मिळतो. या रोजगाराच्या भरवशावर नागरिक खरीप हंगामातील शेतीचे नियोजन करतात. तेंदू हंगाम आटोपल्यानंतर ८ ते १० दिवसांत मजुरीची रक्कम दिली जाते. त्यानंतर तीन ते चार महिन्यातच बोनसही संबंधित मंजुरांच्या बँक खात्यात जमा केला जातो. परंतु जवळपास दीड वर्षांचा कालावधी उलटूनही अद्यापही कचलेर गावातील मजुरांना बोनस मिळाला नसल्याने नागरिकांमध्ये शंका निर्माण झाली आहे.८१ हजार रूपये गेले कुठे?दीड वर्षापासून कसनसूर येथील ५२ मजुरांना तेंदू बोनस मिळाला नाही. त्यामुळे येथील नागरिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत जाऊन चौकशी करीत आहेत. दोन ते तीन वेळा बँकेत जाऊन चौकशी केली असता, बँक व्यवस्थापकांनी ८१ हजार रूपयांची रक्कम कमी असल्याचे सांगितले. ही रक्कम मिळाल्याशिवाय बोनसची रक्कम बँक खात्यात जमा करता येणार नाही, असे सांगितले. ८१ हजार रूपये गेले कुठे, अशी विचारणा केली असता, पेसा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही. सर्व प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी बीडीओंकडे केली.