शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गातील वनविभागाचा पहिला अडथळा दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 11:18 IST

देशातील सर्वाधिक मागास जिल्ह्यांमध्ये मोडणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याच्या मुख्यालयाला रेल्वेमार्गावर आणण्यातील वनविभागाचा एक प्राथमिक अडथळा दूर झाला आहे.

ठळक मुद्देएनटीसीएचे सर्व्हेक्षणमुख्य वनसंरक्षकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देशातील सर्वाधिक मागास जिल्ह्यांमध्ये मोडणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याच्या मुख्यालयाला रेल्वेमार्गावर आणण्यातील वनविभागाचा एक प्राथमिक अडथळा दूर झाला आहे. वनविभागाकडून घ्याव्या लागणाºया मंजुऱ्यांपैकी पहिल्या टप्प्याची मंजुरी केंद्र सरकारच्या वनखात्याने दिली आहे. पुढील मंजुरी देण्यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागणार असून त्यासाठी चंद्रपूरच्या मुख्य वनसंरक्षकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात रेल्वेच्याही अधिकाºयांचा समावेश आहे.वडसा (देसाईगंज) ते गडचिरोली या ५२ किलोमीटरच्या रेल्वेमार्गात ७१.७२२ हेक्टर जागा वनविभागाची येते. ही जागा सलग नसली तरी त्यात काही राखीव आणि काही संरक्षित वनाचा भाग येतो. त्या भागात वाघासह इतर वन्यजीवांचा वावर असतो. त्यामुळे या भागातून रेल्वेमार्ग गेल्यास वन्यजीवासाठी धोकादायक होईल म्हणून केंद्र सरकारच्या वन्यजीव विभागाने रेल्वेमार्गाच्या कामाची मंजुरी अडवून ठेवली होती. दरम्यान राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने (एनटीसीए) या कामाचे सर्व्हेक्षण केले. त्या सर्व्हेक्षणाच्या अहवालानुसार केंद्र सरकारच्या वनखात्याने मंजुरीच्या प्रक्रियेतील पहिल्या टप्प्याला संमती दिली आहे. आता दुसºया टप्प्याच्या संमतीसाठी समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या अहवालानुसार पुढील प्रक्रिया होणार आहे. या मार्गाचे काम मार्गी लागल्यानंतर भविष्यात गडचिरोलीवरून तेलंगणापर्यंत हा मार्ग वाढविला जाणार आहे.

४० अटींची करावी लागणार पूर्ततारेल्वेमार्गासाठी वनविभागाची ७१.७२२ हेक्टर जागा मिळवताना ४० प्रकारच्या अटींची पूर्तता करावी लागणार आहे. त्यात जेवढी जागा रेल्वेला दिली जाणार त्या जागेच्या मुल्यासह कापल्या जाणाºया वृक्षांच्या बदल्यात नवीन वृक्षलागवडीचा खर्च देणे, तसेच ज्या भागात वाघांचा अधिवास आहे त्या जागेत रेल्वेमार्गाची उंची किती असावी अशा अनेक बाबींचा अभ्यास मुख्य वनसंरक्षकांच्या अध्यक्षतेखालील समिती करेल. तो अहवाल सरकारला सादर केल्यानंतर अंतिम मंजुरीबाबतचा निर्णय होणार आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे