शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
Sachin Tendulkar, IND vs ENG: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
4
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
5
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
6
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
7
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
8
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
9
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
10
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
11
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
12
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
13
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
14
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
15
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
16
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
17
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
18
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
19
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
20
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...

ग्रामसभांना खनिज संपत्तीचे अधिकार मिळण्यासाठी संघर्ष करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 23:58 IST

पेसा कायद्याने आदिवासींना जल, जंगल, जमिनीचे अधिकार दिले आहेत. मात्र खनिज संपत्तीचे अधिकार प्रधान केले नाहीत. आदिवासी पट्यात सर्वाधिक खनिज संपत्ती आहे. खनिज संपत्तीचे अधिकार मिळविण्यासाठी प्रयत्न करावा असे प्रतिपादन आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय मानकर यांनी केले.

ठळक मुद्देविजय मानकर यांचे आवाहन : गडचिरोली येथे मूलनिवासी-आदिवासी संमेलन, आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियातर्फे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पेसा कायद्याने आदिवासींना जल, जंगल, जमिनीचे अधिकार दिले आहेत. मात्र खनिज संपत्तीचे अधिकार प्रधान केले नाहीत. आदिवासी पट्यात सर्वाधिक खनिज संपत्ती आहे. खनिज संपत्तीचे अधिकार मिळविण्यासाठी प्रयत्न करावा असे प्रतिपादन आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय मानकर यांनी केले.गडचिरोली येथे जिल्हा स्तरीय मुलनिवासी-आदिवासी,ओबीसी व डीटीएनटी महासंमेलनाचे आयोजन रविवारी करण्यात आले. याप्रसंगी विजय मानकर मार्गदर्शन करीत होते. माजी आमदार हिरामन वरखडे, जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. लालसू नागोटी, अनिल केरामी, प्रदेशाध्यक्ष राजेश वालदे, एपीआयचे जिल्हाध्यक्ष राजू वाघमारे, सचिव विजय कृपाकर, कोषाध्यक्ष मोनाली लांजेवार, गंगाराम आतला, सुखदेव गावळे, अर्जूनसिंग ठाकूर, भगवान नन्नावरे, डॉ. दिवाकर उराडे, नंदकिशोर रंगारी, रूपेश निमसरकार, सुरेश गावळे, , बालाजी बावणे, शेषराज गावळे, श्रीकांत नैताम, आकाश आंबोरकर, प्रा. संजय पिठाले आदी मान्यवर उपस्थित होते.पूढे मार्गदर्शन करताना विजय मानकर म्हणाले ज्या भागात आदिवासी राहतात त्या भागात देशातील एकूण खनिज संपत्तीच्या सुमारे ७० टक्के खनिज संपत्ती आहे. या खनिज संपत्तीवर उद्योजकांचा नेहमीच डोळा राहला आहे. ही खनिज संपत्ती खणन करण्यासाठी ग्रामसभेची परवानगी आवश्यक करावी. तसेच कंपनीच्या नफ्यात ग्रामसभेचा वाटा असावा. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागास प्रवर्गासाठी देशाच्या अंदाजपत्रकात स्वतंत्र तरतुद असावी यासाठी लढा देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे आवश्यक आहे. यासाठी शासनाला बाध्य करण्यासाठी लढा उभारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केले.प्रास्ताविक एपीआयचे जिल्हाध्यक्ष राजू वाघमारे, संचालन प्रवृत्ती वाळके तर आभार रूपेश निमसरकार यांनी मानले. यशस्वतेसाठी राहूल वैरागडे, सुशील मेश्राम, कवडू दुधे, अरविंद वानखेडे, दिलीप बांबोळे, अतुल मांदाडे, सुरज तावाडे, जितू डोंगरे, मनोज बारसिंगे, दुर्याेधन रायपूरे, तुषार हेटकर, अक्षय मडावी, अरविंद गजभीये, विनोद आतला, सुरज कोवे, धनंजय सहदेवकर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला ग्रामसभा व आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाचे जिल्हाभरातील कार्यकर्ते उपस्थित होते.