शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण

By admin | Updated: December 15, 2014 22:57 IST

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना १ आॅगस्ट २०१३ पासून शासनाने सुधारित वेतन श्रेणी लागू केली आहे. मात्र या वेतन श्रेणीप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन दिले जात नसून त्यांचे

गडचिरोली : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना १ आॅगस्ट २०१३ पासून शासनाने सुधारित वेतन श्रेणी लागू केली आहे. मात्र या वेतन श्रेणीप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन दिले जात नसून त्यांचे आर्थिक शोषण केले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनतर्फे करण्यात आला आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना केवळ १ हजार ३०० ते १ हजार ५०० रूपये अनुदान दिले जात होते. वाढत्या महागाईमध्ये एवढ्या कमी अनुदानात कुटुंबाचा प्रपंच भागविणे कठीण असल्याने अनुदानात वाढ करावी, अशी मागणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून शासनाकडे लावून धरली. त्यानुसार शासनाने १ आॅगस्ट २०१३ पासून सुधारित वेतनश्रेणी लागू केली. यानुसार किमान वेतन ५ हजार १०० ते ७ हजार १०० रूपये व राहणीमान भत्ता म्हणून १ हजार १०० रूपये लागू करण्यात आला. याचा आर्थिक भार ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेवर पडू नये, यासाठी शासनाकडून अनुदानही दिले जाते. सदर अनुदान जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषदेने काही निधी पंचायत समितीकडे वळता केला आहे. मात्र जिल्ह्यातील काही पंचायत समित्यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन दिले नाही. त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. यासाठी जबाबदार असलेल्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करावी, तसेच अनुदानाची रक्कम ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तत्काळ वाटप करण्यात यावी, अशी मागणी राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे राज्यसचिव विलास कुमरवार यांनी केली आहे.