शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 05:00 IST

पाथरगोटा येथील शेतकऱी बाजीराव बगमारे हे २ जून राेजी शेतात काम करीत असताना त्यांना विजेचा धक्का लागला व यात त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, त्याच्यात शेतातील अधिकृत विद्युत खांबावरून एका शेजारी शेतकऱ्याने आपल्या शेतात अनधिकृतपणे मोटार पंपला कनेक्शन जाेडले आहे. शेजारील शेतकऱ्याने मोटारपंप कनेक्शनकरिता डिमांड भरले होते; परंतु कनेक्शन अद्यापही मिळाले नाही.

ठळक मुद्देनागरिकांचा महावितरणवर राेष मागणी : पाथरगाेटातील शेतकरी मृत्यू प्रकरण

लाेकमत न्यूज नेटवर्कजोगीसाखरा : आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा येथील शेतकऱ्याचा विद्युत धक्क्याने शेतातच मृत्यू झाल्याप्रकरणी योग्य चौकशी करून महावितरण कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पाथरगाेटा येथील नागरिकांनी केली आहे.पाथरगोटा येथील शेतकऱी बाजीराव बगमारे हे २ जून राेजी शेतात काम करीत असताना त्यांना विजेचा धक्का लागला व यात त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, त्याच्यात शेतातील अधिकृत विद्युत खांबावरून एका शेजारी शेतकऱ्याने आपल्या शेतात अनधिकृतपणे मोटार पंपला कनेक्शन जाेडले आहे. शेजारील शेतकऱ्याने मोटारपंप कनेक्शनकरिता डिमांड भरले होते; परंतु कनेक्शन अद्यापही मिळाले नाही. त्यामुळे सबंधित लाईनमनने खांबावर चढून तारांवर बांधणी करून ठेवली होती. शेतात काम करीत असताना शेतकऱ्याला विजेचा धक्का लागला व यातच त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर सदर कनेक्शन कमी करण्यासाठी विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना संपूर्ण तालुक्यातील लाईट घटनेच्या रात्री बारा वाजता बंद करावे लागले होते, हे विशेष. दरवर्षी कुठे ना कुठे अशा प्रकारच्या घटना घडतात. परंतु कारण शाेधले जात नाही. पाथरगाेटा येथील शेतकरी मृत्यू प्रकरणाचा सखोल तपास करून जबाबदार असलेल्या महावितरण कंपनीवर तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मृतकाच्या परिवाराला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी कली आहे.

कनेक्शन मिळण्यास दिरंगाई; वीजचाेरी वाढलीमहावितरण कंपनीच्या एका लाईनमनने पाथरगाेटा येथील मृत शेतकऱ्यांच्या अधिकृत खांबावरून थेट वायरची जाेडणी दुसऱ्याच्या शेतात केली हाेती. याद्वारे दुसरा शेतकरी पीक काढत हाेता. महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना कृषिपंप जाेडणी देण्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे अनेक शेतकरी पीक वाचविण्यासाठी चाेरीची वीज वापरतात. यातूनच विजेसंदर्भात अपघात घडतात. कनेक्शन मिळण्यास दिरंगाई हाेत असल्याने अनेक शेतकरी चाेरीची वीज वापरतात.

महावितरण कंपनीचे कोणतेही कर्मचारी शेतकऱ्यांना विद्युत मोटारपंपाकरिता वीज खांबावरून अवैधरित्या वीज कनेक्शन जोडून देत नाही. पाथरगाेटा येथील प्रकरण नेमके काय आहे, याबाबतची सविस्तर चौकशी करून कार्यवाही केली जाईल. - ए. बी.बोरकर, शाखा अभियंता महावितरण, आरमोरी

 

टॅग्स :electricityवीज