शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

२४० बचत गटांची महोत्सवात हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:09 IST

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन कृषी महाविद्यालयाच्या पटांगणावर करण्यात आले आहे.

ठळक मुद्देआत्मा व डीआरडीएच्यावतीने आयोजन : विविध कलाकुसरीच्या वस्तू बघून भारावले मान्यवर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन कृषी महाविद्यालयाच्या पटांगणावर करण्यात आले आहे. या महोत्सवात २४० बचत गटांनी सहभाग घेतला. काही बचत गटांनी स्वत:चा उद्योग स्थापन करून भरारी घेतली आहे. त्यांच्या या उद्योग व्यवस्थापनाचे कौशल्य प्रदर्शनाच्या माध्यमातून दिसून आले.जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, नगराध्यक्ष योगीता पिपरे, आत्माचे संचालक डॉ. प्रकाश पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनील पवार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जवळेकर, कृषी विभागाच्या उपसंचालक अर्चना कडू, जिल्हा परिषद सदस्य मिना कोडाप, निता साखरे, नामदेव सोनटक्के, नगरसेवक प्रमोद पिपरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक डॉ. विलास तांबे, प्रतिभा चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी मार्गदर्शन करताना गडचिरोली जिल्ह्यात वनौषधी मोठ्या प्रमाणात आहे. या वनौषधीची मागणी राज्य व राष्ट्रीयस्तरावर केली जाते. वनौषधीच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास वाव आहे. बांबूपासून विविध प्रकारच्या वस्तू तयार करता येतात. शहरातील बाजारपेठेत बांबूपासून तयार केलेल्या वस्तूंना चांगली मागणी आहे. एकदम मोठे उद्योग उभारण्यापेक्षा लहान उद्योगातून प्रगती करीत मोठ्या उद्योगाकडे वाटचाल करा, असे आवाहन केले.जिल्हाधिकाºयांनी मार्गदर्शन करताना शेतीच्या माध्यमातूनही आर्थिक प्रगती साधता येते. मात्र शेतीकडे त्यादृष्टीने बघणे आवश्यक आहे. बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तू महोत्सवात ठेवण्यात आल्या असून त्या बघण्यासाठी शेतकºयांनी कृषी महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन केले.आमदार डॉ. देवराव होळी यांनी जिल्ह्यातील शेतीची स्थिती अत्यंत नाजूक आहे. पाच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेले फार कमी शेतकरी जिल्ह्यात आहेत. शेतीला शेतीपुरक उद्योगधंद्याची जोड देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केले.यावेळी नगराध्यक्ष योगीता पिपरे, जि.प. सदस्य नामदेव सोनटक्के यांनीसुध्दा मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. नरेंद्र आरेकर यांनी केले. प्रदर्शनाला शेकडो शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शविली होती. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची रांग लागली होती.अखेर आमदारांनीच केले महोत्सवाचे उद्घाटनजिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटक म्हणून पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना निमंत्रित करण्यात आले होते. पत्रिकेत उद्घाटन सोहळ्याची वेळ १२ वाजता दिलेली होती. मात्र दीड वाजूनही पालकमंत्री कार्यक्रमस्थळी पोहोचले नाही. आलेले शेतकरी कार्यक्रम सुरू होण्याची प्रतीक्षा करीत होते. त्यामुळे दीड वाजता दीप प्रज्वलीत करून उद्घाटन न करताच मार्गदर्शनपर कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. अडीच वाजेपर्यंत पालकमंत्री पोहोचतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. तोपर्यंत मंचावर उपस्थित असलेल्या सर्वांनीच मार्गदर्शन केले. सुमारे ३.३० वाजेपर्यंत कार्यक्रम लांबविण्यात आला. मात्र पालकमंत्री अहेरी येथील ट्रॅक्टर वितरण कार्यक्रमात अडकून पडले होते. उद्घाटनानंतर जेवन ठेवण्यात आले होते. मात्र ३ वाजूनही कार्यक्रम संपत नव्हता. त्यामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या ९० टक्के महिलांनी काढता पाय घेतला. ३.३० वाजूनही पालकमंत्री न पोहोचल्याने आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.च्जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेनेकडे जेवनाची व्यवस्था सोपविण्यात आली होती. या विभागाने केवळ १ हजार ५०० शेतकºयांच्या जेवनाची व्यवस्था केली. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांची संख्या अधिक झाल्याने अर्धेअधिक शेतकरी व महिला बचत गटाचे पदाधिकारी उपाशीच राहिले. याबाबत महोत्सवासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.कृषी महोत्सवात ठेवण्यात आलेल्या होस्टन फ्रिजन (एचएफ) व जर्सी गाय तसेच मुºहा जातीची म्हैस व इतर जनावरे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले होते. होस्टन फ्रिजन ही गाय पारडी येथील सदाराम मुरतेली यांच्या मालकीची होती. सदर गाय दर दिवशी किमान २२ लिटर दूध देते. कोटगल येथील भगवान ठाकरे यांची जर्सी जातीची गाय प्रदर्शनात होती. सदर गाय दरदिवशी किमान २० लिटर दूध देते. तर कोटगल येथील गणेश सुरमवार यांची मुऱ्हा जातीची म्हैस ही शेतकऱ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती. सदर म्हैस दिवसाला १५ लिटर दूध देते. त्याचबरोबर बेरारी ब्रिडचे बकरे, विविध प्रकारच्या कोंबड्या, देवणी, थारपारकर, गीर, काँक्रेज, साईवाल, रेडसिंधी आदी प्रकारच्या गायी प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या.