शहरं
Join us  
Trending Stories
1
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
2
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
4
राहुल गांधींना वाचन करण्याचा आदेश कसा द्यायचा? सावरकरांवरील याचिका हायकोर्टाने फेटाळली
5
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
6
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
7
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
8
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं
9
४ दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराची जोरदार मुसंडी! हिरो मोटो ते सन फार्मा... 'या' शेअर्सने केलं मालामाल
10
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
11
बेडरुमचा दरवाजा वाजवला, आईला संशय आला; दार तोडताच रक्ताच्या थारोळ्यात दिसले पती-पत्नी
12
विकली जाणार ५४ वर्ष जुनी 'ही' कंपनी, तुम्ही नक्कीच नाव ऐकलं असणार; ४५ देशांत आहे ६,४८२ कोटींचा व्यवसाय 
13
सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल
14
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
15
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली 'प्रोजेक्ट' धर्मांतर सुरू होते, काम करणाऱ्या मुलींना पैसे दिले जात होते
16
डाएटिंग, व्यायाम... सर्व करुन दमलात पण वजन कमीच होईना; रोजच्या 'या' ६ सवयी जबाबदार
17
Ritual: स्त्रियांनी साष्टांग नमस्कार घालू नये असे म्हणतात; पण का? जाणून घ्या शास्त्रार्थ!
18
जुन्या घरात सापडला सांगाडा, नोकियाच्या फोनने असं उघड केलं १० वर्षांपूर्वी झालेल्या मृत्यूचं गुपित, पोलिसही अवाक्
19
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१५,११४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
20
Manglagauri 2025 Date: यंदा मंगळागौर कधी? ही घ्या तारखांची यादी, 'अशी' करा सुंदर तयारी लवकर..

अल्प पावसामुळे मत्स्यबीज धाेक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:44 IST

वैरागड : मच्छीपालन संस्थेने तलाव जिल्हा परिषदेकडून लीजवर घेऊन मत्स्यबीज टाकले, पण यंदा सरासरी इतका पाऊस न झाल्याने मत्स्यबीजाची ...

वैरागड : मच्छीपालन संस्थेने तलाव जिल्हा परिषदेकडून लीजवर घेऊन मत्स्यबीज टाकले, पण यंदा सरासरी इतका पाऊस न झाल्याने मत्स्यबीजाची अपेक्षित वाढ होण्याची शक्यता कमी आहे. तसेच धान पिकासाठी पाण्याचा उपसा झाल्यास तलाव, बाेड्यांमधील पाण्याची पातळी कमी हाेऊन मत्स्यबीज धाेक्यात येणार आहे.

मागील तीन-चार वर्षांपासून अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील मत्स्यपालन सहकारी संस्था आर्थिक डबघाईस आल्या आहेत. या वर्षात वैरागड संस्थेने सन २०२१ या वर्षात १ लाख ३० हजार रूपयांचे मत्स्यबीज पाण्यात टाकले. या वर्षात खरीप पिकासाठी आतापर्यंत तरी समाधानकारक पाऊस असला तरी सरासरी इतका पाऊस न झाल्याने तलाव बोड्यातील जलसाठा ५० टक्के पेक्षा अधिक नाही. आणि यानंतर पाऊस न झाल्यास तलाव, बोडयांना आईल इंजन व इतर साधने लावून शेतकरी आपल्या पिकांना पाणी देतात. तेव्हा मत्स्यबीज टाकलेल्या तलावातील पाण्याचा साठा फारच कमी होतो. परिणाम मत्स्यबीजाच्या वाढीवर होऊन संस्थांना आर्थिक फटका बसतो. सन २००६ च्या वनहक्क कायद्याअंतर्गत जिल्ह्यातील मत्स्यपालनाचे मोठे तलाव स्थानिक गावकऱ्यांच्या ताब्यात गेल्याने परंपरागत मासेमारी करणाऱ्या संस्था आधीच तोट्यात आहेत.

वैरागड मच्छीपालन सहकारी संस्थेअंतर्गत महादेव तलाव, आरकबोडी, माराईबोडी, अगड, गादबोडी, करपडा तलाव, पाटणवाडा, मेंढाटाकी, विहीरगाव हे तलाव हाेते. या ठिकाणी मासेमारी केली जात हाेती. परंतु वनहक्क कायद्याअंतर्गत विहीरगाव तलाव, आणि मेंढ्या टाकी या दोन तलावावर वनहक्क कायद्यांतर्गत स्थानिक लोकांनी अधिकार सांगितला आणि दोन्ही तलाव संस्थेच्या अधिकारातून वगळण्यात आले. २७ हेक्टर जमीन क्षेत्रात पसरलेल्या विहीरगाव तलावात बारमाही मासेमारी केली जात हाेती. वैरागड, विहीरगाव, मेंढा, पाटनवाडा येथील १७२ सदस्यांचा उदरनिर्वाह अवलंबून होता. संस्था आर्थिक नफ्यात होती. परंतु वन हक्क कायद्यामुळे विहीरगाव तलावाचे अधिकार गावकऱ्यांना देण्यात आले.

आश्वासन दिले मात्र मात्र मदतीचा पत्ता नाही

महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यपालन विभागाने मागील तीन वर्षांत अतिपावसाने या संस्थांचे मत्स्यबीज वाहून गेले त्या संस्थांना नुकसानभरपाई देण्याचे ठरविले होते. परंतु अद्यापही मागील तीन वर्षांतील संस्थांची नुकसानभरपाई शासनाकडून मिळाली नाही. संस्थांचे आर्थिक नुकसान झाले ते शासनाने तत्काळ द्यावे, अशी मागणी वैरागड मच्छीपालन सहकारी संस्थेचे अध्यक्ष रोहिदास दुमाने संस्थेचे सदस्य, सभासद व संस्थेचे सचिव गजानन धनकर यांनी केली आहे.

090921\img_20210523_130350.jpg

फोटो.. मच्छीपालन सहकारी संस्था वैरागड चे सभासद मच्छीमार करताना.