शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

 अखेर ४३ दिवसानंतर मिळाले ११ काेटी; तेलंगणाच्या बॅरेजमध्ये गेली आहे जमीन 

By दिगांबर जवादे | Updated: June 7, 2023 18:34 IST

राज्य सरकारने यासाठी ११ काेटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर बुधवारी आंदाेलन मागे घेण्यात आले.

गडचिराेली : तेलंगणा सरकारच्या वतीने सिराेंचा तालुक्यातील गाेदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या मेडीगड्डा बॅरेजमध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी माेबदला मिळावा, यासाठी सिराेंचा तहसील कार्याालयासमाेर साखळी उपाेषण सुरू केले हाेते. ४३ दिवसांपासून आंदाेलन सुरूच हाेते. राज्य सरकारने यासाठी ११ काेटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर बुधवारी आंदाेलन मागे घेण्यात आले.

 तेलंगणा सरकाने गाेदावरी नदीवर पाच वर्षांपूर्वी बॅरेज बांधले आहे. या बॅरेजमध्ये सिराेंचा तालुक्यातील काही १२ गावांमधील शेतकऱ्यांची १२८ हेक्टर जमीन गेली आहे. मात्र याचा माेबदला देण्यात आला नाही. तेलंगणा सरकार जर नुकसान देणार नसेल तर महाराष्ट्र शासन याचा माेबदला देईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिले हाेते. मात्र अनेक दिवस हाेऊनही माेबदला मिळाला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांनी एप्रिल महिन्यापासून आंदाेलन सुरू केले हाेते. पैसे देण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे, असे सांगीतले जात हाेते.

 मात्र जाेपर्यंत माेबदला मिळत नाही. ताेपर्यंत आंदाेलन सुरूच ठेवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला हाेता. या आंदाेलनाची दखल घेत शेतकऱ्यांंना पहिल्या टप्प्यात ११ काेटी रूपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. उर्वरित २६ काेटी रूपये लवकरच दिले जाणार आहेत. माजी मंत्री तथा भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांनी सिराेंचा येथे जाऊन आंदाेलकांना लिंबू पाणी पाजले. त्यानंतर आंदाेलन मागे घेण्यात आले. शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या इतरही अडचणी जाणून घेतल्या, त्या साेडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन शाेभाताई फडणवीस यांनी दिले.

 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली