शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

तलावातील वाढत्या जलपर्णीने मासेमारी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 23:46 IST

चामोर्शी तालुक्यासह जिल्हाभरात नदी, नाले, तलाव, बोड्यांची संख्या मोठी आहे. तसेच मासेमारी व्यवसाय करणाऱ्या केवट-भोई-ढिवर समाज बांधवांची संख्या बºयापैकी आहे. या समाजबांधवांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन मासेमारी व्यवसाय आहे.

ठळक मुद्देचामोर्शी येथील तलाव । सिंचन विभागाचा कानाडोळा

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : चामोर्शी तालुक्यासह जिल्हाभरात नदी, नाले, तलाव, बोड्यांची संख्या मोठी आहे. तसेच मासेमारी व्यवसाय करणाऱ्या केवट-भोई-ढिवर समाज बांधवांची संख्या बºयापैकी आहे. या समाजबांधवांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन मासेमारी व्यवसाय आहे. मात्र चामोर्शी शहरासह तालुक्यातील बºयाच तलावांना जलपर्णी वनस्पतीने विळखा घातला आहे. परिणामी याचा परिणाम पाणी साठवणुकीसह मासेमारी व्यवसायावर होत आहे.स्थानिक प्रशासनामार्फत चामोर्शी शहरातील या गाव तलावाचा दरवर्षी लिलाव केला जातो. लिलावानंतर तलावाची मालकी प्राप्त झालेल्या मत्स्य सहकारी संस्था तसेच नागरिक पावसाळ्यात मत्स्यबीज टाकतात. साधारणता दिवाळी व मकरसंक्रांतीनंतर या मत्स्यबीजाची बºयापैकी वाढ होते. यंदाही चामोर्शीच्या गाव तलावात मासोळ्याचे प्रमाण चांगले आहे. मात्र या तलावाला जलपर्णी वनस्पतीने विळखा घातल्यामुळे मासेमार बांधवांना मासे पकडण्यासाठी तलावात योग्य प्रकारे जाळे टाकता येत नाही. त्यामुळे शहरातील मासेमार बांधव त्रस्त झाले आहेत.सध्या या तलावात संपूर्ण क्षेत्रात जलपर्णी वनस्पती वाढली असल्याने संपूर्ण तलाव हिरवेगार दिसून येत आहे. सिंचन विभागाने या तलावातील गाळाचा पूर्णता उपसा करून जलपर्णी वनस्पतीची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक आहे, अशी मागणीही शहरातील केवट-ढिवर व भोई समाज बांधवांकडून होत आहे. सदर तलावाचा उपयोग महिलांना कपडे धुण्यासाठी होत आहे. अनेक पशुपालक या तलावात आपले जनावरे नेऊन स्वच्छ करीत आहेत. गणपती, शारदा, दुर्गा उत्सवादरम्यान याच तलावात गणपती, शारदा, दुर्गा मूर्तीचे तसेच गौरीचे विसर्जन केले जाते. त्यामुळे या गाव तलावाला अनन्य साधारण महत्त्व आहे. प्रशासनाने चामोर्शी लगतच्या या गाव तलावातील गाळ उपसा करून जलपर्णी वनस्पतीची विल्हेवाट लावण्याची मागणी होत आहे.