शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

खराब रस्त्यांमुळे पाच बसफेऱ्या बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:26 IST

दुर्गम भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्याचबरोबर काही पूल जीर्ण झाले असल्याने ते कधीही कोसळण्याचा धोका

प्रवाशांची गैरसोय : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : दुर्गम भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्याचबरोबर काही पूल जीर्ण झाले असल्याने ते कधीही कोसळण्याचा धोका असल्याने एसटी विभागाने जिल्ह्यातील पाच बसफेऱ्या बंद केल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील ५० टक्के बसेस ग्रामीण व दुर्गम भागातील प्रवाशांची वाहतूक करतात. जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यांची अनेक वर्ष दुरूस्तीच केली जात नाही. परिणामी डांबर व गिट्टी उखडून त्यावरून बस नेणे अशक्य होते. तर काही जिल्हा निर्मितीच्या पूर्वीचे आहेत. त्यांच्याही डागडुजीकडे दुर्लक्ष झाल्याने सदर पूल जीर्ण झाले आहेत. तर काही पुलांच्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम आटोपणे आवश्यक होते. मात्र पुलाचे काम झाले नसल्याने बस वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. खराब झालेले रस्ते, जीर्ण पूल तर काही ठिकाणी सुरू असलेले पुलाचे बांधकाम यामुळे लांब पल्ल्याच्या पाच बसफेऱ्या बंद झाल्या आहेत. यामध्ये सिरोंचा-झिंगानूर, सिरोंचा-पातागुडम, अंकिसा-आसरअल्ली, अहेरी-कालीनगर, जारावंडी-एटापल्ली या बसफेऱ्यांचा समावेश आहे. अंकिसा-आसरअल्ली मार्ग चांगला असला तरी या दोन गावांदरम्यान पुलाचे बांधकाम सुरू आहे. बाजूने मार्ग तयार करण्यात आला असला तरी तो पाहिजे तेवढा सक्षम नसल्याने सिरोंचावरून बस फक्त अंकिसापर्यंत नेली जाते. त्यानंतर सदर बस वापस येते. कालीनगर-अहेरी मार्गावरीवरून वसमतपूर गावाजवळचा पूल जीर्ण झाला आहे. जारावंडी-कसनसूरदरम्यानचा झुरी नाल्यावरील पूल जीर्ण झाला आहे. या पुलावरून वाहतूक करणे धोकादायक असल्याने याही मार्गावरची बस बंद करण्यात आली आहे. गडचिरोली व अहेरी आगाराच्या प्रत्येकी एक बस या मार्गाने सोडली जात होती. मात्र नाल्यावरील पूल जीर्ण झाला असल्याने दोन्ही बसेस आपापल्या मार्गाने काही दुरपर्यंतच येतात. सदर मार्गावरील अडथळे दूर करावे, अशी मागणी होत आहे.