शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

विदर्भ राज्यासाठी संघर्ष करा

By admin | Updated: June 12, 2014 00:06 IST

विदर्भ राज्य झाल्याशिवाय विकासाची कल्पना करणे अशक्य आहे. त्यामुळे विदर्भ राज्य निर्मितीसाठी संघर्ष केला पाहिजे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे पदाधिकारी राम नेवले यांनी केले.

एल्गार : राम नेवले यांचे प्रतिपादनगडचिरोली : विदर्भ राज्य झाल्याशिवाय विकासाची कल्पना करणे अशक्य आहे. त्यामुळे विदर्भ राज्य निर्मितीसाठी संघर्ष केला पाहिजे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे पदाधिकारी राम नेवले यांनी केले.स्थानिक शिवाजी महाविद्यालयात विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हा शाखा गडचिरोलीच्यावतीने सभा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी नामदेवराव गडपल्लीवार तर प्रमुख अतिथी म्हणून समितीचे मुख्य निमंत्रक दीपक निलावार, अरूण केदार, अरूण मुनघाटे, अ‍ॅड. संजय ठाकरे, डॉ. रमेश गजबे, रमेश भुरसे, पांडूरंग भांडेकर, समय्या पसूला, प्राचार्य खुशाल वाघरे, राजेंद्रसिंग ठाकूर, रोहिदास राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे मार्गदर्शन करतांना नेवले म्हणाले की, विधानसभा निवडणुकीपूर्वी विदर्भ राज्याची मागणी पूर्ण होऊ शकते, त्यासाठी संघटनात्मक बांधणी करून तीव्र आंदोलन छेडण्याची गरज आहे. विदर्भवासियांनी संघटीत होऊन वेगळ्या विदर्भाची मागणी केली पाहिजे. विदर्भ राज्य झाल्याशिवाय विदर्भाचा विकास होणे शक्य नाही. विदर्भातील साधनसंपत्ती लुटून पश्चिम महाराष्ट्राचा विकास केला जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील बाराही तालुक्यामध्ये संघटनात्मक बांधणी करायची असून जिल्ह्यातील दोघा जणांचा कोर कमिटीमध्ये समावेश राहणार आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नागपूर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर दिल्लीतील जंतरमंतरवर धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन निमंत्रक अरूण मुनघाटे यांनी केले. आभार रमेश भुरसे यांनी मानले. यशस्वीतेसाठी विदर्भ राज्य आंदोलन शाखा गडचिरोलीच्या सदस्यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)