शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
3
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
4
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
5
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
6
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
7
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
8
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
9
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
10
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
11
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
12
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
13
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
14
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
15
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
16
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
17
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
18
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
19
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
20
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO

सूक्ष्म सिंचन व्यवस्थेवर भर देणार

By admin | Updated: November 24, 2014 22:56 IST

गडचिरोली जिल्ह्यातील ८९ टक्के जनता शेती व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे सुक्ष्म सिंचन, माजी मालगुजारी तलाव, शिरपूर व कोल्हापुरी पध्दतीचे बंधारे, पंपाचे ऊर्जितीकरण व सौरउर्जेवरील

आढावा बैठक : मुख्यमंत्र्यांची घोषणागडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील ८९ टक्के जनता शेती व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे सुक्ष्म सिंचन, माजी मालगुजारी तलाव, शिरपूर व कोल्हापुरी पध्दतीचे बंधारे, पंपाचे ऊर्जितीकरण व सौरउर्जेवरील पाच हॉर्सपॉवरचे पंप शेती सिंचनासाठी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, मुख्यमंत्र्यांचे प्रधानसचिव प्रविण परदेशी, खासदार अशोक नेते, आमदार मितेश भांगडिया, देवराव होळी, अम्ब्रीशराव महाराज, क्रिष्णा गजबे, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी रणजितकुमार, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक रविंद्र कदम, गडचिरोली जिल्ह्याचे मुख्यवनसंरक्षक टी. एस. के. रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील आदी उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यात एकूण जंगल क्षेत्रापैकी एक चतुर्थांश जंगल गडचिरोली जिल्ह्यात आहे. त्यामुळे पर्यावरण संतुलन राखण्यास मोठी मदत झाली आहे. या जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी राज्य सरकारचा विकासाचा फोकस हा गडचिरोलीवर केंद्रीत राहिल. जनता व प्रशासन यांच्या समन्वय साधला जाऊन चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी शासन निश्चितपणे उभे राहिल. एवढेच नव्हे तर अधिकाऱ्यांसोबत संबंधीतांवर जबाबदारी निश्चित केली जाईल. शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासनाला दर्जेदार कामाची अपेक्षा आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत स्पष्ट केले. जिल्ह्यात वनविभागामार्फत सध्या अगरबत्ती प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी व्हियतनामवरून काड्या आयात कराव्या लागत आहे. त्याची निर्मिती गडचिरोली जिल्ह्यातच कशी करता येईल, यादृष्टीने वनविभागाने प्रयत्न ठेवावे व या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्ह्यात रिक्त पदांचा आढावा घेऊन पदभरती संदर्भात शासन लवकरच निर्णय घेईल, असेही मुुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. महाराष्ट्र सरकार अतिदुर्गम मागास, विकासापासून दूर असलेल्या समाज घटकांना विकासाच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी सर्वांनी दक्षपणे काम करावे, असेही ते म्हणाले. (स्थानिक प्रतिनिधी)