शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

खराब रस्त्यांमुळे पाच बसफेऱ्या बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:26 IST

दुर्गम भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्याचबरोबर काही पूल जीर्ण झाले असल्याने ते कधीही कोसळण्याचा धोका

प्रवाशांची गैरसोय : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : दुर्गम भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्याचबरोबर काही पूल जीर्ण झाले असल्याने ते कधीही कोसळण्याचा धोका असल्याने एसटी विभागाने जिल्ह्यातील पाच बसफेऱ्या बंद केल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील ५० टक्के बसेस ग्रामीण व दुर्गम भागातील प्रवाशांची वाहतूक करतात. जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यांची अनेक वर्ष दुरूस्तीच केली जात नाही. परिणामी डांबर व गिट्टी उखडून त्यावरून बस नेणे अशक्य होते. तर काही जिल्हा निर्मितीच्या पूर्वीचे आहेत. त्यांच्याही डागडुजीकडे दुर्लक्ष झाल्याने सदर पूल जीर्ण झाले आहेत. तर काही पुलांच्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम आटोपणे आवश्यक होते. मात्र पुलाचे काम झाले नसल्याने बस वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. खराब झालेले रस्ते, जीर्ण पूल तर काही ठिकाणी सुरू असलेले पुलाचे बांधकाम यामुळे लांब पल्ल्याच्या पाच बसफेऱ्या बंद झाल्या आहेत. यामध्ये सिरोंचा-झिंगानूर, सिरोंचा-पातागुडम, अंकिसा-आसरअल्ली, अहेरी-कालीनगर, जारावंडी-एटापल्ली या बसफेऱ्यांचा समावेश आहे. अंकिसा-आसरअल्ली मार्ग चांगला असला तरी या दोन गावांदरम्यान पुलाचे बांधकाम सुरू आहे. बाजूने मार्ग तयार करण्यात आला असला तरी तो पाहिजे तेवढा सक्षम नसल्याने सिरोंचावरून बस फक्त अंकिसापर्यंत नेली जाते. त्यानंतर सदर बस वापस येते. कालीनगर-अहेरी मार्गावरीवरून वसमतपूर गावाजवळचा पूल जीर्ण झाला आहे. जारावंडी-कसनसूरदरम्यानचा झुरी नाल्यावरील पूल जीर्ण झाला आहे. या पुलावरून वाहतूक करणे धोकादायक असल्याने याही मार्गावरची बस बंद करण्यात आली आहे. गडचिरोली व अहेरी आगाराच्या प्रत्येकी एक बस या मार्गाने सोडली जात होती. मात्र नाल्यावरील पूल जीर्ण झाला असल्याने दोन्ही बसेस आपापल्या मार्गाने काही दुरपर्यंतच येतात. सदर मार्गावरील अडथळे दूर करावे, अशी मागणी होत आहे.