शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

अखेर चिंतलपेठ येथे शौचालय बांधकामाला मंजुरी

By admin | Updated: June 28, 2015 02:07 IST

तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावरील चिंतलपेठ गावात २२ जून रोजी सोमवारी शौचालयाच्या खड्ड्यात पडून नयन प्रविण दुर्गे या चार वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू झाला.

पंचायत समिती प्रशासन लागले कामाला : ई-मस्टर काढण्याचे काम युध्दपातळीवर अहेरी : तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावरील चिंतलपेठ गावात २२ जून रोजी सोमवारी शौचालयाच्या खड्ड्यात पडून नयन प्रविण दुर्गे या चार वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू झाला. दरम्यान गावातील नागरिकांनी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. त्यानंतर पंचायत समिती प्रशासनाने गतीने हालचाली वाढवून २४ जूनला बुधवारी चिंतलपेठ येथील शौचालयाला मनरेगा योजनेंतर्गत मंजुरी प्रदान केली आहे. पंचायत समितीतील अधिकाऱ्यांच्या समुपदेशनामुळे बांधकाम झाल्यानंतर शासनाच्या योजनेतून शौचालय बांधकामाला अनुदान मिळेल, या आशेवर चिंतलपेठ गावातील तब्बल ८२ कुटुंबांनी शौचालय बांधकामासाठी खड्ड्याचे खोदकाम सुरू केले. खोदकाम पूर्ण झाल्यानंतरही शासनाकडून पहिल्या टप्प्यातील अनुदान नागरिकांना मिळाले नाही. दरम्यान शासनाच्या शौचालय बांधकामासंदर्भातील स्वच्छ भारत अभियानांतर्गत निर्मल भारत व मनरेगा या दोन योजना वेगळ्या झाल्या. त्यामुळे शौचालय बांधकामासाठी खोदलेले खड्डे अनुदानाअभावी तसेच कायम राहिले. त्यामुळे चिंतलपेठ गावात चार वर्षीय बालकाचा खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर पंचायत समिती प्रशासन शौचालय योजनेच्या कामाला लागले. शौचालय बांधकामाला प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर ई-मस्टर काढण्याचे काम पं.स. मार्फत युध्दपातळीवर सुरू आहे. येत्या आठ दिवसात शौचालय बांधकामाकरिता लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यातील अनुदानाची रक्कम अग्रीम म्हणून देण्यात येणार असल्याचे आश्वासन अहेरी पंचायती समितीचे संवर्ग विकास अधिकारी बादलशहा मडावी यांनी ग्रामस्थांना दिले आहे. (प्रतिनिधी)अधिकाऱ्यांच्या समुपदेशनाने नयनचा घातअहेरी पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने चिंतलपेठ या गावात नरेगा अंतर्गत शौचालय बांधकाम मंजूर केले नाही. दरम्यान पं.स.च्या काही अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तोंडी सूचनेनुसार चिंतलपेठ गावात हागणदारी मुक्तीची संकल्पना मांडली व गावकऱ्यांना शौचालय बांधकामासाठी प्रवृत्त केले. त्यानुसार या गावात शौचालय बांधकामासाठी तब्बल ८२ खड्डे खोदण्यात आले. पाऊस झाल्यानंतर शौचालयाच्या खड्ड्यात पाणी साचले. दरम्यान शौचालयाच्या खड्ड्यात पडून नयन दुर्गे या बालकाचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी घाईने केलेल्या समुपदेशनाने नयनचा घात झाला, अशी भावना गावकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.