शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसभांना खनिज संपत्तीचे अधिकार मिळण्यासाठी संघर्ष करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 23:58 IST

पेसा कायद्याने आदिवासींना जल, जंगल, जमिनीचे अधिकार दिले आहेत. मात्र खनिज संपत्तीचे अधिकार प्रधान केले नाहीत. आदिवासी पट्यात सर्वाधिक खनिज संपत्ती आहे. खनिज संपत्तीचे अधिकार मिळविण्यासाठी प्रयत्न करावा असे प्रतिपादन आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय मानकर यांनी केले.

ठळक मुद्देविजय मानकर यांचे आवाहन : गडचिरोली येथे मूलनिवासी-आदिवासी संमेलन, आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियातर्फे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पेसा कायद्याने आदिवासींना जल, जंगल, जमिनीचे अधिकार दिले आहेत. मात्र खनिज संपत्तीचे अधिकार प्रधान केले नाहीत. आदिवासी पट्यात सर्वाधिक खनिज संपत्ती आहे. खनिज संपत्तीचे अधिकार मिळविण्यासाठी प्रयत्न करावा असे प्रतिपादन आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय मानकर यांनी केले.गडचिरोली येथे जिल्हा स्तरीय मुलनिवासी-आदिवासी,ओबीसी व डीटीएनटी महासंमेलनाचे आयोजन रविवारी करण्यात आले. याप्रसंगी विजय मानकर मार्गदर्शन करीत होते. माजी आमदार हिरामन वरखडे, जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. लालसू नागोटी, अनिल केरामी, प्रदेशाध्यक्ष राजेश वालदे, एपीआयचे जिल्हाध्यक्ष राजू वाघमारे, सचिव विजय कृपाकर, कोषाध्यक्ष मोनाली लांजेवार, गंगाराम आतला, सुखदेव गावळे, अर्जूनसिंग ठाकूर, भगवान नन्नावरे, डॉ. दिवाकर उराडे, नंदकिशोर रंगारी, रूपेश निमसरकार, सुरेश गावळे, , बालाजी बावणे, शेषराज गावळे, श्रीकांत नैताम, आकाश आंबोरकर, प्रा. संजय पिठाले आदी मान्यवर उपस्थित होते.पूढे मार्गदर्शन करताना विजय मानकर म्हणाले ज्या भागात आदिवासी राहतात त्या भागात देशातील एकूण खनिज संपत्तीच्या सुमारे ७० टक्के खनिज संपत्ती आहे. या खनिज संपत्तीवर उद्योजकांचा नेहमीच डोळा राहला आहे. ही खनिज संपत्ती खणन करण्यासाठी ग्रामसभेची परवानगी आवश्यक करावी. तसेच कंपनीच्या नफ्यात ग्रामसभेचा वाटा असावा. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागास प्रवर्गासाठी देशाच्या अंदाजपत्रकात स्वतंत्र तरतुद असावी यासाठी लढा देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे आवश्यक आहे. यासाठी शासनाला बाध्य करण्यासाठी लढा उभारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केले.प्रास्ताविक एपीआयचे जिल्हाध्यक्ष राजू वाघमारे, संचालन प्रवृत्ती वाळके तर आभार रूपेश निमसरकार यांनी मानले. यशस्वतेसाठी राहूल वैरागडे, सुशील मेश्राम, कवडू दुधे, अरविंद वानखेडे, दिलीप बांबोळे, अतुल मांदाडे, सुरज तावाडे, जितू डोंगरे, मनोज बारसिंगे, दुर्याेधन रायपूरे, तुषार हेटकर, अक्षय मडावी, अरविंद गजभीये, विनोद आतला, सुरज कोवे, धनंजय सहदेवकर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला ग्रामसभा व आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाचे जिल्हाभरातील कार्यकर्ते उपस्थित होते.