शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
3
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
4
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
5
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
6
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
9
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
10
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
11
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
12
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
13
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
14
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
15
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
16
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
17
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
18
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
19
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
20
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 

सर्व सरपंचांची आरक्षण सोडत पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 06:00 IST

विशेष म्हणजे मतदानाची तारीख दि.२९ वरून ३१ मार्च करण्यात आली. यासोबतच नामांकन दाखल करण्याची मुदतही वाढवून देऊन ती दि.१३ वरून १६ मार्च केली आहे. त्यामुळे नामांकन दाखल करण्यासाठी प्रत्यक्षात दोन दिवस अतिरिक्त मिळणार आहेत. चामोर्शी, एटापल्ली, मुलचेरा, अहेरी, आरमोरी या पाच तालुक्यांमधील सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली.

ठळक मुद्देनामांकनासाठी १६ पर्यंत मुदतवाढ : जात वैधता प्रमाणपत्राची अट शिथिल केल्याने इच्छुक उमेदवारांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील २९१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी आणि गुरूवारी ग्रामपंचायतनिहाय सरपंचांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. दरम्यान ज्या जात वैधता प्रमाणपत्राच्या अटीमुळे मोठा पेच निर्माण झाला होता त्या अटीत शिथिलता देत निवडणूक आयोगाने गुरूवारी (दि.१२) नवीन आदेश काढला. त्यानुसार जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना एक वर्षाची मुदत दिली आहे.विशेष म्हणजे मतदानाची तारीख दि.२९ वरून ३१ मार्च करण्यात आली. यासोबतच नामांकन दाखल करण्याची मुदतही वाढवून देऊन ती दि.१३ वरून १६ मार्च केली आहे. त्यामुळे नामांकन दाखल करण्यासाठी प्रत्यक्षात दोन दिवस अतिरिक्त मिळणार आहेत.चामोर्शी, एटापल्ली, मुलचेरा, अहेरी, आरमोरी या पाच तालुक्यांमधील सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. त्यामुळे तहसील कार्यालयाच्या परिसरात उमेदवार व गावातील नागरिकांनी उत्सुकतेपोटी चांगलीच गर्दी केली होती. आता पुढील ३ दिवस नामांकन प्रक्रियेला वेग येणार आहे.शेकडो नामांकन दाखलग्राम पंचायत निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या कामाला बुधवारपासून गती आली आहे. जिल्हाभरात तालुकास्थळी गुरूवारपर्यंत शेकडो नामांकन दाखल करण्यात आले. गडचिरोली तालुक्यात गुरूवारपर्यंत एकूण ७७ नामांकन आले. सिरोंचा तालुक्यात १०६, आरमोरी तालुक्यात ५२, कोरची तालुक्यात ५१, कुरखेडा तालुक्यात २०६, धानोरा तालुक्यात ८५, एटापल्ली तालुक्यात ११२ नामांकन दाखल झाले आहेत.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच