शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

वडिलांचा मृतदेह घरात, मुलीने केंद्रावर जाऊन सोडवला दहावीचा पेपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2022 05:00 IST

परीक्षा केंद्रावर जाऊन दहावीचा पेपर सोडवायचा की वडिलांचे अंतिम संस्कार करायचे, या व्दिधा मन:स्थितीत ती सापडली होती. यावेळी तिला काही नातेवाईकांनी धीर दिला, यामुळे तिला हिंमत आली. दु:ख पचवत आर्या सकाळी पेपर देण्यासाठी परीक्षा केंद्रावर गेली. ती घराबाहेर पडल्यानंतर अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली आणि आर्या घरी परतताच मृतदेह घराबाहेर काढण्यात आला.

हरिश सिडामलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आजारपणामुळे वडिलांचे रात्री अचानक निधन झाले. पण पित्याच्या मृत्यूचे दु:ख आवरत सकाळी दहावीचा पेपर सोडवायला गेलेली एक विद्यार्थिनी चामोर्शी तालुक्यात कौतुकाचा विषय झाली आहे. डोळ्यांतील अश्रूंना आवरत तिने मोठ्या हिमतीने बोर्डाच्या परीक्षेचा पूर्ण पेपर सोडवत आपले शैक्षणिक वर्ष वाया जाण्यापासून वाचविले. ही घटना चापलवाडा या गावात घडली. याविषयी मिळालेल्या माहितीनुसार, चामोर्शी तालुक्यातील घोट या गावापासून अवघ्या ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या चापलवाडा गावात राहणारे शेतकरी सुनील दुंदलवार (४५ वर्ष) यांचे गेल्या सोमवारी रात्री उशिरा आजारपणामुळे निधन झाले. या घटनेमुळे दुंदलवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. चापलवाडा गावातही शोककळा पसरली. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता दहावीची बोर्डाची परीक्षा सुरू होणार असताना वडिलांच्या निधनाने दहावीत असलेल्या आर्या दुंदलवार हिच्यावर मोठे संकट कोसळले. परीक्षा केंद्रावर जाऊन दहावीचा पेपर सोडवायचा की वडिलांचे अंतिम संस्कार करायचे, या व्दिधा मन:स्थितीत ती सापडली होती. यावेळी तिला काही नातेवाईकांनी धीर दिला, यामुळे तिला हिंमत आली. दु:ख पचवत आर्या सकाळी पेपर देण्यासाठी परीक्षा केंद्रावर गेली. ती घराबाहेर पडल्यानंतर अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली आणि आर्या घरी परतताच मृतदेह घराबाहेर काढण्यात आला.

परीक्षा केंद्र तीन किलोमीटर अंतरावर -   चापलवाडा गावापासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मक्केपल्ली गावातील साईनाथ विद्यालयात आर्या दहावीत शिकत आहे. यावर्षी कोविडमुळे शिक्षण मंडळाने स्थानिक शाळांमध्ये परीक्षा केंद्र ठेवली आहेत. त्यामुळे आर्याला तिच्या शाळेत जाऊन पेपर द्यावा लागला. या दुःखद परिस्थितीतही आर्याने गावातील इतर विद्यार्थ्यांसह तीन किलोमीटर अंतरावरील शाळेत पोहोचून दहावी बोर्डाचा पहिला पेपर सोडवला.

 नवीन आदर्शदायी  उदाहरण आर्याची आई आणि नातेवाईकांनी तिला समजावून सांगितले आणि तिची भविष्यातील स्वप्ने साकार करण्यासाठी तिला प्रथम परीक्षेचा सामोरे गेले पाहिजे. तिचा पेपर झाल्याशिवाय वडिलांवर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतला. यामुळे आर्याला प्रोत्साहन मिळाले आणि तिने केंद्र गाठून आधी पेपर दिला. आर्याच्या या धाडसी निर्णयाने समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे.

 

टॅग्स :examपरीक्षा