शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

स्वच्छतेचं कंत्राट ठरलं एसटीसाठी पांढरा हत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 22:27 IST

आवश्यकतेपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची नेमणूक

- दिगांबर जवादेगडचिरोली : बसस्थानक आणि एसटी बसगाड्यांची स्वच्छता करण्यासाठी महामंडळाने ऑक्टोबर २०१७ मध्ये एका खासगी कंपनीला कंत्राट दिले. यामध्ये आवश्यकतेपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. त्यामुळे स्वच्छतेवरील खर्च वाढला. हा खर्च एसटी महामंडळाच्या आवाक्याबाहेर झाल्याने एसटीने कंपनीला पैसे देणे बंद केले आहे. परिणामी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे वेतन तीन महिन्यांपासून थकीत असल्याने राज्यातील बहुतांश बस स्थानकांमधील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे बसस्थानकांमध्ये कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.बसस्थानक, आगाराची स्वच्छता करणे, बसगाड्या धुणे या कामांसाठी पूर्वी एसटी महामंडळाने स्वच्छता कर्मचाºयांची नेमणूक केली होती. हे कर्मचारी मोजकेच होते. पण एसटीच्या केंद्रीय कार्यालयाने २०१७ मध्ये स्वच्छतेचे कंत्राट काढले. २ ऑक्टोबर २०१७ पासून स्वच्छतेचे कंत्राट एका खासगी कंपनीला देण्यात आले. राज्यभरातील बसस्थानकांच्या स्वच्छतेचे कंत्राट एकाच कंपनीला मिळाले आहे. विशेष म्हणजे स्वच्छता कंत्राटात अधिक कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे स्वच्छतेचा कंत्राटही महागला.मागील वर्षभरापासून एसटीची आर्थिक स्थिती खालावत चालली आहे. डिझेल व कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठीही एसटीकडे पुरेसे पैसे नाहीत. उधारी घेऊन काम भागविले जात आहे. अशा स्थितीत बऱ्याचशा आगारांनी कंपनीला पैसे दिले नाहीत. त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून स्वच्छता कर्मचाऱ्यांना कंपनीने वेतन दिले नाही.यावर तोडगा काढण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी २६ जानेवारीपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे आगार, बसस्थानक व एसटीच्या इतर कार्यालयांमध्ये कचºयाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.काही आगारांमध्ये जुन्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून एसटी गाड्यांची साफसफाई करून काम भागविले जात आहे. सदर कंपनीचे कंत्राट ऑक्टोबर २०२० पर्यंत आहे. मात्र एसटीचे  केंद्रीय कार्यालय यावर कोणता तोडगा काढते याकडे राज्यभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

६ कर्मचाऱ्यांच्या कामासाठी जुंपले ३० कर्मचारीगडचिरोली बसस्थानकात पूर्वी सहा स्वच्छता कर्मचारी होते. नवीन कंत्राटानुसार ३० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. कर्मचारी वाढल्याने एसटीचा खर्चसुद्धा वाढला. ऑगस्ट २०१९ पर्यंत एसटीच्या केंद्रीय कार्यालयामार्फत संबंधित कंपनीला पैसे दिले जात होते. त्यातून कर्मचाऱ्यांचे वेतन दिले जात होते. मात्र ऑगस्टनंतर केंद्रीय कार्यालयाने कंपनीला पैसे देण्याची जबाबदारी स्थानिक बसस्थानकावर सोपविली.