शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

मत्स्यपालन संस्थांची आर्थिक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 01:22 IST

गडचिरोली जिल्ह्यात लहान-मोठे असे १ हजार २०० तलाव असून १ हजार तलाव जिल्ह्यातील ९५ मत्स्यपालन संस्थांना लीजवर देण्यात येत होते. परंतु सामूहिक वनहक्क कायद्यामुळे गावातील वन समित्यांना तलावाचे स्वामित्त्व बहाल झाल्याने मत्स्यपालन संस्थांचे आर्थिक उत्पन्नाचे साधन नष्ट झाले.

ठळक मुद्देवनहक्क अडसर : जिल्ह्यातील १२ संस्थांवर ५६ लाखांचे कर्ज

प्रदीप बोडणे ।लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : गडचिरोली जिल्ह्यात लहान-मोठे असे १ हजार २०० तलाव असून १ हजार तलाव जिल्ह्यातील ९५ मत्स्यपालन संस्थांना लीजवर देण्यात येत होते. परंतु सामूहिक वनहक्क कायद्यामुळे गावातील वन समित्यांना तलावाचे स्वामित्त्व बहाल झाल्याने मत्स्यपालन संस्थांचे आर्थिक उत्पन्नाचे साधन नष्ट झाले. त्यामुळे जिल्ह्यातील मत्स्यपालन संस्थांची आर्थिक कोंडी झाली आहे.जिल्ह्यातील ज्या मत्स्यपालन सहकारी संस्था आर्थिक नफ्यात चालत आहेत. अशा संस्था अधिक चांगले सक्षमीकरण करण्यासाठी जिल्हा मत्स्यव्यवसाय संस्था गडचिरोली यांच्या अंतर्गत २००७-०८ या वर्षात राष्ट्रीय सहकार नियमने जिल्ह्यातील १२ संस्थांची निवड करून मत्स्यबीज, खत, खाद्य, मासे पकडण्याचे जाळे, नाव खरेदी करणे यासाठी ५६ लाखांचे कर्ज दिले होते. याच दरम्यान वनहक्क कायद्यामुळे संस्थांच्या मत्स्यपालनाचे अधिकार हिरावून घेतल्याने आणि मत्स्य व्यवसायासाठी बीज निकृष्ट पुरविल्याने संस्थांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड होऊ शकली नाही. १९६० च्या सहकार अधिसूचिनुसार जर संस्था अधिकृत पंजीबद्ध असतील तर त्या परीक्षेत्रात येणारे तलाव हे मत्स्य संस्थांना लीज तत्त्वावर दिले पाहिजे. कारण मत्स्यपालन सहकारी संस्था या शासनाच्या अटीशर्तीच्या अधिन राहून स्थापन झालेल्या असतात, असे संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. जिल्ह्यातील १ लाख नागरिकांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या मासेमारीचा हक्क हिरावून घेतल्याने मासेमार समाजबांधवावर उपासमारीचे संकट कोसळले आहे.वर्षानुवर्ष लीजवर तलाव घेऊन ढीवर समाजबांधव मासेमारी करीत होते. त्यातून शासनालाही उत्पन्न मिळत होते. परंतु वनहक्क कायद्याचा अडसर निर्माण झाल्याने सर्व तलावांचे हक्क वन समित्यांना देण्यात आले. गावातील समित्यासुद्धा मत्स्यपालन करू शकल्या नाही. त्यामुळे शासनाचा महसूलही बुडाला व मत्स्यसंस्था अडचणीत आल्या.- क्रिष्णा मंचलवार, अध्यक्ष, जिल्हा मत्स्यव्यवसाय विकास संस्था, गडचिरोली