शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आष्टीत पाळला कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 22:13 IST

आष्टीला तालुका घोषित करावा व आष्टीतील पेपरमिल सुरू करावी, या मागणीसाठी सोमवारी आष्टी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आला.

ठळक मुद्देतालुक्याचा दर्जा देण्याची मागणी : सर्वपक्षीय नेते व नागरिकांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : आष्टीला तालुका घोषित करावा व आष्टीतील पेपरमिल सुरू करावी, या मागणीसाठी सोमवारी आष्टी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आला.माजी जिल्हा परिषद सदस्य धर्मराव प्रकाश कुकुडकर, राकेश बेलसरे यांच्या नेतृत्वात सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, दुकाने, चहाटपरी, पानठेले, शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यात आली.चामोर्शी या तालुका स्थळापासून आष्टीचे अंतर जवळपास ३० किमी आहे. आष्टीच्याही पलिकडे काही गावे येतात. या गावांना चामोर्शी हे तालुकास्थळ जवळपास ५० किमी पडते. एवढ्या दूर अंतरावरून जाऊन तालुकास्थळी कामे करणे शक्य होत नाही. परिणामी अनेक नागरिक या योजनांपासून वंचित राहतात. ही बाब लक्षात घेऊन आष्टीला तालुकास्थळाचा दर्जा द्यावा, अशी मागील २० वर्षांपासून मागणी आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व इतर नागरिकांनीही शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. तालुक्याच्या दृष्टीने सर्वसोयीसुविधा आष्टी येथे आहेत. आष्टीला तालुकास्थळाचा दर्जा दिल्यास परिसरातील जनतेला चामोर्शी येथे जाण्याचे कष्ट करावे लागणार नाही.परिसरातील अनेक ग्रामपंचायतींनी आष्टीला तालुक्याचा दर्जा द्यावा, असा ठराव घेतला आहे. मात्र या सर्व पाठपुराव्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. २६ जानेवारी रोजी आष्टीला तालुका घोषित करावा, या मुख्य मागणीसाठी बंद पाळण्यात आला. सर्वपक्षिय नेत्यांनी एकत्र येत बंदला पाठींबा दर्शविला. तसेच समाजातील इतर व्यक्तींनीही बंदला प्रतिसाद दिल्याने कडकडीत बंद पाळण्यात आला. बंद यशस्वी करण्यात आष्टीच्या सरपंच वर्षा देशमुख, हंसप्रित राऊत, ग्रा.पं. सदस्य सत्यशील डोर्लीकर, कपिल पाल, विठ्ठल आवारी, संतोष बारापात्रे, अतुल तांगडे, तंमुस अध्यक्ष रोहन रायपुरे, छोटू दुर्गे व गावकऱ्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.