शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेवर भर द्या

By admin | Updated: November 6, 2014 22:54 IST

सार्वजनिक स्वच्छतेवर भर देण्यासाठी प्रशासनाच्या सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे, तसेच गडचिरोली जिल्ह्यातील गावांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा,

आढावा बैठक : राज्यपालांचे निर्देशगडचिरोली : सार्वजनिक स्वच्छतेवर भर देण्यासाठी प्रशासनाच्या सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे, तसेच गडचिरोली जिल्ह्यातील गावांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा, अशा सूचना राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या.गडचिरोली येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक त्यांनी घेतली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला राज्यपालांचे प्रधान सचिव उमेशचंद्र रस्तोगी, विभागीय आयुक्त अनुपकुमार, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम, जिल्हाधिकारी रणजीतकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता आदींसह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी जिल्ह्यातील विकास कामांची माहिती राज्यपालांना दिली. जिल्ह्यात दरडोई उत्पन्न वाढावे यासाठी प्रशासनाने अनेक उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये टॅक्सी वाटप, अगरबत्ती प्रकल्प, कौशल्यावर आधारित रोजगार, हस्तकला प्रशिक्षण या उपक्रमांचा समावेश असल्याचे ते म्हणाले.वनहक्क दाव्यात जिल्हा राज्यात पहिला असून आतापर्यंत ३० हजार ४८८ वैयक्तिक दावे निकाली काढण्यात आले, अशी माहितीही राज्यपालांना देण्यात आली. तसेच ७५० महिलांना घरबसल्या रोजगार अगरबत्ती प्रकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे, अशी माहिती यावेळी राज्यपालांना देण्यात आली. राज्यपालांनी कृषी सिंचनावर भर द्या, अशी सूचना करून जिल्ह्यातील प्रलंबित सिंचनाची प्रकल्पाची माहिती जाणून घेतली. बैठकीचे संचालन निवासी उपजिल्हाधिकारी राम जोशी यांनी केले.