शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
Video - एक, दोन नव्हे तर चोरांची अख्खी गँगच; काही सेकंदात खिशातून लंपास केला फोन अन्...
5
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
6
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
7
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
8
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
9
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
10
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
11
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
12
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
13
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
14
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
15
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
16
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
17
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
18
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
19
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
20
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  

खराब रस्त्यांमुळे पाच बसफेऱ्या बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:26 IST

दुर्गम भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्याचबरोबर काही पूल जीर्ण झाले असल्याने ते कधीही कोसळण्याचा धोका

प्रवाशांची गैरसोय : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : दुर्गम भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्याचबरोबर काही पूल जीर्ण झाले असल्याने ते कधीही कोसळण्याचा धोका असल्याने एसटी विभागाने जिल्ह्यातील पाच बसफेऱ्या बंद केल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील ५० टक्के बसेस ग्रामीण व दुर्गम भागातील प्रवाशांची वाहतूक करतात. जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यांची अनेक वर्ष दुरूस्तीच केली जात नाही. परिणामी डांबर व गिट्टी उखडून त्यावरून बस नेणे अशक्य होते. तर काही जिल्हा निर्मितीच्या पूर्वीचे आहेत. त्यांच्याही डागडुजीकडे दुर्लक्ष झाल्याने सदर पूल जीर्ण झाले आहेत. तर काही पुलांच्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम आटोपणे आवश्यक होते. मात्र पुलाचे काम झाले नसल्याने बस वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. खराब झालेले रस्ते, जीर्ण पूल तर काही ठिकाणी सुरू असलेले पुलाचे बांधकाम यामुळे लांब पल्ल्याच्या पाच बसफेऱ्या बंद झाल्या आहेत. यामध्ये सिरोंचा-झिंगानूर, सिरोंचा-पातागुडम, अंकिसा-आसरअल्ली, अहेरी-कालीनगर, जारावंडी-एटापल्ली या बसफेऱ्यांचा समावेश आहे. अंकिसा-आसरअल्ली मार्ग चांगला असला तरी या दोन गावांदरम्यान पुलाचे बांधकाम सुरू आहे. बाजूने मार्ग तयार करण्यात आला असला तरी तो पाहिजे तेवढा सक्षम नसल्याने सिरोंचावरून बस फक्त अंकिसापर्यंत नेली जाते. त्यानंतर सदर बस वापस येते. कालीनगर-अहेरी मार्गावरीवरून वसमतपूर गावाजवळचा पूल जीर्ण झाला आहे. जारावंडी-कसनसूरदरम्यानचा झुरी नाल्यावरील पूल जीर्ण झाला आहे. या पुलावरून वाहतूक करणे धोकादायक असल्याने याही मार्गावरची बस बंद करण्यात आली आहे. गडचिरोली व अहेरी आगाराच्या प्रत्येकी एक बस या मार्गाने सोडली जात होती. मात्र नाल्यावरील पूल जीर्ण झाला असल्याने दोन्ही बसेस आपापल्या मार्गाने काही दुरपर्यंतच येतात. सदर मार्गावरील अडथळे दूर करावे, अशी मागणी होत आहे.