शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गातील वनविभागाचा पहिला अडथळा दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 11:18 IST

देशातील सर्वाधिक मागास जिल्ह्यांमध्ये मोडणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याच्या मुख्यालयाला रेल्वेमार्गावर आणण्यातील वनविभागाचा एक प्राथमिक अडथळा दूर झाला आहे.

ठळक मुद्देएनटीसीएचे सर्व्हेक्षणमुख्य वनसंरक्षकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देशातील सर्वाधिक मागास जिल्ह्यांमध्ये मोडणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याच्या मुख्यालयाला रेल्वेमार्गावर आणण्यातील वनविभागाचा एक प्राथमिक अडथळा दूर झाला आहे. वनविभागाकडून घ्याव्या लागणाºया मंजुऱ्यांपैकी पहिल्या टप्प्याची मंजुरी केंद्र सरकारच्या वनखात्याने दिली आहे. पुढील मंजुरी देण्यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागणार असून त्यासाठी चंद्रपूरच्या मुख्य वनसंरक्षकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात रेल्वेच्याही अधिकाºयांचा समावेश आहे.वडसा (देसाईगंज) ते गडचिरोली या ५२ किलोमीटरच्या रेल्वेमार्गात ७१.७२२ हेक्टर जागा वनविभागाची येते. ही जागा सलग नसली तरी त्यात काही राखीव आणि काही संरक्षित वनाचा भाग येतो. त्या भागात वाघासह इतर वन्यजीवांचा वावर असतो. त्यामुळे या भागातून रेल्वेमार्ग गेल्यास वन्यजीवासाठी धोकादायक होईल म्हणून केंद्र सरकारच्या वन्यजीव विभागाने रेल्वेमार्गाच्या कामाची मंजुरी अडवून ठेवली होती. दरम्यान राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने (एनटीसीए) या कामाचे सर्व्हेक्षण केले. त्या सर्व्हेक्षणाच्या अहवालानुसार केंद्र सरकारच्या वनखात्याने मंजुरीच्या प्रक्रियेतील पहिल्या टप्प्याला संमती दिली आहे. आता दुसºया टप्प्याच्या संमतीसाठी समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या अहवालानुसार पुढील प्रक्रिया होणार आहे. या मार्गाचे काम मार्गी लागल्यानंतर भविष्यात गडचिरोलीवरून तेलंगणापर्यंत हा मार्ग वाढविला जाणार आहे.

४० अटींची करावी लागणार पूर्ततारेल्वेमार्गासाठी वनविभागाची ७१.७२२ हेक्टर जागा मिळवताना ४० प्रकारच्या अटींची पूर्तता करावी लागणार आहे. त्यात जेवढी जागा रेल्वेला दिली जाणार त्या जागेच्या मुल्यासह कापल्या जाणाºया वृक्षांच्या बदल्यात नवीन वृक्षलागवडीचा खर्च देणे, तसेच ज्या भागात वाघांचा अधिवास आहे त्या जागेत रेल्वेमार्गाची उंची किती असावी अशा अनेक बाबींचा अभ्यास मुख्य वनसंरक्षकांच्या अध्यक्षतेखालील समिती करेल. तो अहवाल सरकारला सादर केल्यानंतर अंतिम मंजुरीबाबतचा निर्णय होणार आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे