शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

जीवनावश्यक वस्तूंची भरमसाठ भाववाढ

By admin | Updated: August 18, 2016 01:35 IST

केंद्र शासनाने गेल्या दोन महिन्यात अन्नधान्य, किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंची प्रचंड भाववाढ केली आहे.

अन्नधान्य, किराणा साहित्य महागले : गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले गडचिरोली : केंद्र शासनाने गेल्या दोन महिन्यात अन्नधान्य, किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंची प्रचंड भाववाढ केली आहे. तेल, साखर, मैदा, रवा, पोहे, चनाडाळ, गहू, आटा आदींसह स्वयंपाकघरात दैनंदिन लागणाऱ्या वस्तूंची भाववाढ केली आहे. याशिवाय भाजीपाल्यांचेही दर प्रचंड वधारले आहेत. महागाईचा भडका उडाल्याने सर्वसामान्य नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. तसेच भाववाढीमुळे गृहिणींचेही आर्थिक बजेट पूर्णत: कोलमडले आहे. महागाईने सारेच लोक त्रस्त आहेत. दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तू व भाजीपाल्यांच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. शासनाचा गलेलठ्ठ पगार असलेल्या नोकरदारांना महागड्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे सहज सुलभ आहे. मात्र शेती व मोलमजुरी करणाऱ्या महिला तसेच खासगी कंत्राटी कर्मचाऱ्यांना भाववाढीचा प्रचंड फटका बसत आहे. गेल्या दोन ते तीन वर्षात जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठ्या फरकाने वाढ झाली आहे. दोन ते तीन वर्षांपूर्वी पती-पत्नी, मुलगा व मुलगी असलेल्या एका लहान कुटुंबाला महिन्याकाठी दोन हजार रूपयांचा किराणा साहित्य पुरेसे होते. मात्र आता लहानशा कुटुंबाच्याही किराणा साहित्याला महिन्याकाठी ३ हजार ५०० ते ४ हजार रूपये मोजावे लागत आहे. जीवनावश्यक वस्तूंबरोबरच पेट्रोल, डिझेल, गॅस, कपडे, भांडे आदींसह चैनीच्या व मौल्यवान वस्तूंची प्रचंड दरवाढ झाली आहे. त्यामुळे महागड्या चैनीच्या व मौल्यवान वस्तू खरेदी करण्यासाठी धनाढ्य कुटुंबाचा कल आहे. सर्वसामान्य नागरिक या वस्तू खरेदी करताना दिसून येत नसल्याचे चित्र आहे. तसे गडचिरोलीतील काही व्यावसायिकांनी लोकमतशी बोलताना सांगितले. प्रत्येक वस्तूंची भाववाढ झाल्याने शासनाच्या धोरणाबाबत नागरिक प्रचंड नाराज आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)